AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वतःचे खोके, दुसऱ्यांना धोके, आदित्य ठाकरे यांची टीका; ठाण्यातील रोजगार मेळाव्यात मोठं वक्तव्य

ठाण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्या आहे. शिवसेनेकडून ठाण्यात रोजगार मेळावा सुरू केलाय. बेरोजगरांकडं सरकारचं लक्ष नाही.

स्वतःचे खोके, दुसऱ्यांना धोके, आदित्य ठाकरे यांची टीका; ठाण्यातील रोजगार मेळाव्यात मोठं वक्तव्य
आदित्य ठाकरेImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Jan 14, 2023 | 4:31 PM
Share

ठाणे : ठाणे हा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा गड आहे. या गडात आदित्य ठाकरे यांनी काम सुरू केलं. आज ठाण्यात ठाकरे गटाकडून रोजगार मेळाव्याचं (Rojgar Melawa) आयोजन करण्यात आलं. पक्षाचे काही पदाधिकारी नेमायचे होते. काही नवीन पदाधिकारी कामाला लागले आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून ठाण्यात रोजगार मेळावा सुरू करून देण्यात आला. कारण महाराष्ट्रात बेरोजगार वाढत चालले आहेत. देशातही बेरोजगार युवकांकडं कुणी लक्ष देत नसल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. राजकीय पक्ष हे ५० वर्षांपूर्वी काय झालं. १०० वर्षांपूर्वी काय झालं, याकडं लक्ष देत आहेत. त्यासाठी भांडत बसले आहेत. तरुणांसाठी लढणारा किंवा पुढची ५० वर्षांसाठी लढणारा अजून दिसत नाही. तिथं शिवसेनेनं (Shiv Sena) काम सुरू केलंय.

पुण्यात विद्यार्थ्यांना आंदोलन करावं लागलं. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. एमपीएससीचे विद्यार्थी मोर्चे काढत आहेत. महिलांवर अत्याचार वाढत चालले. त्यांचा आवाज कुणी ऐकत नसल्याचंही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.

स्वतःचे खोके आणि दुसऱ्यांना धोके

महाराष्ट्रात मोघलांचं सरकार आहे, असं दिसत आहे. स्वतःचे खोके आणि दुसऱ्यांना धोके, असं सुरू आहे. शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. शेतकरी दुःखी आहेत. सरकारकडून जनतेसाठी एक पाऊल पुढं असं कुठंही दिसत नाही.

ठाण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्या आहे. शिवसेनेकडून ठाण्यात रोजगार मेळावा सुरू केलाय. बेरोजगरांकडं सरकारचं लक्ष नाही. तरुणांसाठी लढणारा कोणी दिसत नाही. तिथं शिवसेनेनं काम सुरू आहे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हंटलंय.

आदित्य ठाकरे यांनी विचारलेले प्रश्न

मुंबईतील ४०० किलोमीटरचे रस्ते किती वेळात करणार आहेत. ४०० कोटी रुपयांचे टेंडर काढायला प्रशासकाला अधिकार आहेत का. लोकप्रतिनिधी नसताना कुठल्या बॉडीनं याला मान्यता दिली. सहा हजार कोटी रुपयांचं बजेट कुठल्या फंडातून डायव्हर्ट केले. हे तुम्ही पुढच्या बजेटमध्ये दाखविणार आहात का. पाच कंपन्या आहेत. पाच पॅकेट कसे मिळाले, असे काही प्रश्न यावेळी आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला विचारले.

Follow Us
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...