AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुरेश धस अन् आव्हाडांमध्ये पुन्हा जुंपली, लाँग मार्च ते अक्षय शिंदे सगळंच निघालं

मोठी बातमी समोर येत आहे, पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड आणि सुरेश धस यांच्यामध्ये जुंपली असून, सुरेश धस यांनी आव्हाडांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

सुरेश धस अन् आव्हाडांमध्ये पुन्हा जुंपली, लाँग मार्च ते अक्षय शिंदे सगळंच निघालं
| Updated on: Feb 10, 2025 | 7:28 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार सुरेश धस यांच्यामध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. सुरेश धस यांनी पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मी संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्यामध्ये भेदभाव करत नाही. लाँग मार्च निघाल्यापासून गेल्या 25 दिवसांमध्ये आव्हाडांनी एकदा तरी संर्पक केला आहे का? असा सवाल सुरेश धस यांनी उपस्थित केला आहे.

नेमकं काय म्हणाले सुरेश धस?

मी संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्यामध्ये भेदभाव करत नाही. लाँग मार्च निघाल्यापासून गेल्या 25 दिवसांमध्ये आव्हाडांनी एकदा तरी संर्पक केला आहे का? जटील प्रश्नांमधून मार्ग काढण्यासाठी मी प्रयत्न केला, ती जर जूक असेल तर ती चूक मी केली. ज्या चिमुकलीवर बलात्कार झाला त्या आरोपीची वाह वाह करणारे तुम्ही आहात, अक्षय शिंदेंची वाह वाह करणारे कोणत्या मानसिकतेचे आहेत? असा हल्लाबोल सुरेश धस यांनी केला आहे.

पंकजा मुंडेंना टोला 

भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी मोठं वक्तव्य केलं होतं.  मला आष्टीवर  जास्त प्रेम करावं लागेल, कारण परळी तिकडे राष्ट्रवादीला गेला आहे. मात्र हा मतदारसंघ आता भाजपकडे आहे, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता सुरेश धस यांनी देखील या वक्तव्यावर जोरदार पलटवार केला आहे. तिकडे सगळं हायजॅक झालं आहे, त्यामुळे आधी पंकजा मुंडे यांनी आपल्या मतदारसंघात लक्ष द्यावं असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान दुसरीकडे अंजली दमानिया यांनी देखील सुरेश धस यांच्यावर आरोप केले होते. सुरेश धस यांनी युटर्न का घेतला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. मात्र यावर बोलणं धस यांनी टाळलं आहे. दमानिया आणि अंधारे या माझ्या भगिनी आहेत, त्यामुळे मी त्यांचा आदर करतो असं धस यांनी म्हटलं आहे.  दरम्यान आता आव्हाड धस यांना काय प्रत्युत्तर देणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

राहुल गांधींना नरवणेंच्या पुस्तकावर बोलताना रोखल्याने, काँग्रेस आक्रमक
राहुल गांधींना नरवणेंच्या पुस्तकावर बोलताना रोखल्याने, काँग्रेस आक्रमक.
पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, तब्बल 200 पोलीस तैनात!
पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, तब्बल 200 पोलीस तैनात!.
जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर
जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर.
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ.
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची.
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना.
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त.
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु.
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता.
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प.