AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Badlapur Rain : बदलापुरात उल्हास नदी धोक्याच्या पातळीवर, बदलापूर-कर्जत राज्य महामार्ग गेला पाण्याखाली!

ठाणे आणि रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे बदलापूरहून कर्जतकडे जाणारा राज्य महामार्ग पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. बदलापूरजवळच्या चामटोली गावाजवळ या महामार्गावर उल्हास नदीचं पाणी आलं असून त्यामुळे हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

Badlapur Rain : बदलापुरात उल्हास नदी धोक्याच्या पातळीवर, बदलापूर-कर्जत राज्य महामार्ग गेला पाण्याखाली!
बदलापुरात उल्हास नदी धोक्याच्या पातळीवरImage Credit source: TV9
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Jul 13, 2022 | 8:51 PM
Share

बदलापूर : बदलापुरात उल्हास नदी (Ulhas River) इशारा पातळी ओलांडून धोक्याच्या पातळीवर आली आहे. या पार्श्वभूमीवर बदलापूर पालिका प्रशासन पूर (Flood) परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज झाली आहे. ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे उल्हास नदीनं आज सकाळी 16.50 मीटर ही इशारा पातळी (Alert Level) ओलांडली होती. त्यानंतर आता उल्हास नदी 17 मीटरच्या वर आली असून 17.50 ही धोक्याची पातळी आहे. त्यामुळे पुराचं पाणी बदलापूर शहरातील चौपाटीच्या वर आलंय. हे पाणी कधीही शहरात घुसले अशी परिस्थिती असल्यानं बदलापूर पालिका प्रशासन पूरपरिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज झालंय.

उल्हास नदीकिनारी अग्निशमन दलानं बोटी तैनात केल्या असून पालिकेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे हे स्वतः नदीकिनारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. पुराचा धोका लक्षात घेत किनारी भागातल्या अनेक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी दिली आहे.

उल्हास नदीचं पाणी रस्त्यावर आल्यानं महामार्ग बंद

ठाणे आणि रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे बदलापूरहून कर्जतकडे जाणारा राज्य महामार्ग पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. बदलापूरजवळच्या चामटोली गावाजवळ या महामार्गावर उल्हास नदीचं पाणी आलं असून त्यामुळे हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. उल्हास नदीची पाणी पातळी वाढल्यानंतर दरवर्षी बदलापूरजवळच्या चामटोली गावाजवळ कल्याण-कर्जत राज्य महामार्ग पाण्याखाली जातो. याच ठिकाणी काही वर्षांपूर्वी महालक्ष्मी एक्सप्रेस देखील उल्हास नदीच्या पुराच्या पाण्यात अडकून पडली होती. यानंतर आज मुसळधार पावसामुळे उल्हास नदीचं पाणी पुन्हा एकदा या महामार्गावर आलं असून त्यामुळे हा महामार्ग बंद झाला आहे. या महामार्गावर बदलापूर ग्रामीण पोलिसांनी संपूर्ण वाहतूक बंद केली आहे. तर वांगणी दिशेला अडकलेल्या काही गाड्या या पुराच्या पाण्यातून धोकादायक पद्धतीने बाहेर काढण्यात आल्या.

कल्याणातील वालधुनी परिसर जलमय

बुधवारी सकाळपासून कल्याण डोंबिवली शहरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू होती. त्यात 11 ते 2 भरतीची वेळ असल्याने शहरातील खाडी पात्रात पाण्याची पातळी वाढली होती. रेतीबंदर बंदर परीसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानंतर वालधुनी परीसरातुन वाहणाऱ्या उल्हास नदीची देखील पाण्याची पातळी वाढली. या ठिकाणी अनेक घरांमध्ये नदीचं पाणी शिरलं होतं. तर अनेकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. या पार्श्वभूमीवर पालिकेकडून निवारा केंद्र आणि शाळांची सोय करण्यात आली आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यात आला असून निवारा केंद्रात नागरिकांना स्थलांतरीत व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. (At Badlapur, the Ulhas river was at danger level, the Badlapur-Karjat state highway went under water)

Follow Us
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले हिंदुत्त्व...
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
Sachin Ahir | ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! सचिन अहिर यांनी ठणकावू सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
Sachin Ahir Exclusive| 6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या
Nalasopara Rain Updates | मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या लोकल
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना नेमका काय इशारा?
राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया...
Sudhir Mungantiwar | राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, योगी आदित्यनाथ...
56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी
Sudhir Mungantiwar | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी; एकही शेतकरी वंचित राहणार नाही - सुधीर मुनगंटीवार
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून...
Kalyan News | कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून नागरिकांची जीवघेणी कसरत
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने खळबळ, नेमका रोख कोणाकडे?