AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपने आधीच सुधीर मुनगंटीवारांकडे सर्व जबाबदारी दिली असती तर…? उदय सामंतांचं मोठं विधान

शिवसेना काही अंतिम श्वासापर्यंत शत्रू नाही, पुढे बघू काय होतं ते, असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काल मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर म्हटलं होतं. (uday samant reaction on sudhir mungantiwar visits with cm uddhav thackeray)

भाजपने आधीच सुधीर मुनगंटीवारांकडे सर्व जबाबदारी दिली असती तर...? उदय सामंतांचं मोठं विधान
| Updated on: Feb 03, 2021 | 2:41 PM
Share

मुंबई: शिवसेना काही अंतिम श्वासापर्यंत शत्रू नाही, पुढे बघू काय होतं ते, असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काल मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर म्हटलं होतं. त्यावर शिवसेना नेते आणि राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. भाजपने या आधीच सर्व जबाबदारी सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे द्यायला हवी होती. आज ही वेळ आली नसती, असं सूचक विधान उदय सामंत यांनी केलं आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपच्या जवळकीच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे. (uday samant reaction on sudhir mungantiwar visits with cm uddhav thackeray)

उदय सामंत यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी खास संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुधीर मुनगंटीवार काल भेटले. दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. पण काय चर्चा झाली हे माहीत नाही. सुधीरभाऊ हे माझे विधीमंडळातील ज्येष्ठ सहकारी आहेत. त्यांनी पूर्वीच पुढाकार घेतला असता तर आज ही वेळ आली नसती, असं उदय सामंत म्हणाले. मागच्या पाच वर्षात मी सुधीरभाऊंसोबत काम केलं आहे. त्यांच्याकडे या आधीच सर्व जबाबदारी दिली असती तर आज हे कटू प्रसंग उद्भवले नसते, असंही त्यांनी म्हटलं आहे.

शरजीलवर कारवाई होईल

यावेळी त्यांनी शरजील उस्मानीवर कारवाई होणार असल्याचं सांगितलं. शरजील विरोधात एफआयआर दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्यावर कारवाई होईल. आघाडी सरकारने त्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवलेला आहे. कुणीही त्याचं राजकारण करू नये, असं आवाहन त्यांनी केलं.

गर्दीत कुणीही येऊन फोटो काढतो

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत गुंडांनी फोटो काढल्याने त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. त्यावरही सामंत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. गर्दीत कुणीही येऊन आमच्यासोबत फोटो काढतो. कुणी फोटो काढला हे आम्हाला गर्दीमुळे कळत नाही. देवेंद्र फडणवीस हे माजी मुख्यमंत्री होते. त्यामुळे त्यांना याची माहिती असणारच. काल अनिल देशमुखांबाबतही तेच घडलं, असं सांगतानाच ती व्यक्ती जर गुन्हेगारी पार्श्वभूमीची असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकेल असं ठामपणे सांगितलं. (uday samant reaction on sudhir mungantiwar visits with cm uddhav thackeray)

कॉलेज सुरू करण्याची वेळ आली

शाळा सुरू झाल्यानंतर आता राज्याने कॉलेज सुरू करण्याच्या हालचालीही सुरू केल्या आहेत. कॉलेज सुरू करण्यासाठी एसओपी तयार करण्याचं काम सुरू आहे. आज किंवा उद्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून कॉलेज सुरू करण्याची वेळ ठरवण्यात येईल. आता कॉलेज सुरू करण्याची वेळ आली आहे, असंही ते म्हणाले. (uday samant reaction on sudhir mungantiwar visits with cm uddhav thackeray)

संबंधित बातम्या:

शिवसेना अंतिम श्वासापर्यंत शत्रू नाही, पुढे बघू काय होतंय; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मुनगंटीवारांचे वक्तव्य

‘मोठा भाऊ पाहून कुंभकर्णानेही आत्महत्या केली असती, मुनगंटीवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

मोठी बातमी : मुंबई महापालिकेच्या सर्व शाळांचं नाव बदलणार

(uday samant reaction on sudhir mungantiwar visits with cm uddhav thackeray)

Follow Us
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात.
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?.
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.