AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thane: पावसाळ्यात उघड्यावरचे खाणे म्हणजे रोगांना आमंत्रण; ठाण्यात साथीच्या रोगांचे रुग्ण वाढले

ठाणे,  गेल्या पाच दिवसांपासून होत असेल्या मुसळधार पावसामुळे (Thane rain update) जनजीवन विस्कळीत झाले आहे.  पाऊस आणि हवामानातील बदल, यामुळे तापासह साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे.  नुकत्याच कोरोनाच्या (Corona) विळख्यातून बाहेर निघालेल्या नागरिकांना आता नव्या आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.  पावसाळ्यात पचनक्रिया मंदावते आणि रोगप्रतिकारशक्ती कमी होत असल्याने संसर्गजन्य आजारांची लागण होते. पावसाळ्यात  […]

Thane: पावसाळ्यात उघड्यावरचे खाणे म्हणजे रोगांना आमंत्रण; ठाण्यात साथीच्या रोगांचे रुग्ण वाढले
‘फास्ट फूड’ खाण्याचे व्यसन हे पालकांच्या पिण्याच्या सवयींशी जोडलेले असू शकते
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jul 15, 2022 | 12:20 PM
Share

ठाणे,  गेल्या पाच दिवसांपासून होत असेल्या मुसळधार पावसामुळे (Thane rain update) जनजीवन विस्कळीत झाले आहे.  पाऊस आणि हवामानातील बदल, यामुळे तापासह साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे.  नुकत्याच कोरोनाच्या (Corona) विळख्यातून बाहेर निघालेल्या नागरिकांना आता नव्या आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.  पावसाळ्यात पचनक्रिया मंदावते आणि रोगप्रतिकारशक्ती कमी होत असल्याने संसर्गजन्य आजारांची लागण होते. पावसाळ्यात  दूषित पाणी पिण्यात आल्याने पोटाचे विकार होतात. यात अतिसार, गॅस्ट्रो, कावीळ, टायफॉडड, तसेच काविळीचीही लागण होते. यासाठी पाणी उकळून पिण्याचे आवाहन डॉक्टरांकडून व केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य विभागाकडून केले जाते. डेंग्यू हा विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. डेंग्यू तापाचा प्रसार हा स्वच्छ पाण्याच्या साठ्यात उत्पत्ती होणाऱ्या एडिस डासापासून होतो.

यासाठी आठवड्यातील एक दिवस संपूर्ण कोरडा दिवस पाळण्याचे आवाहनही केले जाते. पावसाळा सुरू झाला की, विविध आजारही वाढू लागतात. सध्या कधी जोरदार, तर कधी रिपरिप पडणाऱ्या पावसामुळे बदललेल्या हवामानात शहरातील विविध भागांमधील दवाखाने तापासह अन्य साथीच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांनी भरलेले आहेत.

पाण्याबाबत विशेष काळजी घेणे आवश्यक

पावसाळ्याच्या दिवसात बऱ्याच ठिकाणी दूषित पाण्याचा पुरवठा होतो. आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांनी गाळून आणि उकळून पाणी वापरावे असे आवाहन दरवर्षी केडीएमसीकडून केले जाते. पावसाच्या संततधारेमुळे धरण, तसेच नद्यांमधील पाणी गढूळ होण्याची दाट शक्यता असते. त्यावर मनपाच्या जल केंद्रात प्रक्रिया करून, पिण्यायोग्य पाणी नागरिकांपर्यंत पोहोचविले जाते, परंतु त्यानंतरही प्रक्रिया केलेले पाणी काही प्रमाणात गढूळ असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वैद्यकीय आरोग्य प्रशासनाकडून पाणी गाळून, उकळून पिण्याकडे सातत्याने लक्ष वेधले जाते.

पावसाळ्यात शिळे आणि बाहेरचे पदार्थ खाणे टाळा

पावसाळ्यात बाहेरचे पदार्थ खाणे टाळले पाहिजे.  दूषित अन्न खाल्ल्यामुळे पोटाचे विविध आजार, उलट्या, जुलाब, अतिसार,कॉलरा, कावीळ यासारखे आजार होतात. उघड्यावरील खाद्यपदार्थांवर माशा बसतात. ते अन्न खाल्यास कॉलरा, पटकी यासारख्या आजारांची लागण होते.

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?