AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘कंपनीने बाधित मुलांना नुकसान भरपाई दिलीच पाहिजे’, वायूगळतीवर उदय सामंत आक्रमक

रत्नागिरीतील जिंदाल कंपनीत झालेल्या वायूगळतीमुळे अनेक विद्यार्थी आजारी पडले आहेत. काहींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी घटनेची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे आणि बाधितांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. तसेच, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कंपनीने योग्य ती काळजी घ्यावी असेही ते म्हणाले.

'कंपनीने बाधित मुलांना नुकसान भरपाई दिलीच पाहिजे', वायूगळतीवर उदय सामंत आक्रमक
उदय सामंत
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Dec 13, 2024 | 3:45 PM
Share

रत्नागिरीत जिंदाल कंपनीतून वायुगळती झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्याचा त्रास झाला. अनेक विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अनेकांची प्रकृती बिघडली. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. अखेर या घटनेची दखल राज्य सरकारला घ्यावी लागली आहे. माजी मंत्री उदय सामंत यांनी या घटनेची दखल घेतली आहे. उदय सामंत यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देत भूमिका मांडली आहे. “अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली गेलीय. आजच केस दाखल केली जाईल. निष्काळाजीपणामुळे वायूगळती झाली. कंपनीने दिलेली आश्वासन आणि त्याची परिपूर्णता याचा अहवाल देखील समितीने द्यावा. कंपनीकडून काय मिळते याबाबत नागरिकांनी देखील सजग राहावे. कंपनीकडून सुसज्ज हॉस्पिटल होईल यासाठी ग्रामस्थांनी सजग पाहिजे. ग्रामस्थांचा कोणताही गैरफायदा कंपनी उठवू नये यासाठी समिती स्थापन केली आहे. कंपनीने बाधित मुलांना नुकसान भरपाई दिलीच पाहिजे. कंपनीच्या मालकाने देखील कधीतरी रत्नागिरीमध्ये यायला पाहिजे. या संपूर्ण प्रकरणांमध्ये कंपनी दोषी आहे”, असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे.

यावेळी उदय सामंत यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरही प्रतिक्रिया दिली. “मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या मंत्र्यांची नावं ठरली आहेत, तर त्याची नावे सांगा. मी आता अभिनंदन करतो”, असं उदय सामंत म्हणाले. “केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार भेटीचा राजकीय अर्थ लावण्याची गरज नाही. तसं काही असेल तर लवकर कळेल. आम्ही तत्त्वाने शरद पवार यांचे विरोधात. पण महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये त्यांचे योगदान आहे”, असंदेखील उदय सामंत यावेळी म्हणाले.

उदय सामंत यांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

“मुंबई महानगरपालिकेवर महायुतीची सत्ता नक्की येणार आहे. महायुतीचे हिंदुत्व बेडगी असते तर आम्ही 234 वर गेलो असतो का? पराभव मोठ्या मनाने स्वीकारला पाहिजे”, असं म्हणत उदय सामंत यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उत्तर दिलं. “हिंदूंवरच्या अत्याचाराविरोधात झालेल्या आंदोलनात उबाठा कुठे सामील होते? महायुती म्हणून आम्ही मुंबई महानगरपालिका जिंकणार म्हणजे जिंकणार”, असंही उदय सामंत म्हणाले.

‘विरोधक म्हणून काही चांगले सल्ले दिल्यास स्वीकारले जातील’

यावेळी उदय सामंत यांनी ठाकरे गटाचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनादेखील प्रतिक्रिया दिली. “विरोधक म्हणून काही चांगले सल्ले दिल्यास स्वीकारले जातील. मुद्दा करायला आता कोणत्याच निवडणुका नाहीत”, असं उदय सामंत म्हणाले. “कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा भगवा फडकणार”, असं उदय सामंत म्हणाले.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा