AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ना वणवण भटकण्याची वेळ, ना चोरीच्या पाण्याची गरज, कल्याणच्या 27 गावांना हक्काचा पाणी पुरवठा मिळणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण डोंबिवलीच्या पाणी पुरवठ्यासाठी 357 कोटींच्या पाणी पुरवठा योजनेला मान्यता दिली आहे. या योजनेमुळे कल्याण डोंबिवलीमध्ये घराघरापर्यंत पाणी पुरवठा केला जाणार आहे. विशेष म्हणजे 27 गावांमध्ये भीषण पाणीटंचाईला सामोरे जाणाऱ्या नागरिकांना या योजनेमुळे मोठा फायदा होणार आहे.

ना वणवण भटकण्याची वेळ, ना चोरीच्या पाण्याची गरज, कल्याणच्या 27 गावांना हक्काचा पाणी पुरवठा मिळणार
ना वणवण भटकण्याची वेळ, ना चोरीच्या पाण्याची गरज, कल्याणच्या 27 गावांना हक्काचा पाणीपुरवठा मिळणार
| Edited By: Chetan Patil | Updated on: Jan 02, 2025 | 8:20 PM
Share

कल्याण डोंबिवलीच्या 27 गावांमध्ये अनेक ठिकाणी पाणी पुरवठ्याचा मोठा त्रास आहे. अनेक ठिकाणी अधिकृत (लिगल) पाणी पुरवठा नाही. त्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागतं. अनेक ठिकाणी नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावं लागतं. काही ठिकाणी अनियमित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. तसेच काही ठिकाणी नागरिकांना पर्याय नसल्याने एमआयडीच्या पाईपलाईनला टॅब मारुन चोरीचं पाणी प्यावं लागत आहे. इतकी नामुष्की सर्वसामान्य नागरिकांवर ओढवत आहे. विशेष म्हणजे या चोरीच्या पाण्यासाठी देखील नागरिकांना गावगुंडांना पैसे मोजावे लागतात. कारण दांडगायीच्या बळावर त्यांना या गोष्टी सहज करता येतात. पण या सर्व गोष्टींमध्ये सर्वसामान्य माणूस अक्षरश: होरपळला जातो. त्याला पाण्यासाठी वणवण फिरावं लागतं. प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. पण हा त्रास आता नागरिकांना जास्त दिवस सोसावा लागणार नाही. कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वसामान्य नागरिकांचा विचार करुन 357 कोटींच्या पाणी पुरवठा योजनेला मान्यता दिली आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीच्या 27 गावांमधील घराघरात आता नागरिकांच्या हक्काचं पाणी पोहोचणार आहे.

कल्याण डोंबिवली शहरासाठी अमृत योजनेअंतर्गत ३५७ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. यामुळे कल्याण डोंबिवली शहरासह नव्याने समाविष्ट २७ गावांना सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी मदत होणार आहे. याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. या योजनेला मान्यता मिळाल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पूर्ण केल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

नेमकी योजना काय?

अमृत अभियानांतर्गत पाणीपुरवठा, पर्जन्य जलवाहिनी, नागरी परिवहन आणि हरित क्षेत्र विकास इत्यादी पायाभूत सुविधांची निर्मिती शहरांमध्ये करण्यात येत आहे. त्यानुसार कल्याण डोंबिवली शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. कल्याण डोंबिवली शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सुधारित तांत्रिक बदल प्रस्तावाला राज्यस्तरीय तांत्रिक समिती तसेच राज्यस्तरीय उच्चाधिकार सुकाणू समितीच्या बैठकीमध्ये मंजूरी देण्यात आली होती. त्यास अनुसरून या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

अमृत अभियानाची प्रकल्प विकास आणि व्यवस्थापन सल्लागार (PDMC) असणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सादर केलेल्या तांत्रिक बदलाच्या ३५७.१६ कोटी रुपयांच्या प्रकल्प किंमतीस मान्यता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. या योजनेचा लाभ कल्याण डोंबिवली शहरासह नव्याने समाविष्ट २७ गावांना होणार आहे. त्यामुळे सुरळीत पाणीपुरवठा होण्याबरोबरच १०५ दलघमी साठवण क्षमता देखील निर्माण होणार आहे. या योजनेला मान्यता देण्याचा शब्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण-डोंबिवलीकरांना दिला होता. हा दिलेला शब्द पूर्ण केल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे.

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा