AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाच दिवसांपासून बेपत्ता तरुणाचा मृतदेह विहिरीत आढळला, जळगाव हादरलं

जळगावच्या यावल तालुक्यातील मोहराळा गावात पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह विहिरीत आढळून आला आहे. साहिल शब्बीर तडवी असं या 19 वर्षांच्या मृत तरुणाचं नाव आहे.

पाच दिवसांपासून बेपत्ता तरुणाचा मृतदेह विहिरीत आढळला, जळगाव हादरलं
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 21, 2025 | 5:06 PM
Share

जळगावातून मोठी बातमी समोर येत आहे. जळगावच्या यावल तालुक्यातील मोहराळा गावात पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह विहिरीत आढळून आला आहे. साहिल शब्बीर तडवी असं या 19 वर्षांच्या मृत तरुणाचं नाव आहे, तरुणाचा घातपात झाला आहे, त्याची हत्या करण्यात आली, असा संशय साहिल तडवीच्या कुटुंबाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

या प्रकरणात मृत तरुणाच्या कुटुंबीयांसह समाजबांधवांनी जळगावच्या पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलं आहे, घातपाताचा संशय व्यक्त करत आरोपींना लवकरात लवकर अटक करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी मृत साहील तडवीच्या कुटुंबाकडून करण्यात आली आहे.

काय आहे नेमका आरोप 

काही दिवसांपूर्वी गावातीलच एका व्यक्तीनं कौटुंबिक वादातून मुलाला मारून टाकण्याची धमकी दिली होती. याच कौटुंबिक वादातून त्या व्यक्तीने काही जणांना सोबत घेऊन मुलाला मारहाण करत त्याचा खून केल्याचा संशय मृत तरुण साहिल तडवीच्या आई-वडिलांकडून व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही पोलीस गुन्हा दाखल करत नसल्यामुळे मृत तरुणाच्या कुटुंबातील तसेच इतर समाजबांधवांनी आज पोलीस अधिक्षकांची भेट घेतली. आरोपींना अटक करावी, त्यांच्यावर तातडीनं कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी  मृत तरुणाच्या कुटुंबाकडून करण्यात आली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण? 

जळगावच्या यावल तालुक्यातील मोहराळा गावात ही घटना घडली आहे. येथील साहिल शब्बीर तडवी नावाचा तरुण गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता होता. त्यानंतर आता त्याचा मृतदेह विहिरीत आढळून आला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. नेमका साहिल याचा मृत्यू कशामुळे झाला, त्याचा मृतदेह विहिरीत कसा आला? हे अद्याप अस्पष्ट आहे.

मात्र त्याच्या कुटुंबाकडून या प्रकरणात घातपात आणि हत्येचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. आरोपींना लवकरात लवकर पकडलं जावं, त्यांना फाशी व्हावी अशी मागणी साहिलच्या कुटुंबानं केली आहे. या प्रकरणात साहिलच्या कुटुंबानं जळगावच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेतली.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत