AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! खासदारानंतर आता आमदारही फुटणार? उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला 3 आमदार अनुपस्थित

आज उद्धव ठाकरे यांनी आमदारांची बैठक बोलावली आहे, मात्र या बैठकीला तीन आमदार अनुपस्थित असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे 6 बंडकोर खासदार हे आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

मोठी बातमी! खासदारानंतर आता आमदारही फुटणार? उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला 3 आमदार अनुपस्थित
uddhav thackerayImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 22, 2026 | 4:05 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे, 6 खासदारांनी शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी केली आहे. हे सर्व खासदार एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. थोड्याच वेळात त्यांचा शिवसेना शिंदे गटात अधिकृत प्रवेश होणार आहे. या सर्व घडामोडी घडत असतानाच आज उद्धव ठाकरे यांनी आमदारांची बैठक बोलावली आहे, मात्र या बैठकीला तीन आमदार अनुपस्थित असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. उद्धव ठाकरे यांनी खासदारांची बैठक बोलावली होती, या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाच्या 9 पैकी फक्त 4 खासदारांचीच उपस्थिती होती, त्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये राज्याने ऑपरेशन टायगर पाहिलं. 6 खासदारांनी शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी केली, हे सर्व खासदार आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी घडामोडींना वेग आला आहे.

तर दुसरीकडे आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे, परंतु या बैठकीला तीन आमदार उपस्थित नसल्याची माहिती समोर आली आहे. आमदार संजय पोतनीस, आमदार संजय दरेकर आणि आमदार राहुल पाटील हे या बैठकीला अनुपस्थित आहेत. त्यामुळे आता चर्चेला उधाण आलं आहे. आमदारांची उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर बैठकस्थळी पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आला आहे.

बंडखोर खासदांराची शिंदेंसोबत बैठक 

दरम्यान दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटातून बंड केलेले सर्व खासदार आता एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. या सर्व बंडखोर खासदारांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत बैठक सुरू आहे. गेल्या दोन तासांपासून ही बैठक सुरू आहे. सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार खासदार संजय जाधव आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. या खासदारांचं बंड हा शिवसेना ठाकरे गट आणि उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे, तो म्हणजे जिथे-जिथे बंडखोरी झाली, त्या सर्व मतदारसंघात आता उद्धव ठाकरे भेट देणार आहेत.

Follow Us
उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसलेलेही त्यांनी फसवतायेत? बड्या नेत्याच्या
उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसलेलेही त्यांनी फसवतायेत? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ऑपरेशन टायगर 2 पण होणार, शिंदेंच्या बड्या नेत्याने दिले मोठे संकेत
मोठी बातमी! 6 खासदारांनंतर आणखी मोठा धक्का; ऑपरेशन टायगर 2 पण होणार, शिंदेंच्या शिवसेनेच्या बड्या नेत्याने दिले मोठे संकेत
उद्धव ठाकरेंची 20 आमदारांसोबत बैठक, बैठकीला कोण हजर अन् कोण गैरहजर?
Thackeray MLA Meeting | उद्धव ठाकरेंची 20 आमदारांसोबत बैठक, बैठकीला कोण हजर अन् कोण गैरहजर?
कोणाला माहितीच नाही! ओमराजेंना अचानक रात्री 2 वाजता... शिंदे गटातील
कोणाला माहितीच नाही! ओमराजेंना अचानक रात्री 2 वाजता... शिंदे गटातील बड्या नेत्याने सांगितलं त्या भेटीगाठीचं गुपित
फुटीर खासदार मुंबईत अन् राऊतांचे ट्विट; चित्रगुप्ताने पापांचा हिशोब...
Sanjay Raut | फुटीर खासदार मुंबईत अन् राऊतांचे ट्विट; चित्रगुप्ताने पापांचा हिशोब लिहायला सुरुवात...
मोठी घडामोड! 4 वाजताचा मुहूर्त ठरला, मात्र बंडखोर खासदार दोन वाजताच...
मोठी बातमी! 4 वाजताचा मुहूर्त ठरला, मात्र बंडखोर खासदार दोन वाजताच... मुंबई विमानतळावरील व्हिडीओमध्ये नेमकं काय?
विधान परिषदेत कुणी कुणाला दिला दगा? मतफुटीची धक्कादायक आकडेवारी समोर
Vidhan Parishad Election | विधान परिषदेत कुणी कुणाला दिला दगा? मतफुटीची धक्कादायक आकडेवारी समोर
भाजप कुणाचाही मित्र नाही, जवळच्यांचा घात... राष्ट्रवादीतील बड्या
भाजप कुणाचाही मित्र नाही, जवळच्यांचा घात... राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
गोकुळ गीतेंच्या विजयाने कुटुंब भावूक; बहिणीला अश्रू अनावर
Nashik Vidhan Parishad | गोकुळ गीतेंच्या विजयाने कुटुंब भावूक; बहिणीला अश्रू अनावर
महायुतीला धक्का देत जिंकले, पण विजय मिळताच मागितली माफी!
Gokul Gite | महायुतीला धक्का देत जिंकले, पण विजय मिळताच मागितली माफी! गोकुळ गीतेंचं मोठं विधान