AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ulhas River : अखेर उल्हास नदी जलपर्णीमुक्त झाली, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडून पाहणी

ड्रोनच्या माध्यमातून जलपर्णीवर औषध फवारणी केली जात होती. याचाच परिणाम म्हणून जलपर्णी हळूहळू नाहीशी होऊन यंदाच्या वर्षी तर जलपर्णी पूर्णपणे गायब झाली. याच स्वच्छ नदीची पाहणी करण्यासाठी आज ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी उल्हास नदीला भेट दिली.

Ulhas River : अखेर उल्हास नदी जलपर्णीमुक्त झाली, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडून पाहणी
अखेर उल्हास नदी जलपर्णीमुक्त झाली
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Feb 09, 2022 | 8:28 PM
Share

उल्हासनगर : ठाणे जिल्ह्याची जीवनवाहिनी समजली जाणारी उल्हास नदी (Ulhas River) अखेर जलपर्णीमुक्त झाली आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर (Rajesh Narvekar) यांनी आज या नदीची पाहणी केली. पश्चिम घाटातून उगम पावणारी उल्हास नदी रायगड आणि ठाणे जिल्ह्यातून वाहते. या नदीतून संपूर्ण ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा केला जातो. मात्र मागील काही दिवसांपासून या नदीवर मोठ्या प्रमाणात जलपर्णीचं आच्छादन पाहायला मिळत होतं. जलपर्णीमुळे नदीतील पाण्यातला ऑक्सिजन कमी होणं, जलचरांना खाद्य न मिळणं या समस्या उद्भवू लागल्यानं ही नदी मृत होण्याची भीती व्यक्त होत होती. त्यामुळं गेल्या वर्षभरापासून शासनाच्या आर्थिक मदतीतून नेरळच्या सगुणा रुरल फाउंडेशनच्या माध्यमातून ही जलपर्णी हटवण्यासाठी उपयोजना केल्या जात होत्या. (Eventually the river Ulhas became water hyacinth free, Inspection by Collector Rajesh Narvekar)

ड्रोनच्या माध्यमातून जलपर्णीवर औषध फवारणी

ड्रोनच्या माध्यमातून जलपर्णीवर औषध फवारणी केली जात होती. याचाच परिणाम म्हणून जलपर्णी हळूहळू नाहीशी होऊन यंदाच्या वर्षी तर जलपर्णी पूर्णपणे गायब झाली. याच स्वच्छ नदीची पाहणी करण्यासाठी आज ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी उल्हास नदीला भेट दिली. सगुणा रुरल फाउंडेशनचे चंद्रशेखर भडसावळे यांच्यासह बोटीत बसून त्यांनी उल्हास नदीची सैर केली. यानंतर उल्हास नदी ही आधीपेक्षा लक्षणीय स्वरूपात स्वच्छ झाली असून पाण्याचा तळ दिसत असल्याचं जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितलं. तसंच नदीतलं प्रदूषण कमी करण्यासाठी सुरुवातीला जलपर्णी हटवण्यात येत असून भविष्यात अन्य मार्गांनी होणारं प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं राजेश नार्वेकर यांनी सांगितलं.

वाहत्या पाण्याचा हा पहिलाच प्रयोग

सगुणा रुरल फाउंडेशनकडून जलपर्णी मारण्यासाठी नदीत केमिकल फवारण्यात आलं असून त्यामुळे नदीतली जीवसृष्टी किंवा जलचर, पाणी यांच्यावर कोणताही परिणाम होणार नसल्याचं सगुणा रुरल फाउंडेशनचे प्रमुख चंद्रशेखर भडसावळे यांनी सांगितलं. तसंच यापूर्वी औरंगाबादमध्ये एका जलाशयात हा प्रयोग यशस्वी झाला असून वाहत्या पाण्यात हा पहिलाच प्रयोग असल्याचं ते म्हणाले. दरवर्षी ही फवारणी करावी लागेल का? हे मात्र अभ्यासानंतरच कळेल, असं त्यांनी स्पष्ट केलं. ठाणे जिल्ह्यातून वाहणाऱ्या उल्हास आणि वालधुनी नदीत गेल्या काही वर्षात प्रचंड प्रदूषण होत होतं. आता उल्हास नदी जलपर्णीमुक्त केल्यानंतर भविष्यात नाल्याचं स्वरूप आलेल्या वालधुनी नदीचं पुनरुज्जीविकरण करण्याचा मानस सगुणा रुरल फाउंडेशनकडून व्यक्त करण्यात आला. (Eventually the river Ulhas became water hyacinth free, Inspection by Collector Rajesh Narvekar)

इतर बातम्या

अश्लील व्हिडीओ शूट करुन प्रियकराकडूनच ब्लॅकमेल, अल्पवयीन मुलीवर सहा महिने तिघांचा गँगरेप

VIDEO | सारं सुरळीत असताना नियती वाईट वागली, विजू मानेंनी काळजाला हात घातला, कविता ऐकतानाच एकनाथ शिंदेंना अश्रू अनावर

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा