AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jay Pawar : जर विरोधकांना लढायचं असेल तर त्यांनी लढावं, पण..बारामती विधानसभा पोटनिवडणुकीवर जय पवार यांचं सूचक वक्तव्य

Jay Pawar : लवकरच बारामती विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे. अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे ही निवडणूक होत आहे. अजित पवार यांचे दोन्ही सुपूत्र आता राजकारणात हळूहळू सक्रीय होत आहेत. जय पवार यांनी या निवडणुकी संदर्भात एक महत्वाचं वक्तव्य केलं आहे.

Jay Pawar : जर विरोधकांना लढायचं असेल तर त्यांनी लढावं, पण..बारामती विधानसभा पोटनिवडणुकीवर जय पवार यांचं सूचक वक्तव्य
Jay Pawar
| Updated on: Apr 04, 2026 | 4:11 PM
Share

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे सुपूत्र जय पवार हे बारामती पोटनिवडणूक, पवार कुटुंब आणि विमान अपघात अहवाल या विषयावर बोलले आहेत. ‘जर विरोधकांना लढायचं असेल तर त्यांनी लढावं. बारामतीकर या निवडणुकीत काय करणार हे सर्वांना माहित आहे’ असं जय पवार बोलले आहेत. अजित पवारांशिवाय कधी लढावं लागेल असं इमॅजिन केलं होतं का? या प्रश्नावर जय पवार यांनी ‘आयुष्यात कधीच असं इमॅजिन केलं नव्हतं’ असं उत्तर दिलं. या निवडणुकीकडे कसं बघता? किती आव्हानात्मक आहे? ‘मी जास्त काही बोलू शकणार नाही. मी भावनिक आहे. मला सगळ्यांसमोर बोलायच नाहीय’

तुम्ही पत्रकार परिषद घेणार होता. ती लांबणीवर जातेय. काय कारण आहे? त्यावर जय बोलले की “काही कारण नाही. जे मुद्दे मला बोलायचे होते. ते रोहितदादांनी कव्हर केले. जो पर्यंत फायनल अहवाल येत नाही. तो पर्यंत उगाचच लोकांच्या मनात मतभेद करायचे नाहीत. जे काही आम्हाला वैयक्तीक वाटतं ते वाटतं पण मी फायनल अहवाल आल्यानंतरच बोलेन” रोहित पवारांच्या भूमिकेला तुमचा पाठिंबा आहे का?. ‘मी फक्त एवढचं म्हटलं की माझे मुद्दे त्यांनी कव्हर केलेत’ “मी त्या रोहित सिंहचे व्हिडिओ टाकले. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. बिल्डिंग पडली की मालकाला अटक होते. इंजिनिअरला होत नाही. हॉटेलला आग लागली की हॉटेल मालकाला अटक होते. मग इथे असं का होत नाहीय” असं जय पवार बोलले.

त्यावर पक्षातले वरिष्ठ नेते बोलतील

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर विचारलेल्या प्रश्नावर जय पवार बोलले की, “माझं व्यक्तिगत काही नाही. मी खूप छोटा आहे. पार्थ असेल वहिनी असतील पक्षाचे ज्येष्ठ नेते ठरवतील” विलिनीकरण व्हावं असं वाटतं का? या प्रश्नावर जय पवार बोलले की, “कुटुंब म्हणून आम्ही एकत्र आहोत. आम्ही परस्परांशी बोलतो. दादा गेल्यानंतर सगळं पवार कुटुंब एकत्र आलं. राजकारणाचा जो भाग आहे, त्यावर मी संभाषण करणं योग्य वाटत नाही. त्यावर पक्षातले वरिष्ठ नेते बोलतील”

Follow Us