AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोंबिवलीतल्या पालिकेच्या शाळेची धोकादायक अवस्था, विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या २०० विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. कारण शाळेतील छताचे प्लास्टर निघाले आहेत. भिंतींला तडे गेले आहेत. प्रसाधनगृहाची अवस्था तर त्याहून वाईट आहे.

डोंबिवलीतल्या पालिकेच्या शाळेची धोकादायक अवस्था, विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर
| Updated on: Mar 12, 2023 | 3:48 PM
Share
डोंबिवली : आयरे गावात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची लालबहादूर शास्त्री शाळा आहे. या शाळेत 200 गरीब विद्यार्थी शिक्षण घेताय. मात्र या शाळेची दुरावस्था झाल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकीकडे शालेच्या स्लॅबचे प्लास्टर पडतेय ,भिंतीला तडे गेलेत तर दुसरीकडे प्रसाधनगृहाची दुरावस्था झाली आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांनी पालिका प्रशासनाकडे वारंवार दुरुस्तीची मागणी करत पाठपुरावा केला मात्र महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने पालक वर्गात भीतीचे वातावरण असून मोठी दुर्घटना घटनेची शक्यता वर्तवली जात आहे.
डोंबिवली पूर्वेकडील आयरे गावात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची लालबहादूर शास्त्री शाळा ही प्राथमिक शाळा आहे. या शाळेत पहिली ते आठवी पर्यंतचे वर्ग असून यापूर्वी परिसरातील सुमारे 200 गरीब विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत. या शाळेची इमारत वीस वर्षांपूर्वी बांधण्यात आली असून या इमारतीची देखभाल दुरुस्ती अभावी  दुरावस्था झाली असून वर्गातील छताचे प्लास्टर कोसळत आहे.
विद्यार्थी व शिक्षकांसाठी असणारे प्रसाधनगृहाची देखील दुरावस्था झाली असून विद्यार्थ्यांची सुरक्षतेचा प्रश्न  ऐरणीवर आला असून याबाबत शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा देशमुख यांनी महापालिका प्रशासनाकडे याबाबत वारंवार तक्रारी करत लक्ष वेधले. मात्र पालिका प्रशासनाने प्रसाधनगृहांची तात्पुरते डागडुजी केली व  इमारतीची देखभाल दुरुस्ती एप्रिल महिन्यात करण्यात येईल असे उत्तर दिल्याने विद्यार्थ्यांना व शिक्षकांना याच इमारतीत शिक्षण घ्यावे लागत आहे.
मोठी दुर्घटना घडण्याची भीती पालक वर्गात व शिक्षक वर्गाकडून व्यक्त केली जात असून जीवितहानी झाल्यानंतरच पालिका प्रशासन जागा होणार का असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.

Follow Us
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं.
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर.
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त...
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त....
शिवसेना- भाजपमध्ये तणाव, एकनाथ शिंदे यांची तातडीने मंत्र्यांसोबत बैठक
शिवसेना- भाजपमध्ये तणाव, एकनाथ शिंदे यांची तातडीने मंत्र्यांसोबत बैठक.
सातारा पोलीस अधीक्षकांचे निलंबन करा, उपसभापती नीलम गोऱ्हेंकडून आदेश
सातारा पोलीस अधीक्षकांचे निलंबन करा, उपसभापती नीलम गोऱ्हेंकडून आदेश.
मला अडवले, ओढत नेले... शंभुराज देसाई संतापले... विधान परिषदेत....
मला अडवले, ओढत नेले... शंभुराज देसाई संतापले... विधान परिषदेत.....
त्या सॉफ्ट टार्गेट, 9 माजी मंत्र्यांची चौकशी करा; संजय राऊत....
त्या सॉफ्ट टार्गेट, 9 माजी मंत्र्यांची चौकशी करा; संजय राऊत.....
खरातसोबत कुणाकुणाचे संबंध? संजय राऊतांनी थेट नावच घेतली
खरातसोबत कुणाकुणाचे संबंध? संजय राऊतांनी थेट नावच घेतली.
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...