मराठी भाषिकांची कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव; कर्नाटक प्रशासनाने निवेदन स्वीकारलेच नाही; हजारो कार्यकर्ते कोल्हापूरात दाखल…

| Updated on: Dec 26, 2022 | 7:08 PM

महाराष्ट्र एकीकरण समितीचे निवेदन कर्नाटक प्रशासनाने घेण्यास नकार देण्यात आल्यानंतर म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येने कोल्हापूरात येऊन कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना सीमाबांधवांच्या मागणीचे निवेदन देण्यात आला आहे.

मराठी भाषिकांची कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव; कर्नाटक प्रशासनाने निवेदन स्वीकारलेच नाही; हजारो कार्यकर्ते कोल्हापूरात दाखल...
Follow us on

कोल्हापूरः कर्नाटक प्रशासनाकडून निवेदन स्वीकारला जात नसल्याने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापुरात धाव घेऊन कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यामुळे कर्नाटक प्रशासनाविरोधात कोल्हापुरात येऊन आवाज उठवल्याने मराठी भाषिकांच्या अन्यायाल वाचा फोडण्याचे काम करण्यात आले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने आज कोल्हापूरमध्ये येऊन धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला गेल्याने कोगनोळी टोलनाक्यापासून कर्नाटक प्रशासनाने कडक पोलीस संरक्षण लावण्यात आले होते. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या धरणे आंदोलनात महाविकास आघाडीसह शिंदे गटही सहभागी होणार असे जाहीर करण्यात आले होते.

सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील सर्व पक्षी्यांनी एक दिवस महाराष्ट्र बंद ठेवण्याची मागण येथील राजकीय पक्षांकडे करण्यात आली होती.

एक दिवस महाराष्ट्र बंद ठेऊन महाराष्ट्र आमच्या पाठीशी असल्याचे दाखवून द्या अशीही मागणी त्यांनी केली होती. सीमाबांधवांचा कोल्हापूरात आज मोर्चा असल्या कारणाने महाराष्ट्रासह कर्नाटकातील वाहनांची कोगनोळी टोलनाक्यावर तपासणी करण्यात येत होती.

महाराष्ट्र एकीकरण समितीचे निवेदन कर्नाटक प्रशासनाने घेण्यास नकार देण्यात आल्यानंतर म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येने कोल्हापूरात येऊन कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना सीमाबांधवांच्या मागणीचे निवेदन देण्यात आला आहे.

सीमाबांधवांवर कर्नाटक सरकारकडून सातत्याने अन्याय केला जात असल्याने आणि सीमाभागातील मराठी भाषिकांचे निवेदन कर्नाटक प्रशासनाकडून स्वीकारले जात असल्याने म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आला.

महाराष्ट्र एकीकरण समितीने आज कोल्हापूरात धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्या नंतर कोल्हापुरातील राजकीय पक्षांनी या मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

महाविकास आघाडी, शिवसेना, भाजप, आणि इतर पक्षांनीही महाराष्ट्र एकीकरण समितीच्या या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपण आपण सीमााभागातील मराठी भाषिकांसोबत असल्याचेही दाखवून देण्यात आले.