AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Grampanchyat | ग्रामपंचायतींचा संपेना वनवास! 62 वर्षांपासून इमारतीविनाच हाकताय कारभार

Grampanchyat | जिल्ह्यातील 62 ग्रामपंचायती, जिल्हा निर्मितीपासून वनवासात आहेत. या ग्रामपंचायतींच्या प्रमुखांना विना इमारतच कारभार हाकावा लागत आहे. तर ज्यांना इमारती आहेत, त्यातील काहींची अवस्था बिकट झाली आहे. त्यांच्या स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची आवश्‍यकता आहे.

Grampanchyat | ग्रामपंचायतींचा संपेना वनवास! 62 वर्षांपासून इमारतीविनाच हाकताय कारभार
| Updated on: Mar 06, 2024 | 11:50 AM
Share

शंकर देवकुळे, प्रतिनिधी, सांगली | 6 March 2024 : गावाचा कारभार हाकणाऱ्या सांगली जिल्ह्यातील 62 ग्रामपंचायतीला इमारतीच नाहीत. कुठे वाचनालयात तर कुठे भाड्याच्या खोलीत त्यांचा कारभार सुरु आहे. काहींची पडझड झाली आहे. यातूनच गावचा कारभार सुरू आहे. जिल्ह्यातील 634 ग्रामपंचायतींना स्वतःची इमारत असली, तरी यातील बऱ्याचशा इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची आवश्‍यकता आहे. त्यामुळे हा भोग अजून किती दिवस नशीब आहे, असा सवाल गावाचे पुढारी विचारत आहेत.

भोग काही सरना

जिल्ह्याच्या निर्मितीला 62 वर्षे झाली. जिल्ह्यातील 634 ग्रामपंचायतींना स्वतःची इमारत आहे. तर 62 ग्रामपंचायतींना स्वतःची इमारत नाही. शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना इमारत बांधण्यासाठी निधी दिला जातो. जिल्ह्यातील सहाशे ग्रामपंचायतींच्या स्वतःच्या इमारती आहेत. मात्र, त्यातीलही 28 इमारती अपूर्णावस्थेत आहेत. त्यांची कामेही रेंगाळली आहेत, तर निर्लेखनासाठी दोन इमारतींचे प्रस्ताव पाठवले आहेत.

निधीसाठी पहावी लागतेय वाट

ग्रामपंचायत हा पंचायतराज व्यवस्थेतील सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळेच शासन आता वित्त आयोगाचे पैसे थेट ग्रामपंचायतींना देत आहे. त्यातून गावची विकास कामे केली जात आहेत. मात्र ग्रामपंचायतींना अजूनही इमारतीसाठी वाट पहावी लागत आहे. त्यांना निधीची प्रतिक्षा आहे.

जिल्हा निर्मितीपासून वनवास

सांगली जिल्ह्याची निर्मिती एक मे 1962 मध्ये झाली असली, तरी तत्पूर्वी दक्षिण सातारा जिल्हा होता. आज जिल्ह्यात 696 ग्रामपंचायती असल्या, तरी अनेक ग्रामपंचायतींच्या इमारती या सांगली जिल्ह्याच्या निर्मितीपूर्वीच्या आहेत. प्रशासनाकडील नोंदीनुसार मिरज तालुक्यातील बुधगाव ग्रामपंचायतीचे कार्यालय सर्वांत जुने आहे. संस्थानकालीन दगडी इमारतीमध्ये हे कार्यालय असून ती 1935 ची आहे. मालगाव ग्रामपंचायतीची इमारत जुनी आहे. लोकवर्गणी, स्वनिधीतून इमारती जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींच्या इमारती या लोकवर्गणी, तसेच स्वनिधीतून उभारण्यात आल्या आहेत. यातील बऱ्यापैकी इमारती या जुन्या झाल्या असून त्यांच्या स्ट्रक्चरल ऑडिटची आवश्‍यकता आहे.

