AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Buldhana Crime | सततची नापिकी, कर्जामुळे त्रस्त; महिला शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला (Loan) कंटाळून 65 वर्षीय शेतकरी महिलेने विहिरीमध्ये उडी घेवून आत्महत्या (Suicide) केली. ही घटना काल 22जानेवारी रोजी सकाळी रामनगर येथे घडली.

Buldhana Crime | सततची नापिकी, कर्जामुळे त्रस्त; महिला शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
भयंकरच! प्रॉपर्टीसाठी आजीला कुत्र्यासमोर फेकले, माथेफिरू नातू मोकाट
| Edited By: | Updated on: Jan 23, 2022 | 12:47 PM
Share

बुलडाणा : सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला (Loan) कंटाळून 65 वर्षीय शेतकरी महिलेने विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या (Suicide) केली. ही घटना काल 22 जानेवारी रोजी सकाळी रामनगर येथे घडली. महिलेने आत्महत्या केल्याचे समजल्यावर या घटनेची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी लगेच तलाठी, पोलीस ठाण्याला दिली होती. माहिती मिळताच पोलीस (Police) आणि महसूल प्रशासनाने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पोलिसांनी या महिलेच्या आकस्मिक मृत्यूची नोंद केलीय.

महिलेने 50 हजार रुपयांचे घेतले होते पीककर्ज

मिळालेल्या माहितीनुसार बुलडाणा जिल्ह्यातील अंढेरा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या रामनगर येथील यमुनाबाई तुकाराम मोढेकर वय 65 यांच्याकडे रामनगर शिवारात एक हेक्टर जमीन आहे. या जमिनीवर त्यांनी मेरा खुर्द येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे 50 हजार रुपये पीककर्ज घेतलेले आहे. शेतात उत्पन्न काढण्यासाठी महिलेचे सर्व कुंटुंब शेतातच वास्तव्यास आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे त्यांच्याकडून बँकेच्या घेतलेल्या पिककर्जाची परतफेड होऊ शकली नाही.

कोणालाही न सांगताच गेल्या अन् परतल्याच नाही 

कर्जाची परतफेड न झाल्यामुळे तसेच घरची परिस्थिती हलाखीची होत असल्यामुळे मृत महिलेने 21 जानेवरीच्या सायंकाळी जेवण केले. तसेच सर्वजण घरात झोपलेले असताना त्या घरात कोणालाही काहीही न सांगता शेतात गेल्या. मात्र पुन्हा त्या घरी परत आल्याच नाहीत घरच्यांनी शोध घेण्यास सुरुवात केली असता महिला शेतकऱ्याने शेतातील विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. या घटनेची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी लगेच तलाठी, पोलिसांना दिली होती. त्यांच्या या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

इतर बातम्या :

Nashik Crime | दोन वेटरमध्ये वाद, नंतर तुंबळ हाणामारी, नाशकात हॉटेलमध्ये एकाचा मृत्यू

Gang rape| विधवा महिलेवरील सामूहिक बलात्काराच्या घटनेने शिरूर हादरले; 6 जणांना अटक  

Cyber Crime | केवायसी अपडेटच्या नावाखाली फेक फोन कॉल्स, बँक खात्यातील रक्कम लाटणाऱ्यांना मुंबई पोलिसांकडून बेड्या

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.