AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनिल देशमुखांना बोगस केसमध्ये अडकवलं, हा राजकीय डाव उलटवून लावू; नवाब मलिक फ्रंटफूटवर

नवाब मलिक म्हणाले की, एका अधिकाऱ्याच्या मुलालाही मुद्दाम बोगस केसमध्ये अडकवण्यात आलं आहे. त्यांच्या मुलाला एका गुन्ह्यात आरोपी बनवण्यात आलं आहे.

अनिल देशमुखांना बोगस केसमध्ये अडकवलं, हा राजकीय डाव उलटवून लावू; नवाब मलिक फ्रंटफूटवर
नवाब मलिक, राष्ट्रवादी काँग्रेस.
| Edited By: | Updated on: Nov 18, 2021 | 11:49 AM
Share

मुंबईः माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना एका बोगस केसमध्ये अडकवलं आहे. हा राजकीय डाव आम्ही उलटवून लावू, असा दावा गुरुवारी नवाब मलिका यांनी केला. मलिक यांनी यावेळी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधातही मोर्चा उघडला. वानखेडेंनी एका अधिकाऱ्याच्या मुलाला ड्रग्जच्या बोगस केसमध्ये अडकवलं. त्याविरोधात बोलू नये म्हणून दबाव टाकण्यात येतोय, असा दावा त्यांनी केला. सोबतच त्यांच्याविरोधात महापालिका आणि शाळेचे दस्तावेज कोर्टात दिल्याचंही सांगितलं. मलिकांचे आरोप आणि दावे पाहता येणाऱ्या काळात वानखेडे यांच्याकडून यावर कोणी बोलणार का, की ते स्वतः मीडियात आपली बाजू मांडणार याची उत्सुकता आहे.

देशमुखांना अडकवले

नवाब मलिक पुढे म्हणाले की, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग फरार आहेत. विशेष म्हणजे तेच तक्रारदार आहेत. त्यामुळं माजी मंत्री अनिल देशमुख यांना अडकवण्याचा हा राजकीय डाव आहे, पण हा डाव आम्ही उलटवून लावू. तक्रारदार फरार आहेत, तर चौकशी कशी होणार, असा सवालही त्यांनी केला. अनिल बोंडे एका क्लाऊडवर बोलत होते. त्यात त्यांनी काही विधान केलं आहे. दंगलीसंदर्भातला जो ऑडियो आहे, तो मी ट्विट केला आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

एका महिलेवरही दबाव

नवाब मलिकांनी आजही आक्रमक भूमिका घेतली. पत्रकारांशी बोलतना ते म्हणाले की, एका अधिकाऱ्याच्या मुलालाही मुद्दाम बोगस केसमध्ये अडकवण्यात आलं आहे. त्यांच्या मुलाला एका गुन्ह्यात आरोपी बनवण्यात आलं. जे आधी लग्न झालं होतं, त्या महिलेला आता धमकावण्यात येत आहे. त्या महिलेच्या कुटुंबातील एका मुलाला ड्रग प्रकरणात पकडण्यात आलंय. त्यांनी विरोधात बोलू नये यासाठी दबाव टाकला जातोय, असा घणाघाती आरोपही त्यांनी यावेळी केली.

कागदपत्रे दिली

मलिक यांनी यापूर्वी समीर वानखेडे यांच्या धर्मावर प्रश्न उपस्थित केले होते. ते त्यांचा उल्लेख नेहमीच समीर दाऊद वानखेडे असा करतात. आजच्या पत्रकार परिषदेतही त्यांनी याबाबत विविध प्रश्न उपस्थित करत माहिती दिली. मलिक म्हणाले की, वानखेडे यांच्या वडिलांनी माझ्याविरोधात‌ केस टाकली आहे. त्यात आम्ही काही अतिरिक्त कागदपत्रे दिली आहेत. त्यात शाळा सोडल्याचा दाखला देण्यात आला आहे. आम्ही पालिकेकडून आणि शाळेकडून मिळालेले दस्तावेज कोर्टात दाखल केले आहेत.

इतर बातम्याः

Nashik| ऐन निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी भाजपकडून महापालिकेत 2632 पदांची नोकर भरती

Controversial Health Exam: तक्रारींच्या निराकरणानंतरच नियुक्त्या; आरोग्य मंत्र्यांचे आदेश

Nashik| महापालिकेतील भाजप सत्ताधाऱ्यांचा घरच्या नगरसेवकांकडून करेक्ट कार्यक्रम, Water Grace घोटाळ्याचे महासभेत फोडले बिंग!

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.