Chandrapur : शेतकऱ्यांसाठी महिलेचा अजब नवस, चक्क अडीच लीटर…

तेलंगणाच्या थोडासम घराण्यातील महिला ही परंपरा पाळून शेतकऱ्यांना सुबत्ता मिळावी, शेतकऱ्यांची घरे धनधान्यांनी भरावीत यासाठी हे पारंपारीक कृत्य श्रद्धेने करीत असतात. सन 1961 पासून या गावात ही परंपरा सुरू झाली असून या घराण्यातील 20 महीलांनी आतापर्यंत या थोडासम घराण्याची परंपरा पाळल्याचे म्हटले जात आहे.

Chandrapur : शेतकऱ्यांसाठी महिलेचा अजब नवस, चक्क अडीच लीटर...
TelanganaImage Credit source: Telangana
Follow us
| Updated on: Jan 12, 2023 | 5:03 PM

तेलंगणा : आपल्या पारंपारिक रितीरीवाजातून ( tradition ) समाजात अनेक गोष्टी श्रद्घापूर्वक केल्या जात असतात. आता तेलंगणा ( Telangana ) राज्यातील एका जत्रेत शंभरवर्षांपासून चालत आलेल्या पारंपारिक धार्मिक श्रद्घेतून चंद्रपूरच्या 62 वर्षीय महिलेने चक्क दोन लिटर तीळाचे तेल पिण्याचे अजब कृत्य केले आहे. या श्रद्धेमागे काय आहे कारण जाणून घेऊया…

मेश्राम नागूबाई या आदीवासी महिलेने तेलगणा येथील अदीलाबाद जिल्ह्यातील पाच दिवसांच्या यात्रेत हे अजब नवस केले आहे. या यात्रेचे नाव कामदेव जत्रा असून नरूर मंडळाने ही पाच दिवसांची कामदेव जत्रा आयोजित केली होती. या यात्रेत शेतकऱ्यांचे कल्याण व्हावे जगात शांती निर्माण व्हावी या नवसासाठी या मूळच्या महाराष्ट्रातील चंद्रपूरच्या रहीवासी असलेल्या महिलेने हे अजब काम केले आहे.

या महाराष्ट्रातील महिलेने तेलंगणाच्या एका यात्रेत घरगुती घाण्यापासून तयार केलेले दोन लिटर तिळाचे तेल प्राशन केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ही महिला चंद्रपूरच्या जीविती तालूक्याच्या कोडेपूर गावची रहीवासी असल्याचे म्हटले जात आहे. तेलंगणाच्या या गावात घराण्याची परंपरा म्हणून कामदेवाची पूजा करून आशीर्वाद घेण्यासाठी घराण्याची परंपरा राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात घरगुती तीळाचे तेल पिण्याचे व्रत पाळून या वार्षिक जत्रेची सुरूवात करीत असतात.

तेलंगणाच्या थोडासम घराण्यातील महिला ही परंपरा पाळून शेतकऱ्यांना सुबत्ता मिळावी, शेतकऱ्यांची घरे धनधान्यांनी भरावीत यासाठी हे पारंपारीक कृत्य श्रद्धेने करीत असतात. सन 1961 पासून या गावात ही परंपरा सुरू झाली असून या घराण्यातील 20 महीलांनी आतापर्यंत या थोडासम घराण्याची परंपरा पाळल्याचे म्हटले जात आहे. मेश्राम नागूबाई यांनी ही परंपरा पाळण्याची आव्हान स्वीकारल्याने त्यांचे गावच्या मंदिर समितीने जोरदार स्वागत केले आहे. आता पुढील दोन वर्षे ते अशाच प्रकारे तेल पिणार आहेत. तेलंगणा आणि महाराष्ट्रातील हजारो भाविक या जत्रेत सहभाग घेण्यासाठी दरवर्षी येत असतात.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.