AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिनविरोध निवडणूक विजयासंदर्भात महत्वाचा निर्णय, काय म्हणाले निवडणूक आयुक्त ?

राज्यात 29 महानगर पालिकांच्या निवडणूकांसाठी मतदान येत्या 15 जानेवारी रोजी आहे. या निवडणूकांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राज्यातील काही महानगर धमकावून आणि आमीषाने अर्ज मागे घ्यायला लावून अनेक उमेदवार बिनविरोधी निवडल्याचा आरोप झाला आहे.

बिनविरोध निवडणूक विजयासंदर्भात महत्वाचा निर्णय, काय म्हणाले निवडणूक आयुक्त ?
Election Commissioner Dinesh Waghmare
| Updated on: Jan 13, 2026 | 5:35 PM
Share

राज्यात निकालाआधीच सत्ताधारी पक्षाचे 60 हून अधिक उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.त्यामुळे विरोधी पक्षांनी यावर आक्षेप घेत लोकशाही धोक्यात आल्याचा आरोप केला होता. राज्यातील 29 महानगर पालिकांच्या निवडणूकीसाठी येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होत आहे. आज राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 75 पंचायत समित्यांची निवडणूक जाहीर झाली. त्यावेळी निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी बिनविरोधी विजयी उमेदवारासंदर्भात आलेल्या तक्रारीवर माहिती दिली आहे.

राज्यातील 29 महानगर पालिका निवडणूकांच्या प्रचाराची मुदत मंगळवारी ( 13 जानेवारी 2026 ) सायंकाळी संपली. आज राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 75 पंचायत समित्यांच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणूकीचे मतदान 5 फेब्रुवारीला असून मतमोजणी आणि निकाल 7 फेब्रुवारीला आहे.

यावेळी राज्यात सत्ताधारी पक्षाचे 60 हून अधिक उमेदवार बिनविरोध विजयी झाल्याचे प्रकरणात काय कारवाई झाली असा सवाल पत्रकारांनी केला असता निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले की बिनविरोध निवडणुकीची अहवाल महापालिका आयुक्तांकडून मागवले आहेत.

कोणत्या मुद्यावर अहवाल मागितला

या संदर्भात काही मुद्यांवर हा अहवाल मागितला आहे. हा अहवाल खालील पॉइंटवर मुद्द्यांवर मागवला आहे. 1) उमेदवारावर दबाव आहे का ? 2) माघार घेतलेल्यांना आमीष दाखवले का? 3)पोलीस तक्रार झाली का ? 4) काही तक्रार झाली का ? तसेच ज्या उमेदवारांनी माघार घेतली, त्यांनी स्वखुशीने माघार घेतली का ? या मुद्यांवर हा अहवाल मागवला आहे. या संदर्भात अहवाल आल्यावर त्याबाबतचा निर्णय घेऊ असे निवडणूक आयुक्त दिनेश वाघ यांनी म्हटले आहे.

इयत्ता दहावीच्या परीक्षा 9 फेब्रुवारी रोजी आहे. 12 वीच्या परीक्षा 12 फेब्रुवारीपासून आहेत. त्यामुळे या निवडणूक प्रक्रिया आम्हाला पूर्ण करायच्या आहेत. राज्यातील फायनल दुबार मतदार 10 लाख 32 हजार आहे. मुंबई महापालिकेत 1 लाख 20 हजार शिल्लक राहिले आहेत अशी माहिती निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.

राज्यात 29 महानगर पालिकांच्या निवडणूका येत्या 15 जानेवारी रोजी आहे. या निवडणूकांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राज्यातील काही महानगर पालिकात वादावादी, आरोप-प्रत्यारोप झाले होते.तसेच अर्ज मागे घ्यावा म्हणून पैशाचे आमीष आणि धमकवण्यात आरोपही विरोधी नेत्यांनी केले आहेत. राज्यात सत्ताधारी पक्षाचे 60 हून अधिक उमेदवार विजयी घोषीत करण्यात आले आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...