AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NANDURBAR : पोल्ट्री व्यवसाय अडचणीत, सहा महिन्यांपासून अंड्याचे दर कमी, उत्पादन खर्चही निघत नसल्याची उद्योजकांची व्यथा

देशात डिझेलच्या वाढत्या किमतींचा परिणाम हा पोल्ट्री व्यवसायावर झाल्याचे दिसून येते वाहतुकीचे दर वाढले आहेत. तसेच पोल्ट्री व्यवसायिकांना त्याचे दर वाढले असल्याने व्यवसाय अडचणीत येत असल्याचे चित्र आहे असंही आरिफभाई यांनी सांगितलं.

NANDURBAR : पोल्ट्री व्यवसाय अडचणीत, सहा महिन्यांपासून अंड्याचे दर कमी, उत्पादन खर्चही निघत नसल्याची उद्योजकांची व्यथा
पोल्ट्री व्यवसाय अडचणीतImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 29, 2022 | 2:39 PM
Share

नंदूरबार : उत्तर महाराष्ट्रातील (Maharashtra) सर्वात मोठा पोल्ट्री हब (Poultry Hub) म्हणून ओळख असलेल्या नवापूरचा (Navapur) पोल्ट्री उद्योग सध्या अडचणीत सापडला आहे. त्यामागील कारणंही तसंच आहे, पोल्ट्री फीड म्हणून ओळख असलेल्या कोंबड्यांच्या खाद्याचा दर वाढला आहे. त्या तुलनेने अंड्यांचे दर वाढत नसल्याने व्यवसाय तोट्यात जाऊन बंद पडण्याची भीती पोल्ट्री उद्योजकांना वाटत आहे. कोंबड्यासाठी तयार होत असलेलं खाद्य अधिक महागलं आहे. त्यामुळे एका कोंबडीतून मिळणार उत्पन्न हे सगळं कोंबडीच्या खाद्यावर खर्च होत आहे. मागील चार महिन्यांपासून हे सुरू असल्याने पोल्ट्री व्यवसाय अडचणीत आला आहे.

गेल्या 6 महिन्यापासून अंड्याच्या दर चार रुपयापेक्षा कमी

वाढत्या महागाईचा फटका जसा सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. त्या पद्धतीने पोल्ट्री व्यवसायिकांना ही फटका बसत असल्याचे चित्र दिसून येत आहे. नवापूर मधील पोल्ट्री हबमध्ये कोंबड्यांसाठी खाद्य ही तयार केले जाते. त्यासाठी लागणारा मका इतर कडधान्य ढेप तसेच इतर पदार्थांचा दर महागला आहे. त्यामुळे कोंबड्यांसाठी तयार केल्या जाणाऱ्या खाद्याच्या किमतीत जवळ पास 20 टक्के वाढ झाली आहे. एका अंड्यासाठी कोंबडीवर होणारा खर्च जवळपास 4 रुपये इतका आहे. गेल्या 6 महिन्यापासून अंड्याच्या दर चार रुपयापेक्षा कमी असल्याने पोल्ट्री उद्योजकांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे अशी माहिती अध्यक्ष नवापूर पोल्ट्री उत्पादक असोशियन आरिफभाई यांनी सांगितली.

देशात डिझेलच्या वाढत्या किमतींचा परिणाम

देशात डिझेलच्या वाढत्या किमतींचा परिणाम हा पोल्ट्री व्यवसायावर झाल्याचे दिसून येते वाहतुकीचे दर वाढले आहेत. तसेच पोल्ट्री व्यवसायिकांना त्याचे दर वाढले असल्याने व्यवसाय अडचणीत येत असल्याचे चित्र आहे असंही आरिफभाई यांनी सांगितलं. केंद्र आणि राज्य सरकारने पोल्ट्री व्यवसायिक यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना मदतीसाठी पुढे येणे गरजेचे आहे.

परिस्थिती अशीच राहिली तर देशातील पोल्ट्री व्यवसाय धोक्यात येण्याचे संकेत असल्याचे चित्र आहे.

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.