AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NANDURBAR : पोल्ट्री व्यवसाय अडचणीत, सहा महिन्यांपासून अंड्याचे दर कमी, उत्पादन खर्चही निघत नसल्याची उद्योजकांची व्यथा

देशात डिझेलच्या वाढत्या किमतींचा परिणाम हा पोल्ट्री व्यवसायावर झाल्याचे दिसून येते वाहतुकीचे दर वाढले आहेत. तसेच पोल्ट्री व्यवसायिकांना त्याचे दर वाढले असल्याने व्यवसाय अडचणीत येत असल्याचे चित्र आहे असंही आरिफभाई यांनी सांगितलं.

NANDURBAR : पोल्ट्री व्यवसाय अडचणीत, सहा महिन्यांपासून अंड्याचे दर कमी, उत्पादन खर्चही निघत नसल्याची उद्योजकांची व्यथा
पोल्ट्री व्यवसाय अडचणीतImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 29, 2022 | 2:39 PM
Share

नंदूरबार : उत्तर महाराष्ट्रातील (Maharashtra) सर्वात मोठा पोल्ट्री हब (Poultry Hub) म्हणून ओळख असलेल्या नवापूरचा (Navapur) पोल्ट्री उद्योग सध्या अडचणीत सापडला आहे. त्यामागील कारणंही तसंच आहे, पोल्ट्री फीड म्हणून ओळख असलेल्या कोंबड्यांच्या खाद्याचा दर वाढला आहे. त्या तुलनेने अंड्यांचे दर वाढत नसल्याने व्यवसाय तोट्यात जाऊन बंद पडण्याची भीती पोल्ट्री उद्योजकांना वाटत आहे. कोंबड्यासाठी तयार होत असलेलं खाद्य अधिक महागलं आहे. त्यामुळे एका कोंबडीतून मिळणार उत्पन्न हे सगळं कोंबडीच्या खाद्यावर खर्च होत आहे. मागील चार महिन्यांपासून हे सुरू असल्याने पोल्ट्री व्यवसाय अडचणीत आला आहे.

गेल्या 6 महिन्यापासून अंड्याच्या दर चार रुपयापेक्षा कमी

वाढत्या महागाईचा फटका जसा सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. त्या पद्धतीने पोल्ट्री व्यवसायिकांना ही फटका बसत असल्याचे चित्र दिसून येत आहे. नवापूर मधील पोल्ट्री हबमध्ये कोंबड्यांसाठी खाद्य ही तयार केले जाते. त्यासाठी लागणारा मका इतर कडधान्य ढेप तसेच इतर पदार्थांचा दर महागला आहे. त्यामुळे कोंबड्यांसाठी तयार केल्या जाणाऱ्या खाद्याच्या किमतीत जवळ पास 20 टक्के वाढ झाली आहे. एका अंड्यासाठी कोंबडीवर होणारा खर्च जवळपास 4 रुपये इतका आहे. गेल्या 6 महिन्यापासून अंड्याच्या दर चार रुपयापेक्षा कमी असल्याने पोल्ट्री उद्योजकांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे अशी माहिती अध्यक्ष नवापूर पोल्ट्री उत्पादक असोशियन आरिफभाई यांनी सांगितली.

देशात डिझेलच्या वाढत्या किमतींचा परिणाम

देशात डिझेलच्या वाढत्या किमतींचा परिणाम हा पोल्ट्री व्यवसायावर झाल्याचे दिसून येते वाहतुकीचे दर वाढले आहेत. तसेच पोल्ट्री व्यवसायिकांना त्याचे दर वाढले असल्याने व्यवसाय अडचणीत येत असल्याचे चित्र आहे असंही आरिफभाई यांनी सांगितलं. केंद्र आणि राज्य सरकारने पोल्ट्री व्यवसायिक यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना मदतीसाठी पुढे येणे गरजेचे आहे.

परिस्थिती अशीच राहिली तर देशातील पोल्ट्री व्यवसाय धोक्यात येण्याचे संकेत असल्याचे चित्र आहे.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.