AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्रीकांत देशमुख यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेचा स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न

भाजपचे माजी जिल्हाप्रमुख श्रीकांत देशमुख यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेने स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला आहे. या महिलेने सांगोल्यातील जवळा येथे स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला आहे.

श्रीकांत देशमुख यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेचा स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न
| Updated on: May 19, 2023 | 12:05 AM
Share

सोलापूर : भाजपचे माजी जिल्हाप्रमुख श्रीकांत देशमुख यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेने स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला आहे. या महिलेने सांगोल्यातील जवळा गावात जावून स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला आहे. श्रीकांत देशमुख यांनी आपल्यासोबत लग्न करुन सोडून दिल्याचा आरोप महिलेने केला आहे. तसेच आपल्याविरोधात गुन्हा दाखल करुन संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप या महिलेने केला होता. या महिलेचं नाव निर्मला यादव असं आहे. निर्मला यादव यांनी स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न करण्याआधी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत आपल्या टोकाच्या निर्णयाची माहिती दिली होती. त्यानंतर अनेकांनी त्यांना तसं न करण्याचं आवाहन केलं होतं. तरीही त्यांनी आज हा टोकाचा निर्णय घेतला आहे.

निर्मला यादव आणि श्रीकांत देशमुख यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु आहेत. श्रीकांत देशमुख यांनी आपली फसवणूक केली. त्यांनी खोटं बोलून आपल्याशी लग्न केलं. त्यांच्यासह त्यांच्या भावंडांनी आपली फसवणूक केली, असा आरोप या महिलेचा होता. या महिलेने पोलीस ठाण्यातही श्रीकांत देशमुख यांच्याविरोधात तक्रार केली होती. याशिवाय महिलेने सोशल मीडियावर श्रीकांत देशमुख यांच्यासोबतचा एक लाईव्ह व्हिडीओ शेअर करत गंभीर आरोप करत होते. संबंधित व्हिडीओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर देशमुख यांना जिल्हाप्रमुख पदावरुन पायउतार व्हावं लागलं होतं.

गेल्या अनेक दिवसांपासून हे प्रकरण चर्चेत होतं. निर्मला यादव हे फेसबुकच्या माध्यमातून आपली भूमिका मांडायच्या. ते श्रीकांत देशमुख आणि भाजपच्या नेत्यांवर गंभीर आरोप करायच्या. संबंधित प्रकरणी पोलीस ठाण्यातही तक्रार करण्यात आली होती. या दरम्यान यादव प्रचंड मानसिक तणावातून जात असल्याचं त्यांच्या फेसबुक पोस्टमधून दिसत होतं. यादव यांनी गुरुवारी (18 मे) सकाळी एक व्हिडीओ शेअर करत आपण स्वत:ला संपवत असल्याचं म्हटलं होतं.

‘या’ नेत्यांमुळे टोकाचा निर्णय घेतल्याचा आरोप

निर्मला यादव यांनी गुरुवारी फेसबुकवर शेअर केलेल्या व्हिडीओमुळे एकच खळबळ उडाली होती. त्यांना अनेकांनी असा टोकाचा निर्णय न घेण्याचं आवाहन केलं होतं. पण तरीही यादव यांनी ऐकलं नाही. निर्मला यांनी या व्हिडीओत आपल्या या टोकाच्या निर्णयाला श्रीकांत देशमुख, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भाजप खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि श्रीकांत देशमुख यांच्या भावाला जबाबदार असल्याचं म्हटलं होतं.

निर्मला यादव यांच्या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या होत्या. अनेकांनी त्यांना परिस्थितीशी संघर्ष करण्याचं आवाहन केलं होतं. पण यादव यांनी स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला. संबंधित घटनेमुळे सोलापुरात एकच खळबळ उडाली आहे.

हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश.
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?.
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले.
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं.
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?.
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?.
चव्हाण अन् शिंदेंमधला वाद काही मिटेना? एकाच मंचावर पण दुरावा कायम?
चव्हाण अन् शिंदेंमधला वाद काही मिटेना? एकाच मंचावर पण दुरावा कायम?.