AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Udayanraje Bhosale : रायगडावर अमित शाहंसमोर उदयनराजेंच्या चार ते पाच प्रमुख मागण्या

Udayanraje Bhosale : "शिवाजी महाराजांचा इतिहास सातासमुद्रापलिकडे पोहोचला आहे. रशियात शिवजयंती होते. काश्मीरच्या कुपवाडात पुतळा उभारला आहे. वाघनखंही आपण ब्रिटनहून आणली आहेत. शिवाजी महाराजांनी हातात तलावर घेतली पण निष्पाप लोकांवर कधीच त्यांनी ती उगारली नाही. त्यांच्या तलवारीला रक्ताचा नाही तर मानवतेचा सुगंध येतो" असं एकनाथ शिंदे म्हणाले.

Udayanraje Bhosale : रायगडावर अमित शाहंसमोर उदयनराजेंच्या चार ते पाच प्रमुख मागण्या
Udayanraje Bhosale
| Updated on: Apr 12, 2025 | 1:12 PM
Share

“शिवाजी महाराजांनी त्या काळात समतेचा विचार दिला. सर्व धर्म समभावाचा विचार केला. त्यांनी आयुष्य इतरांसाठी वेचलं. त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. आज आपण लोकशाहीत आहोत. त्याकाळी त्यांनी लोकांचा सहभाग राज्यकारभारत असला पाहिजे हा विचार दिला. आजच्या लोकशाहीचा मूळ पाया शिवाजी महाराजांनी रचला होता” असं खासदार उदयनराजे भोसले म्हणाले. रायगडावर ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345 व्या शिवपुण्यतिथी अभिवादन सोहळ्यात बोलत होते. “मी चारपाच मागण्या करतो. शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि जिजाऊ मातांबाबत कायदा करा. अजामीनपात्र गुन्हा करा. दहा वर्ष जामिनच मिळू नये. महाराजांचं शासन मान्य इतिहास प्रकाशित करा. जेणे करून भेदभाव होऊ नये. तेढ होऊ नये” असं उदयनराजे म्हणाले. “सिनेमॅटिक लिबर्टीबाबत सेन्सॉर बोर्डाची स्थापना करावी. म्हणजे एखाद्या कल्पनेतून कादंबरी होते. पण त्याला ऐतिहासिक पुरावे नसतात. त्यामुळे अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर शिवाजी महाराज, संभाजी महाराज आदी युगपुरुषांबाबत गैरसमज निर्माण केले जात आहेत. त्यामुळे सेन्सॉर बोर्ड असावे. रामायण सर्किटची स्थापना झाली. बुद्ध सर्किट झाली. तसेच शिवस्वराज्य सर्किट करावं. कालच रेल्वे मंत्र्यांनी त्याची घोषणा केली. खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचं दिल्लीत स्मारक व्हावं ही शिवभक्तांची मागणी आहे” असं उदयनराजे म्हणाले.

“निजामशाही, मुगलशाहीत शाहजी महाराजांनी त्यांच्या मनात जो स्वराज्याचा विचार होता, माँ साहेब जिजाऊंनी शिवाजी महाराजांच्या अंगी तो विचार उतरवला. दावणगिरी जिल्ह्यात शाहजी राजेंची समाधी आहे. या समाधीला केंद्र आणि राज्य सरकारने पुरेसा निधी द्यावा” अशी मागणी उदयनराजेंनी केली. “मोदींच्या हस्ते अरबी समुद्रात शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं भूमिपूजन झालं. तिथे काही तांत्रिक अडचणी असतील. केंद्रात स्मारक झालं पाहिजे. पण महाराष्ट्रात राज्यपालांच्या बंगल्याच्या ठिकाणी ४८ एकर जागा आहे. तिथे स्मारक झालं पाहिजे. स्मारक बनवण्यामागचा हेतू भावी पिढीला विचार घेता येईल हा असतो. देशाची प्रगती होईल हा त्यामागचा विचार असतो” असं उदयनराजे म्हणाले.

२० ते ३० वर्ष मिळाली असती तर इतिहास बदलला असता

“याच रायगडावर महाराजांचा राज्याभिषेक झाला. याच रायगडाने महाराजांचा शेवटचा दिवस पाहिला. महाराज ५०व्या वर्षी गेले. त्यांना अजून २० ते ३० वर्ष मिळाली असती तर इतिहास बदलला असता. महाराजांमुळेच आपण टिकून आहोत. शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये हा त्यांचा संदेश होता. अन्यायाच्या ठिकाणी तात्काळ शिक्षा द्यायचे” असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

अमित शाह हे कणखर गृहमंत्री

“औरंगजेब आणि अफजल खान यांनी महाराष्ट्रावर चाल केली. त्यांची थडगी याच भूमीत बांधली. अमित शाह हे कणखर गृहमंत्री आहेत. त्यांनी ३०७ कलम हटवलं. देशाच्या सीमेवर जे कोणी शररात करत होते. ते सर्व बिळात बसले आहेत. त्याचं कारण म्हणजे मोदी आणि अमित शाह आहेत. देशात हिंसा फैलावणारे जे लोक आहेत, नक्षलवादी असतील आणि अतिरेक्यांचा बंदोबस्त गृहमंत्री करत आहेत. राणालाही भारतात आणलं. त्याला मुंबई आणलं जाईल. त्याला फाशी देण्यात येईल” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

Follow Us
कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
Siya Goyal Breaking | केतन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पुन्हा चर्चेत; कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय
Tukaram Mundhe | दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय, कोणते आहेत नवे नियम?
राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! खोतांचा घणाघात; महायुतीला सावध...
Sadabhau Khot | राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! सदाभाऊ खोतांचा घणाघात; महायुतीला सावध राहण्याचा इशारा
अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची..
Ram Mandir News | अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची पहिली मोठी प्रतिक्रिया
मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा...
Mumbai | मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा; संदीप देशपांडेंचा भाजपवर घणाघात
काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? ठाकरेंच्या आंदोलनावर...
Breaking | काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनावर उदय सामंतांचा घणाघात!
धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! अन् पुढे जे झालं....
Tree Collapse Mumbai | धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; निष्काळजीपणामुळे आणखी एकाचा बळी
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला 2 वर्षांच्या सोहमचा जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
ब्रेकिंग! मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
Rain Update | पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय