AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेनेने राजकीय जन्म दिला, त्याच आईच्या काळजात कट्यार घुसवली…ठाकरेंनी दिलं शिंदेंना चॅलेंज…

शिवसेना संपवायला निघाले होते, शिवसेना संपत नाही म्हणून फोडाफोडी करून शिवसेना संपवत असल्याचे ठाकरेंनी बोलून दाखवत भाजप यामागे असल्याचा रोख ठाकरेंनी लावून धरला होता.

शिवसेनेने राजकीय जन्म दिला, त्याच आईच्या काळजात कट्यार घुसवली...ठाकरेंनी दिलं शिंदेंना चॅलेंज...
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Oct 09, 2022 | 7:43 PM
Share

मुंबई : शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर सेनेत दोन गट निर्माण झाले आहेत. शिंदे (Eknath shinde) आणि ठाकरे (Uddhav Thackeray) असे दोन गट निर्माण झाले आहे. त्यातच शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळवण्यासाठी दोन्ही गटाकडून प्रयत्न सुरू होता. त्यातच निवडणूक आयोगाने नावासहित चिन्हं गोठवल्याने आता नव्या नावासहित चिन्हाचे तीन पर्याय द्यावे लागणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी याबाबत दुखचं नाही तर राग आल्याचे देखील बोलून दाखवले आहेत. पण यावेळी एकनाथ शिंदे गटावर टीका करत असतांना त्यांनी गंभीर आरोप केला आहे. ज्या शिवसेनेने राजकीय जन्म दिला, त्याच शिवसेना आईच्या काळजात तुम्ही कट्यार घुसवला असे म्हणत ठाकरेंनी नाव आणि चिन्ह गोठवल्याची खंत बोलून दाखवली आहे. त्यामुळे तुम्हाला बाळासाहेब आणि शिवसेना नाव वापरण्याचा अधिकार नसून हिंमत असेल तर नवीन पक्ष काढा नाहीतर भाजपमध्ये जा असा सल्ला ठाकरेंनी दिला आहे.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाच्या राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच लाईव्ह संवाद साधत शिंदे गटासह भाजपवर हल्लाबोल केला आहे.

उद्धव ठाकरे यांनी लाईव्ह संवाद साधत असतांना दसरा मेळाव्याला शिवतीर्थ मिळू नये यासाठी प्रयत्न करत होते असे म्हणत त्यांचा मेळावा म्हणजे पंचतारांकित मेळावा असल्याची टीका केली.

ही टीका करत असतांना खोके सुर म्हणून ठाकरे गटाला हिणावले आहेत, तर 40 डोक्याचे रावण म्हणून देखील शिंदे गटावर हल्लाबोल ठाकरेंनी केला आहे.

शिवसेना संपवायला निघाले होते, शिवसेना संपत नाही म्हणून फोडाफोडी करून शिवसेना संपवत असल्याचे ठाकरेंनी बोलून दाखवत भाजप यामागे असल्याचा रोख ठाकरेंनी लावून धरला होता.

सुरुवातीपासूनच उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्यावर जहरी टीका करीत असून नाव आणि चिन्ह गोठवल्याने ठाकरे अधिकच आक्रमक झाले आहेत.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.