जत तालुक्यात इमारतींचा दुष्काळ

जत तालुक्यात 23 ग्रामपंचायतींना इमारत नाही. जिल्ह्यातील सर्वांत मोठा तालुका असलेल्या जत तालुक्यात सर्वाधिक 23 ग्रामपंचायती स्वतःच्या इमारतीविना आहेत. यामध्ये वळसंग, काराजनगी, कुडणूर, जालिहाळ, अंकलगी, बालगाव अशा काही महत्त्वाच्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.त्याखालोखाल शिराळा, वाळवा तालुक्यात प्रत्येकी आठ ग्रामपंचायतींना स्वतःची इमारत नाही. आटपाडी, कवठेमहांकाळ आणि कडेगाव या तीन तालुक्यांत स्वतःची इमारत असणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या अधिक आहे.

50 इमारती धोकादायक?

जिल्ह्यात 1990 पूर्वी उभारण्यात आलेल्या 50 इमारती आहेत, तर 1976 पूर्वी उभारण्यात आलेल्या तीस इमारती आहेत. त्यामुळे या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट होण्याची आवश्‍यकता आहे. या इमारतींचे आयुष्य 35 ते 50 वर्षांहून अधिक असल्याने ग्रामपंचायत विभागाने त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची आवश्‍यकता आहे.

Follow Us
पवनराजे निंबाळकर प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिय
पवनराजे निंबाळकर प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; थेट अमित शाह...
निंबाळकरांचा निर्णय आता उद्धव ठाकरेंच्या कोर्टात!
Omraje Nimbalkar | निंबाळकरांचा निर्णय आता उद्धव ठाकरेंच्या कोर्टात! अनिल देसाईंच्या त्या विधानाने महाराष्ट्रात खळबळ
ओमराजेंचे कट्टर समर्थक कैलास पाटील मातोश्रीवर, राजकारणात मोठं घडणार?
Omraje Nimbalkar | ओमराजेंचे कट्टर समर्थक कैलास पाटील अचानक 'मातोश्री'वर, राजकारणात मोठं घडणार?
मी शिंदे गटात... ओमराजेंचा निर्णय बदलला? त्या एका विधानानं खळबळ
Omraje Nimbakakar | मी शिंदे गटात... ओमराजेंचा निर्णय बदलला? त्या एका विधानानं खळबळ
दुर्दैव! हायकोर्टात जाणार... निंबाळकर निकालावर ओमराजेंची प्रतिक्रिया
दुर्दैव! हायकोर्टात जाणार...पवनराजे निंबाळकर निकालावर ओमराजेंची पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! आरोपींची निर्दोष मुक्तता, मात्र खोट्या साक्षीदारामुळे खटला
मोठी बातमी! आरोपींची निर्दोष मुक्तता, मात्र खोट्या साक्षीदारामुळे खटला... पवनराजे निंबाळकर प्रकरणात कायदेतज्ज्ञ काय म्हणाले?
20 वर्षांनंतरचा निकाल! माफीचा साक्षीदार विश्वासार्ह नाही; सर्व आरोपी..
मोठी बातमी! 20 वर्षांनंतरचा निकाल! माफीचा साक्षीदार विश्वासार्ह नाही; पद्मसिंह पाटलांसह सर्व आरोपी निर्दोष
1 रुपया देतात, 100 रुपये काढतात, ठाकरेंकडून लाडकी बहीण योजनेची पोलखोल
Raj Thackeray | 1 रुपया देतात, 100 रुपये काढतात, राज ठाकरेंकडून लाडकी बहीण योजनेची पोलखोल; सरकारची पिसेच काढली
निकालाचे वाचन; इंद्रप्रस्थ गेस्ट हाऊसमाध्ये... पवनराजे निंबाळकर प्रकरण
Video | निकालाचे वाचन; इंद्रप्रस्थ गेस्ट हाऊसमाध्ये... पवनराजे निंबाळकर प्रकरणात नेमकं काय घडलं?
एकच खळबळ! भाजपमध्ये भयंकर घडतंय... नरेंद्र मोदी आहे तोपर्यंतच शांतता..
एकच खळबळ! भाजपमध्ये भयंकर घडतंय... नरेंद्र मोदी आहे तोपर्यंतच शांतता... राज ठाकरेंचा मोठा दावा