AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाण्यातील 18 रुग्णांच्या मृत्यू प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उचललं असं पाऊल, म्हणाले…

CM Eknath Shinde On Thane Hospital Death Case : ठाण्यातील हॉस्पिटमध्ये एका रात्रीत 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या बातमीनंतर प्रशासन देखील खळबळून जागं झालं आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

ठाण्यातील 18 रुग्णांच्या मृत्यू प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उचललं असं पाऊल, म्हणाले...
ठाण्यातील 18 रुग्णांच्या मृत्यूनंतर प्रशासन खडबडून झालं जागं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्पष्ट म्हणाले की...
| Updated on: Aug 13, 2023 | 6:05 PM
Share

ठाणे| 13 ऑगस्ट 2023 :  ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत 18 रुग्ण दगावल्याने खळबळ उडाली आहे. याच रुग्णालयात गेल्या दोन दिवसात पाच रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर नेमकं काय झालं अशी जोरदार चर्चा सर्वत्र रंगली आहे. 18 रुग्णांचा मृत्यू झाला त्यापैकी 13 रुग्ण हे आयसीयूत होते. तर पाच रुग्ण हे जनरल वॉर्डमधील असल्याची माहिती समोर येत आहे. इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण दगावल्याने राजकीय पटलावरही पडसाद उमटले आहेत. सरकार विरोधी पक्षातील नेत्यांनी रुग्णालयात जाऊन या घटनेची चौकशी केली. तसेच सरकारला या प्रकरणी धारेवर धरलं आहे. असं असताना ठाणे जिल्ह्यातून प्रतिनिधित्व करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काय पाऊल उचलतात याकडे लक्ष लागून होतं. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रसारमाध्यमांसमोर आले आणि याप्रकरणी आपली पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

“मी या प्रकरणाची सकाळीच माहिती घेतली आहे. आरोग्य विभागाला सूचना दिल्या आहेत. दीपक केसरकरही त्या ठिकाणी पोहोचले असतील. आरोग्य मंत्री, आरोग्य सचिव यांच्याशी चर्चा झाली. पालकमंत्री शंभूराज देसाई सातत्याने संपर्कात होते. वेगवेगळ्या दिवशी दाखल झालेले रुग्ण आहेत. आरोग्य संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. जो अहवाल येईल त्याप्रमाणे कारवाई केली जाईल.झालेली दुर्घटना दुर्देवी आहे आणि त्यावर तातडीने निर्णय घेतलेला आहे.” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

“छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात वेगवेगळ्या प्रकारचे रुग्ण आले होते. काही खासगी रुग्णालयातूनही आले होते. गंभीर स्थितीत त्यांना दाखल करण्यात आलं होतं. त्या सर्व बाबी त्यांनी माझ्या कानावर घातल्या आहेत. तरीसुद्धा झालेली घटना दुर्दैवी आहे आणि त्याची सखोल चौकशी होईल.” असंही त्यांनी पुढे सांगितलं.

ठाण्यात राजकारण तापलं!

एका दिवसात इतक्या रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच मनसे, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाच्या नेत्यांना घटनास्थळी धाव घेतली आणि रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरलं. दुसरीकडे, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अत्यंत अस्वस्थ कंडिशनमध्ये रुग्ण रुग्णालयात येत असतात. रुग्णालयात दाखल करून घेतल्यानंतर 24 तासात सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती एका डॉक्टराने दिली.

Follow Us
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.