AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केडीएमसी आयुक्तांच्या बंगल्याचा रस्ता चर्चेत, 6 तासात 40 वाहनांचा अपघात, तर 8 जण किरकोळ जखमी

रस्त्यावर उघड्या चेंबरमुळे अपघात होत असल्याने संतप्त नागरिकांनी रस्ता बंद केला. पालिका अधिकारीने तात्पुरती डागडुजी केली. मात्र पुन्हा चेंबर फुटल्याने एखाद्याचा जीव गेल्यानंतरच पालिका जागी होणार का? असा संतप्त सवाल करत नागरिकांनी आक्रोश व्यक्त केला.

केडीएमसी आयुक्तांच्या बंगल्याचा रस्ता चर्चेत, 6 तासात 40 वाहनांचा अपघात, तर 8 जण किरकोळ जखमी
केडीएमसी आयुक्तांच्या बंगल्याचा रस्ता चर्चेत, 6 तासात 40 वाहनांचा अपघात
| Edited By: | Updated on: May 24, 2024 | 9:29 PM
Share

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचा आणखी एक ढिसाळ कारभार समोर आला आहे. कल्याणमध्ये उघड्या चेंबरमध्ये अनेक वाहनं पडून अपघात होत आहेत. विशेष म्हणजे कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या आयुक्तांच्या बंगल्याचा हा रस्ता असून याच रस्त्यावरून केडीएमसी आयुक्त स्वतः ये-जा करत असतात. केडीएमसी आयुक्तांचा बंगला ते काळा तलाव या दरम्यान दुर्गामाता रस्ता आहे. हा रस्ता सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

या रस्त्यावर सकाळपासून उघड्या चेंबरमुळे सुमारे 40 ते 45 गाड्या या चेंबरमध्ये अडकल्या. तर 15 ते 20 बाईकस्वार या चेंबरमुळे पडले आहेत. यात 8 जण जखमी देखील झाले आहेत. त्यांना स्थानिक नागरिकांनी मदत केली. त्यानंतर वारंवार याबाबत केडीएमसीच्या अधिकाऱ्यांना या अपघाताबाबत कळवण्यात आले. मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

kalyan news

अखेर संतप्त नागरिकांकडून हा रस्ता बंद करण्यात आला. त्यानंतर झोपेत असलेले अधिकारी तिथे पोहचले. मात्र त्यांनी तात्पुरती या ठिकाणी डागडुजी केली. आता पुन्हा चेंबर फुटले. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी या गलथान कारभाराचा निषेध व्यक्त केला. एखाद्याचा जीव गेल्यानंतरच पालिका जागी होणार का? असा संतप्त सवाल करत नागरिकांनी आक्रोश व्यक्त केला.

Follow Us
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर.
लोकसभेत विरोधकांचा गदारोळ, सभागृहात जोरदार घोषणाबाजी
लोकसभेत विरोधकांचा गदारोळ, सभागृहात जोरदार घोषणाबाजी.
युद्धामुळे संभाजीनगरमध्ये एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम
युद्धामुळे संभाजीनगरमध्ये एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम.
आता सोशल मीडियावर बदनामी करणं महागात पडणार
आता सोशल मीडियावर बदनामी करणं महागात पडणार.
इराण-इस्रायल युद्धाचा थेट महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना फटका
इराण-इस्रायल युद्धाचा थेट महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना फटका.