AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोंबिवलीतल्या पालिकेच्या शाळेची धोकादायक अवस्था, विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या २०० विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. कारण शाळेतील छताचे प्लास्टर निघाले आहेत. भिंतींला तडे गेले आहेत. प्रसाधनगृहाची अवस्था तर त्याहून वाईट आहे.

डोंबिवलीतल्या पालिकेच्या शाळेची धोकादायक अवस्था, विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर
shailesh musale
shailesh musale | Updated on: Mar 12, 2023 | 3:48 PM
Share
डोंबिवली : आयरे गावात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची लालबहादूर शास्त्री शाळा आहे. या शाळेत 200 गरीब विद्यार्थी शिक्षण घेताय. मात्र या शाळेची दुरावस्था झाल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकीकडे शालेच्या स्लॅबचे प्लास्टर पडतेय ,भिंतीला तडे गेलेत तर दुसरीकडे प्रसाधनगृहाची दुरावस्था झाली आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांनी पालिका प्रशासनाकडे वारंवार दुरुस्तीची मागणी करत पाठपुरावा केला मात्र महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने पालक वर्गात भीतीचे वातावरण असून मोठी दुर्घटना घटनेची शक्यता वर्तवली जात आहे.
डोंबिवली पूर्वेकडील आयरे गावात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची लालबहादूर शास्त्री शाळा ही प्राथमिक शाळा आहे. या शाळेत पहिली ते आठवी पर्यंतचे वर्ग असून यापूर्वी परिसरातील सुमारे 200 गरीब विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत. या शाळेची इमारत वीस वर्षांपूर्वी बांधण्यात आली असून या इमारतीची देखभाल दुरुस्ती अभावी  दुरावस्था झाली असून वर्गातील छताचे प्लास्टर कोसळत आहे.
विद्यार्थी व शिक्षकांसाठी असणारे प्रसाधनगृहाची देखील दुरावस्था झाली असून विद्यार्थ्यांची सुरक्षतेचा प्रश्न  ऐरणीवर आला असून याबाबत शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा देशमुख यांनी महापालिका प्रशासनाकडे याबाबत वारंवार तक्रारी करत लक्ष वेधले. मात्र पालिका प्रशासनाने प्रसाधनगृहांची तात्पुरते डागडुजी केली व  इमारतीची देखभाल दुरुस्ती एप्रिल महिन्यात करण्यात येईल असे उत्तर दिल्याने विद्यार्थ्यांना व शिक्षकांना याच इमारतीत शिक्षण घ्यावे लागत आहे.
मोठी दुर्घटना घडण्याची भीती पालक वर्गात व शिक्षक वर्गाकडून व्यक्त केली जात असून जीवितहानी झाल्यानंतरच पालिका प्रशासन जागा होणार का असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.

Follow Us
जरांगेंनी विशिष्ट समाजाच्या भावना दुखावू नये! अभ्यासपूर्ण बोला
Sachin Kharat | विशिष्ट समाजाच्या भावना दुखावू नका! अभ्यासपूर्ण बोला; सचिन खरातांचा जरांगेंना थेट इशारा
उबाठाचा मोठा डाव! शिवसेना पक्षाच्या 2018च्या घटनेनुसार...
उबाठाचा मोठा डाव! शिवसेना पक्षाच्या 2018च्या घटनेनुसार... ठाकरेंचे वकील थेट निवडणुक आयोगालाच घेरणार?
वसई-विरारमध्ये पावसाचा धुमाकूळ! विवा कॉलेज परिसर जलमय, रस्त्यांना...
Vasai-Virar | वसई-विरारमध्ये पावसाचा धुमाकूळ! विवा कॉलेज परिसर जलमय, रस्त्यांना नदीचं स्वरूप
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच...
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच... एकनाथ शिंदेंनी काय सांगितलं?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण? अनिल पाटलांनी स्पष्टच सांगितलं!
हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! पवार संतापले
Rohit Pawar Tweet | हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या मृत्यूवर रोहित पवार संतापले
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं...
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं एका पाठोपाठ...
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल, म्हणाली, आम्ही फक्त...
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; सुषमा अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले;
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले; पंतप्रधानांच्या अगदी मागे उभा असलेल्या नेत्याला...