Badlapur Rain : बदलापुरात उल्हास नदी धोक्याच्या पातळीवर, बदलापूर-कर्जत राज्य महामार्ग गेला पाण्याखाली!

ठाणे आणि रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे बदलापूरहून कर्जतकडे जाणारा राज्य महामार्ग पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. बदलापूरजवळच्या चामटोली गावाजवळ या महामार्गावर उल्हास नदीचं पाणी आलं असून त्यामुळे हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

Badlapur Rain : बदलापुरात उल्हास नदी धोक्याच्या पातळीवर, बदलापूर-कर्जत राज्य महामार्ग गेला पाण्याखाली!
बदलापुरात उल्हास नदी धोक्याच्या पातळीवरImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 13, 2022 | 8:51 PM

बदलापूर : बदलापुरात उल्हास नदी (Ulhas River) इशारा पातळी ओलांडून धोक्याच्या पातळीवर आली आहे. या पार्श्वभूमीवर बदलापूर पालिका प्रशासन पूर (Flood) परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज झाली आहे. ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे उल्हास नदीनं आज सकाळी 16.50 मीटर ही इशारा पातळी (Alert Level) ओलांडली होती. त्यानंतर आता उल्हास नदी 17 मीटरच्या वर आली असून 17.50 ही धोक्याची पातळी आहे. त्यामुळे पुराचं पाणी बदलापूर शहरातील चौपाटीच्या वर आलंय. हे पाणी कधीही शहरात घुसले अशी परिस्थिती असल्यानं बदलापूर पालिका प्रशासन पूरपरिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज झालंय.

उल्हास नदीकिनारी अग्निशमन दलानं बोटी तैनात केल्या असून पालिकेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे हे स्वतः नदीकिनारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. पुराचा धोका लक्षात घेत किनारी भागातल्या अनेक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी दिली आहे.

उल्हास नदीचं पाणी रस्त्यावर आल्यानं महामार्ग बंद

ठाणे आणि रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे बदलापूरहून कर्जतकडे जाणारा राज्य महामार्ग पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. बदलापूरजवळच्या चामटोली गावाजवळ या महामार्गावर उल्हास नदीचं पाणी आलं असून त्यामुळे हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. उल्हास नदीची पाणी पातळी वाढल्यानंतर दरवर्षी बदलापूरजवळच्या चामटोली गावाजवळ कल्याण-कर्जत राज्य महामार्ग पाण्याखाली जातो. याच ठिकाणी काही वर्षांपूर्वी महालक्ष्मी एक्सप्रेस देखील उल्हास नदीच्या पुराच्या पाण्यात अडकून पडली होती. यानंतर आज मुसळधार पावसामुळे उल्हास नदीचं पाणी पुन्हा एकदा या महामार्गावर आलं असून त्यामुळे हा महामार्ग बंद झाला आहे. या महामार्गावर बदलापूर ग्रामीण पोलिसांनी संपूर्ण वाहतूक बंद केली आहे. तर वांगणी दिशेला अडकलेल्या काही गाड्या या पुराच्या पाण्यातून धोकादायक पद्धतीने बाहेर काढण्यात आल्या.

हे सुद्धा वाचा

कल्याणातील वालधुनी परिसर जलमय

बुधवारी सकाळपासून कल्याण डोंबिवली शहरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू होती. त्यात 11 ते 2 भरतीची वेळ असल्याने शहरातील खाडी पात्रात पाण्याची पातळी वाढली होती. रेतीबंदर बंदर परीसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानंतर वालधुनी परीसरातुन वाहणाऱ्या उल्हास नदीची देखील पाण्याची पातळी वाढली. या ठिकाणी अनेक घरांमध्ये नदीचं पाणी शिरलं होतं. तर अनेकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. या पार्श्वभूमीवर पालिकेकडून निवारा केंद्र आणि शाळांची सोय करण्यात आली आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यात आला असून निवारा केंद्रात नागरिकांना स्थलांतरीत व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. (At Badlapur, the Ulhas river was at danger level, the Badlapur-Karjat state highway went under water)

Non Stop LIVE Update
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले...
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले....
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर.
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या.
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?.
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?.
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.