AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ही काँग्रेस पक्षासाठी धोक्याची घंटा; बच्चू कडू यांनी सांगितलं

पक्ष प्रवेश आणि न्यायालयामुळे मंत्र्यांची तारीख वर तारीख येत आहे. पुढील 15 दिवसांत अधिवेशनाच्या आधी मोठ्या प्रमाणावर पक्ष प्रवेश होईल, अशी अपेक्षा बच्चू कडू यांनी व्यक्त केली.

ही काँग्रेस पक्षासाठी धोक्याची घंटा; बच्चू कडू यांनी सांगितलं
बच्चू कडू
| Edited By: | Updated on: Feb 09, 2023 | 10:56 PM
Share

अमरावती : काँग्रेसमध्ये (Congress) पक्षफुटीचं वातावरण असल्याचं मत प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bachu Kadu) यांनी म्हंटलंय. काँग्रेससोबत लोकं जुळायला तयार आहेत. मात्र, ते फुटत आहेत, असंही बच्चू कडू यांनी म्हटंलय. बच्चू कडू म्हणाले, आधीचं महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष हा पाचव्या क्रमांकावर गेला. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पदयात्रा काढली. पण, त्यानंतर काँग्रेसमध्ये फुटीचं वातावरण आहे. महाराष्ट्रातून यात्रा गेली. त्याचे परिणाम चांगले आले पाहिजे होते. पण, पक्षफुटीचे रिझल्ट येत आहेत. हे फार चुकीचं आहे. काँग्रेस पक्षाला चिंतन करण्याची गरज आहे. राहुल गांधी यात्रा काढतात. महाराष्ट्रातून जातात. वातावरण ढवळून निघते. सामान्य लोकं जुळायला तयार असतात. पण, नेते मात्र फुटतात. ही निश्चितच काँग्रेस पक्षासाठी धोक्याची घंटा असल्याचंही बच्चू कडू यांनी सांगितलं.

या आमदारांचा पक्ष प्रवेश होणार?

ठाकरे गट वगळता दुसऱ्या पक्षातील 10-15 आमदारांचा पक्ष प्रवेश होऊ शकतो. असा दावा आमदार बच्चू कडू यांनी केला. 20-25 आमदार जरी इकडे तिकडे झाले तरी सरकार मजबुतीने पूर्ण काळ पूर्ण करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पक्ष प्रवेश आणि न्यायालयामुळे मंत्र्यांची तारीख वर तारीख येत आहे. पुढील 15 दिवसांत अधिवेशनाच्या आधी मोठ्या प्रमाणावर पक्ष प्रवेश होईल, अशी अपेक्षा बच्चू कडू यांनी व्यक्त केली.

सरकार जाण्याचं कारण नाही. सरकार बहुमतात नाही. तर अतिबहुमतात आहे. काही आमदार इडके-तिकडे झाले तरी सरकार मजबुतीनं उभ राहील. इतर पक्षातील काही जणांना पक्षप्रवेश होऊ शकतो, अशी शक्यताही बच्चू कडू यांनी व्यक्त केली. १० ते १५ आमदारांचा अधिवेशनापूर्वी पक्षप्रवेश होईल, अशी शक्यताही बच्चू कडू यांनी व्यक्त केली.

आदित्य ठाकरे यांना सुनावलं

आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना बच्चू कडू म्हणाले, आव्हान देणे हे पोचट झालं आहे. या आव्हानांना काही अर्थ नाही. हा बालीशपणा आहे. जेव्हा विधानसभा निवडणूक होईल तेव्हा आव्हान दिले पाहिजे.

तुम्हाला एवढीच हौस असेल तर शिंदे साहेबांच्या मतदारसंघात जाऊन तुम्ही लढा. तुम्ही माझ्या घरी या मी तुम्हाला दाखवून देईल. याला काही अर्थ नसतो, असंही बच्चू कडू यांनी आदित्य ठाकरे यांनी सुनावलं.

Follow Us
राहुल गांधींनी एपस्टाईन फाइल्सचा विषय काढताच प्रकरण तापलं
राहुल गांधींनी एपस्टाईन फाइल्सचा विषय काढताच प्रकरण तापलं.
देशात गॅसची टंचाई, सध्या स्थिती काय? सरकार नेमकं काय खबरदारी घेतंय
देशात गॅसची टंचाई, सध्या स्थिती काय? सरकार नेमकं काय खबरदारी घेतंय.
तेल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकार सज्ज; नेमका काय काय खबरदारी
तेल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकार सज्ज; नेमका काय काय खबरदारी.
भारताने कुणाकडून तेल घ्यायचं हे अमेरिका का ठरवेल?
भारताने कुणाकडून तेल घ्यायचं हे अमेरिका का ठरवेल?.
हार्दिक पांड्यांच्या अडचणीत आणखी वाढ, गर्लफ्रेंडसोबत...
हार्दिक पांड्यांच्या अडचणीत आणखी वाढ, गर्लफ्रेंडसोबत....
लोकसभेत आज गॅस तुटवड्यावर चर्चा, राहुल गांधी केंद्र सरकारला घेरणार?
लोकसभेत आज गॅस तुटवड्यावर चर्चा, राहुल गांधी केंद्र सरकारला घेरणार?.
केंद्राने व्यावसायिक गॅसचा पुरवठा रोखला... या कंपनीची कोर्टात धाव
केंद्राने व्यावसायिक गॅसचा पुरवठा रोखला... या कंपनीची कोर्टात धाव.
गुड न्यूज... टेन्शनच मिटलं, सौदीतून मुंबईत आलं कच्च्या तेलाचं जहाज
गुड न्यूज... टेन्शनच मिटलं, सौदीतून मुंबईत आलं कच्च्या तेलाचं जहाज.
हॉटेल, कॅटरर्स बंद, उपासमारीची वेळ; गॅस सिलेंडरचा पुरवठाच....
हॉटेल, कॅटरर्स बंद, उपासमारीची वेळ; गॅस सिलेंडरचा पुरवठाच.....
1 हजार 900 रुपयांचं सिलेंडर 4500 रुपयांना, ठाण्यात काळाबाजाराचा हैदोस
1 हजार 900 रुपयांचं सिलेंडर 4500 रुपयांना, ठाण्यात काळाबाजाराचा हैदोस.