AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dombivali Crime : डोंबिवलीतील ‘त्या’ बेकायदा इमारतीवर केडीएमसीचा हातोडा, 40 कुटुंब बेघर

इमारतीचे काम सुरु होताच काही महिन्यानंतर या इमारतीवर कारवाई झाली. मात्र ती कारवाई थांबवत ही इमारत पुन्हा बांधण्यास सुरुवात झाली आता ही इमारत तयार झाल्यावर 40 कुटुंबे त्या ठिकाणी राहण्यासाठी आले असता केडीएमसीने कारवाई सुरु केली.

Dombivali Crime : डोंबिवलीतील 'त्या' बेकायदा इमारतीवर केडीएमसीचा हातोडा, 40 कुटुंब बेघर
डोंबिवलीतील 'त्या' बेकायदा इमारतीवर केडीएमसीचा हातोडा
| Edited By: | Updated on: Dec 28, 2021 | 11:49 PM
Share

डोंबिवली : डोंबिवलीतील दत्तनगर परिसरातील बेकायदा पाच मजली इमारतीवर केडीएमसीने अखेर पाडकामाची कारवाई सुरु केली. या इमारतीत राहण्यास आलेले 40 कुटुंबीय बेघर झाल्याने केडीएमसी प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होणे स्वाभाविक आहे. ज्यावेळी ही इमारत बांधली जात होती. त्यावेळी महापालिकेचे अधिकारी काय झोपले होते का असा संतप्त सवाल बेघर होणाऱ्या नागरिकांनी उपस्थित केला आहे.

बेकायदा बांधकाम असल्याचे सांगत महापिलेकने बेकायदा इमारत घोषित केले

डोंबिवली पूर्व भागातील श्री दत्त कृपा ही पाच मजली इमारत ही वादग्रस्त ठरली होती. बेकायदा बांधकाम असल्याचा ठपका ठेवत महापालिकेने या इमारतीला बेकायदा घोषित केले. ही इमारत वादग्रस्त राहिली आहे. इमारतीचे काम सुरु होताच काही महिन्यानंतर या इमारतीवर कारवाई झाली. मात्र ती कारवाई थांबवत ही इमारत पुन्हा बांधण्यास सुरुवात झाली आता ही इमारत तयार झाल्यावर 40 कुटुंबे त्या ठिकाणी राहण्यासाठी आले असता केडीएमसीने कारवाई सुरु केली. चार तास पोलीस आणि इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांमध्ये गोंधळ सुरु होता. पोलिसांनी बळजबरीने इमारत रिकामी केली. त्यानंतर तोडक कारवाई सुरु झाली. रहिवाशांनी यावेळी प्रचंड संताप व्यक्त केला.

मोडकळीस आलेल्या इमारतीचे रहिवाशांनी स्वखर्चातून केले होते पुनर्बांधकाम

स्थानिक आमदार आणि नगरसेवकामुळे आम्ही रस्त्यावर आलो आहोत. बेघर झालो असा आरोप करण्यात आला. महिला रहिवासी रेखा कांबळे यांनी सांगितले की, 1970 सालापासून या जागेवर आमची इमारत होती. इमारत धोकादायक झाल्याने ती पाडण्यात आली. आम्ही चाळीस कुटुंबिय मिळून ही इमारत बांधली आहे. आम्हाला जबरदस्तीने बाहेर काढले. कोणतीही नोटीस आणि पूर्व सूचना न देता ही कारवाई केली आहे. यासंदर्भात प्रभाग अधिकारी रत्नप्रभा कांबळे यांनी सांगितले, सध्या कारवाई सुरु आहे. संपूर्ण कारवाई झाल्यावर आम्ही याविषयीची माहिती देऊ. मात्र इमारतीचे काम सुरु होते तेव्हा अधिकारी कुठे होते याचे उत्तर देणे टाळले. (KDMC hammers on illegal building in Dombivali, 40 families homeless)

इतर बातम्या

Ulhasnagar: सहकाऱ्यांच्या जामिनासाठी आला, अन पोलिसांना सापडला, उल्हासनगरच्या चालिया साहेब मंदिरातील चोरीचा उलगडा

Malegaon : मालेगाव बॉम्बस्फोट केसमधील साक्षीदाराने साक्ष बदलली, सुनावणी दरम्यान धक्कादायक खुलासा

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.