AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cabinet Expansion Maharashtra: रवींद्र चव्हाण यांच्यामुळे सलग दुसऱ्यांदा डोंबिवलीला मंत्रिपदाचा मान

व्हाण यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच डोंबिवलीत भाजपचे कल्याण जिल्हा उपाध्यक्ष संदीप माळी आणि कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, पेढे वाटून जल्लोष केला. राज्यात भाजपची सत्ता आणण्यास हातभार लावणारे आमदार चव्हाण यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याची चर्चा सुरू होती.

Cabinet Expansion Maharashtra: रवींद्र चव्हाण यांच्यामुळे सलग दुसऱ्यांदा डोंबिवलीला मंत्रिपदाचा मान
कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण Image Credit source: Social Media
| Updated on: Aug 10, 2022 | 3:56 PM
Share

ठाणे,  शिंदे आणि फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा मंगळवारी विस्तार झाला (Cabinet Expansion Maharashtra). भाजपचे डोंबिवलीतील आमदार रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी मंगळवारी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. चव्हाण यांच्यामुळे डोंबिवलीला दुसऱ्यांदा मंत्रिपद मिळाले आहे. चव्हाण यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच डोंबिवलीत भाजपचे कल्याण जिल्हा उपाध्यक्ष संदीप माळी आणि कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, पेढे वाटून जल्लोष केला. राज्यात भाजपची सत्ता आणण्यास हातभार लावणारे आमदार चव्हाण यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याची चर्चा सुरू होती. राज्यात शिंदे व फडणवीस सरकारला मनसेने समर्थन दिले आहे. राज्यसभा निवडणुकीत मनसेचे आमदार राजू पाटील यांचे मत भाजपसाठी महत्वाचे  ठरले होते.

त्यांच्या सहकार्यामुळे पाटील यांनादेखील मंत्रिपद दिले जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच सोमवारी रात्रीपासूनच भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सोशल मीडियावर चव्हाण यांचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली होती. दरम्यान, भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांना मंत्रिपद मिळाल्याने आम्ही आज दिवाळी साजरी केली आहे, मनसेचे आमदार राजू पाटील यांनादेखील या सरकारमध्ये मंत्रिपद मिळाल्यास आम्ही दसरा साजरा करू, अशी प्रतिक्रिया या वेळी कल्याण जिल्हा उपाध्यक्ष माळी यांनी व्यक्‍त केली.

ही कामाची पावती- रवींद्र चव्हाण

हे सरकार महाराष्ट्राचे हित जपणारे असून येत्या काळात गतिमान कारभार हाकेल असा विश्वास भाजप नेते रविंद्र चव्हाण  यांनी व्यक्त केला. शिवसेनेतील शिंदे गट आणि भाजपने राज्यात सत्तांतर घडून आणले. गेल्या एक महिन्यांच्यावर या सरकारने महाराष्टाचा गाडा हाकला. मंत्रीमंडळ विस्ताराबाबत  सातत्याने हे सरकार टाळाटाळ करत असल्याचा आरोप विरोधकाकडून  होऊ लागला. तसेच फुटलेले सर्वच आमदार मंत्रीपद मागत असल्यानेच मंत्रीमंडळाला मुहुर्त लागत नसल्याचा आरोप होत होता. अखेर या सर्व घडामोडीवर आज मंगळवारी, 9 ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारातून पडदा पडला. शिंदे गटात माणसे खेचून आणण्यात आणि संपर्क करण्यात भाजप नेते रविंद्र चव्हाण यांनी मोलाची भूमिका निभावल्याचे बोलले जात होते. त्याचेच हे बक्षिस असल्याची चर्चा रंगली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना ही कामाची पावती असल्याचे सांगत चव्हाण यांनी अधिक बोलायचं टाळलं.

Follow Us
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत.
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला...
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला....
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू.
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.