AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शॉर्टसर्किटमुळे बीडमधील शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक, दहा लाखांचे नुकसान

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई इथल्या सुगाव या ठिकाणी तीन शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक झाला आहे. या घटनेमध्ये शेतकऱ्यांचे दहा लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. विद्युत तारेच्या घर्षणाने ऊस जळाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

शॉर्टसर्किटमुळे बीडमधील शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक, दहा लाखांचे नुकसान
Beed sugarcane fire
| Edited By: | Updated on: Jan 23, 2022 | 1:08 PM
Share

बीड: बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई इथल्या सुगाव (Sugav) या ठिकाणी तीन शेतकऱ्यांचा ऊस (sugarcane) जळून खाक झाला आहे. या घटनेमध्ये शेतकऱ्यांचे दहा लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान (Compensation) झाले आहे. विद्युत तारेच्या घर्षणाने ऊस जळाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पावासाने यावर्षी चांगली साथ दिली असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली आहे. मात्र असे नुकसान शेतकऱ्यांचे होत असेल तर शेतकऱ्याला काय फायदा होणार असा सवाल शेतकरी करीत आहेत.

आग लागून जळून खाक झालेला ऊस आता तोडणीला आला होता. मात्र त्यापूर्वीच विद्युत तारांच्या शॉर्टसर्कीट झाल्यामुळे शेतीतील सगळा ऊस जळून खाक झाला आहे. आगीत उसाचे मोठे नुकसान झाल्याने नुकसानग्रस्त शेतीचा पंचनामा करून नुकसान देण्याची मागणी करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांवर दुहेरी संकट

कोरोनामुळे आधीच शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. नैसर्गिक संकटासह कोरोनाच्या संकटामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाल भाव मिळेनेही कठीण झाले आहे. राज्यात यंदा अनेक ठिकाणी पाऊस होऊन शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर संकटाचे सत्र सुरूच आहे. पावसामुळे आणि पाण्याअभाव्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी करूनही शासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत जाहीर करण्यात आली नाही.

नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता कमी

बागायतदार शेतकऱ्यांनाही कोरोनाच्या काळात मोठा आर्थिक फटका बसला आहे. कोरोनाचे निर्बंधांमुळे मिळालेल्या शेतीमालाला योग्य बाजारभावही आणि विक्रीही झाली नसल्याने शेतीचा खर्चही त्यातून निघाला नाही. त्यातच विद्युत विभागाच्या गलथाण कारभारामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आख्खे मळे आगीच्या भस्मस्थानी पडत आहेत. आगीत ऊस जळून खाक झाला तरी त्याची नुकसान भरपाई मिळेलच याची खात्री कोणत्याच शेतकऱ्याला नाही. त्यामुळे राज्यीतील शेतकरी सध्या प्रचंड मोठ्या संकटात असल्याचे चित्र दिसत आहे.

संबंधित बातम्या

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.