AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोशनीसारखी तुझी हालत करेन, ठाकरे Vs शिंदे; शिवसेनेचं सोशल वॉर खुल्या मैदानात उतरतंय, नवं प्रकरण काय?

ठाकरे विरुद्ध शिंदे गटातील सोशल मीडियातलं वॉर आता खुल्या मैदानात उतरू लागलंय. सोशल मीडियातील टिप्पण्यांचे पडसाद धमक्या-तक्रारींच्या रुपात बाहेर उमटताना दिसतायत.

रोशनीसारखी तुझी हालत करेन, ठाकरे Vs शिंदे; शिवसेनेचं सोशल वॉर खुल्या मैदानात उतरतंय, नवं प्रकरण काय?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 07, 2023 | 8:54 AM
Share

संजय भोईर, ठाणे : ठाकरे (Uddhav Thackeray) गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे (Roshani Shinde) यांना मारहाणीचं प्रकरण अजून शमलेलं नाही तोच आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राजकीय नेत्यांचे आरोप प्रत्यारोप खुलेआम सुरु असतानाच सोशल मीडियातूनही ठाकरे विरुद्ध शिंदे गटाचं युद्ध सुरु आहे. यातूनच आणखी एक धमकीचं प्रकरण उघडकीस आलं आहे. ठाकरे गटाच्या स्मिता आंग्रे यांनी केलेल्या सोशल मीडिया पोस्टवरून त्यांनादेखील रश्मी शिंदे यांच्यासारखी धमकी आली. टीव्ही9च्या प्रतिनिधींशी त्यांनी सविस्तर खुलासा केला. स्मिता आंग्रे ही युवती सेनेची कार्यकर्ती असून कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघाची शिवसेना अधिकारी आहे.

काय आहे नवं प्रकरण?

स्मिता आंग्रे यांनी शिंदे गटाच्या कार्यकर्तीकडून त्यांना थेट धमकी आल्याचा आरोप केला आहे. नम्रता भोसले यांनी स्मिता आंग्रेला धमकी दिल्याचं तिने म्हटलंय. स्मिता आंग्रे म्हणाल्या, ‘ “ठाकरे गटाचे सदस्य अमित परब यांची एक पोस्ट होती. त्यावर मी ‘नम्रपणे विकास दरवळतोय…’ अशी कमेंट केली.

या कमेंटच्या १५ मिनिटानंतर मला नम्रता भोसले जाधव यांचा कॉल आला. रात्री ११ वाजता. तू ही काय कमेंट केलीस?…

मी म्हणाले, मी सोशल मीडियावर अनेक कमेंट करत असते. त्यानंतर त्यांनी मला अमित परबच्या पोस्टबद्दल सांगितलं..

त्या म्हणाल्या, ‘ नम्रता भोसले ही विकास ढेपाळेसोबत काम करते, हे तुला माहिती आहे… मी म्हणाले, ‘ तुम्ही का स्वतःवर ओढून घेताय. मी कुणाला काहीही टॅग केलेलं नाही. त्यावर त्यांनी शिवीगाळ केली. रोशनीसारखीच तुझी हालत करेन, तुझ्याकडे बघतेच, अशी धमकी त्यांनी दिली.’

तक्रार दाखल करण्यात अडचणी…

रोशनी शिंदे यांच्यासारखी तुझी हालत करेन, अशी धमकी आल्यानंतर स्मिता आंग्रे यांनी पोलिसात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात अनेड अडचणी निर्माण केल्या, असा आरोप स्मिता यांनी केलाय. त्या म्हणाल्या, ‘ रात्री ११ वाजता धमकी आल्यानंतर मी सकाळी श्रीनगर पोलीस स्टेशनमध्ये गेले. त्यांनी माझी तक्रार दाखल करून घेतली नाही. मी दिवसभर ऑफिसला असते. घरी माझे कुटुंबीय घरी असतात. त्यांच्या सुरक्षेसाठी मला तक्रार दाखल करायची होती. अखेर उपायुक्त कार्यालयात तक्रार नोंदवून घेतली…

मला भीती वाटत नाही…

या धमकीनंतर स्मिता आंग्रे यांनी मला भीती वाटत नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. मी काहीही चुकीचं केलेलं नाही. किंवा त्यांच्या भावना दुखावतील, असं बोललेले नाही. त्यामुळे जनता माझ्या सोबत असेल, असं वक्तव्य स्मिता आंग्रे यांनी केलंय.

रोशनी शिंदेंवर उपचार सुरु

ठाण्यातील कासार वडवली परिसरात सोमवारी रात्री रोशनी शिंदे या ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यालाही सोशल मीडियातील कमेंटमुळेच मारहाण करण्यात आली, असा आरोप आहे. शिंदे गटातील महिला पदाधिकाऱ्यांनी त्यांना पोटात लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली, असा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात येतोय. रोशनी शिंदे या सध्या लिलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.