AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शॉर्टसर्किटमुळे बीडमधील शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक, दहा लाखांचे नुकसान

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई इथल्या सुगाव या ठिकाणी तीन शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक झाला आहे. या घटनेमध्ये शेतकऱ्यांचे दहा लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. विद्युत तारेच्या घर्षणाने ऊस जळाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

शॉर्टसर्किटमुळे बीडमधील शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक, दहा लाखांचे नुकसान
Beed sugarcane fire
| Edited By: | Updated on: Jan 23, 2022 | 1:08 PM
Share

बीड: बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई इथल्या सुगाव (Sugav) या ठिकाणी तीन शेतकऱ्यांचा ऊस (sugarcane) जळून खाक झाला आहे. या घटनेमध्ये शेतकऱ्यांचे दहा लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान (Compensation) झाले आहे. विद्युत तारेच्या घर्षणाने ऊस जळाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पावासाने यावर्षी चांगली साथ दिली असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली आहे. मात्र असे नुकसान शेतकऱ्यांचे होत असेल तर शेतकऱ्याला काय फायदा होणार असा सवाल शेतकरी करीत आहेत.

आग लागून जळून खाक झालेला ऊस आता तोडणीला आला होता. मात्र त्यापूर्वीच विद्युत तारांच्या शॉर्टसर्कीट झाल्यामुळे शेतीतील सगळा ऊस जळून खाक झाला आहे. आगीत उसाचे मोठे नुकसान झाल्याने नुकसानग्रस्त शेतीचा पंचनामा करून नुकसान देण्याची मागणी करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांवर दुहेरी संकट

कोरोनामुळे आधीच शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. नैसर्गिक संकटासह कोरोनाच्या संकटामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाल भाव मिळेनेही कठीण झाले आहे. राज्यात यंदा अनेक ठिकाणी पाऊस होऊन शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर संकटाचे सत्र सुरूच आहे. पावसामुळे आणि पाण्याअभाव्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी करूनही शासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत जाहीर करण्यात आली नाही.

नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता कमी

बागायतदार शेतकऱ्यांनाही कोरोनाच्या काळात मोठा आर्थिक फटका बसला आहे. कोरोनाचे निर्बंधांमुळे मिळालेल्या शेतीमालाला योग्य बाजारभावही आणि विक्रीही झाली नसल्याने शेतीचा खर्चही त्यातून निघाला नाही. त्यातच विद्युत विभागाच्या गलथाण कारभारामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आख्खे मळे आगीच्या भस्मस्थानी पडत आहेत. आगीत ऊस जळून खाक झाला तरी त्याची नुकसान भरपाई मिळेलच याची खात्री कोणत्याच शेतकऱ्याला नाही. त्यामुळे राज्यीतील शेतकरी सध्या प्रचंड मोठ्या संकटात असल्याचे चित्र दिसत आहे.

संबंधित बातम्या

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.