AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ambernath School | शाळा सुरू आल्या, पण लहानग्यांचं लसीकरण कधी? अंबरनाथमधील पालकांचा सरकारला उद्विग्न सवाल

गेली दोन वर्ष कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद असलेल्या शाळा अखेर 15 डिसेंबरपासून सुरू झाल्या आहेत. शाळांमध्ये पहिल्या दिवसापासूनच विद्यार्थ्यांनी उत्साहाने हजेरी लावलीये. मात्र एकीकडे मुलांच्या डोक्यावर फुलं टाकून त्यांचं स्वागत करणाऱ्या शाळांनी मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी मात्र झटकून टाकलीये.

Ambernath School | शाळा सुरू आल्या, पण लहानग्यांचं लसीकरण कधी? अंबरनाथमधील पालकांचा सरकारला उद्विग्न सवाल
School
| Edited By: | Updated on: Dec 18, 2021 | 1:02 AM
Share

अंबरनाथ : अंबरनाथ शहरात बुधवारपासून पहिली ते सातवीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र आता लहान मुलांचं लसीकरण कधी होणार? असा सवाल पालकवर्गाने उपस्थित केला आहे. शाळा बंद ठेवून मुलांचं शैक्षणिक नुकसान नको, पण किमान त्यांचं लसीकरण करून सुरक्षिततेची काळजी तरी घ्या, अशी मागणी पालकवर्गाकडून केली जातेय.

मुलांच्या लसीकरणाची पालकांकडून मागणी

गेली दोन वर्ष कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद असलेल्या शाळा अखेर 15 डिसेंबरपासून सुरू झाल्या आहेत. शाळांमध्ये पहिल्या दिवसापासूनच विद्यार्थ्यांनी उत्साहाने हजेरी लावलीये. मात्र एकीकडे मुलांच्या डोक्यावर फुलं टाकून त्यांचं स्वागत करणाऱ्या शाळांनी मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी मात्र झटकून टाकलीये. कारण जे विद्यार्थी शाळेत येत असतील, त्यांच्या पालकांकडून लेखी हमीपत्र मागवलं जातंय. यामध्ये जर मुलांना शाळेत आल्यामुळे कोरोना किंवा अन्य काही झालं, तर त्याची जबाबदारी आमची असेल, असं पालकांकडून लिहून घेतलं जातंय. शाळांच्या या दुटप्पी भूमिकेमुळे पालकवर्ग मात्र धास्तावून गेलाय. त्यामुळे आता लहान मुलांचं लसीकरण करण्यात यावं, अशी मागणी पालवर्गाकडून केली जातेय.

सुरक्षिततेची जबाबदारी शाळा घेत नसल्याने पालक चिंतेत

गेली दोन वर्ष शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थी फक्त ऑनलाईन शिक्षणावर अवलंबून होते. मात्र या शिक्षणात विद्यार्थी खरोखर किती शिकले? हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे आता कुठेतरी शाळा सुरू झाल्याचं पालकांना समाधान असलं, तरी सुरक्षिततेची जबाबदारी मात्र शाळा घेत नसल्यानं पालक चिंतेत पडले आहेत. मुलांचं शैक्षणिक नुकसानही नको आणि सुरक्षाही हवी, अशी भूमिका पालकांची असल्यानं आता पालकांकडून लहान मुलांचं लसीकरण करण्याची मागणी केली जातेय. याकडे आता सरकार गांभीर्यानं लक्ष देतं का? हे पाहावं लागेल. (Demand for vaccination of children from parents in Ambernath)

इतर बातम्या

Jayant Patil: केंद्र सरकारने महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशभरातल्या ओबीसींचं मोठं नुकसान केलंय, जयंत पाटील यांची भाजपवर टीका

Kalyan: कल्याणमध्ये रुग्ण ठणठणीत बरा होऊन घरी गेला अन् ओमिक्रॉनचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.