Bhiwandi : भिवंडीत जवळपास 900 इमारती धोकादायक! कारवाई किती इमारतींवर? माहितीच नाही!

गेल्या काही दिवसांत भिवंडीतील काही घरांची पडझड झाली. आजमी नगर इथं एक मजली घराचा काही भाग कोसळला होता. दोन दुर्घटनांमध्ये एकाचा जीव गेला होता

Bhiwandi : भिवंडीत जवळपास 900 इमारती धोकादायक! कारवाई किती इमारतींवर? माहितीच नाही!
धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवरImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 11, 2022 | 9:49 AM

भिवंडी : भिवंडीतील (Bhiwandi News) जवळपास 900 इमारती धोकादायक अवस्थेत असल्याची आकडेवारी समोर आली. या पार्श्वभूमीवर इमारतींना नोटीस बजावण्याच आल्या आहेत. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीर 894 इमारती धोकादायक (Dangerous building) आहेत, अशी माहिती समोर आलीय. भिवंडी महापालिकेकडून (Bhiwandi Municipal corporation) धोकादायक तसंच अतिधोकादायक इमारतींचं सध्या ऑडिट केलं जातंय. झाडाझडती केली जाते आहे. त्या दृष्टीनं आता धोकादायक इमारतींना पालिकेनं नोटीस पाठवली असून खबरदारी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत भिवंडीमधील धोकादायक इमारतींचा प्रश्न कमी झालेला आहे. गेल्या वर्षी धोकादायक इमारतींचा आकडा बाराशेच्या पार गेला होता. आता ही संख्या 900च्या आत आली आहे. मात्र धोकादायक असलेल्या किती इमारती जमीनदोस्त केल्या, याची कोणतीही आकडेवारी पालिका प्रशासनाकडे नसल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे. यामुळे पालिकेच्या कारभारावर शंका घेतली जातेय.

भिवंडी जिलानी इमारत दुर्घटनेनं धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आलेला होता. त्यानंतरही प्रशासन याबाबत गंभीर नाही, अशी बाब धक्कादायक आकडेवारीसून समोर आली आहे. धोकादायक इमारतींवर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित केला जातो आहे.

धोका कसा टळणार?

गेल्या काही दिवसांत भिवंडीतील काही घरांची पडझड झाली. आजमी नगर इथं एक मजली घराचा काही भाग कोसळला होता. दोन दुर्घटनांमध्ये एकाचा जीव गेला होता. तर आजादनगर इथं एका घराचा भाग कोसळला होता. यातही एकाचा मृत्यू झालेला. आतापर्यंत दोघांचा जीव घरांची पडझड होऊन गेलाय. मात्र त्यानंतरही धोका कायम असल्याचं आकडेवारीतून समोर आलंय. याप्रकरणी कायमस्वरुपी उपाययोजन करण्याची मागणी स्थानिकांकडून जोर धरतेय.

कुठे किती धोकादायक इमारती?

भिवंडीच्या सी एक सेक्टरमध्ये सर्वाधिक इमारती धोकादायक असल्याचं समोर आलंय. भिवंडीच्या सी एक मध्ये 346, सी दोन ए मध्ये 332, सी दोन बी मध्ये 191 आणि सी थ्रीमध्ये एकूण 25 धोकादायक इमारती असल्याचं समोर आलंय.

पाहा व्हिडीओ : वर्षभरापूर्वी झालेल्या भिवंडी दुर्घेटनेत अनेकांचा बळी

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.