AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फडणवीस सरकारच्या शेतकरी पॅकेजचं समर्थन करतो, फक्त अट … उद्धव ठाकरे असं का म्हणाले?

Uddhav Thackeray criticism to government : हंबरडा मोर्चामध्ये उद्धव ठाकरे यांनी सरकावर जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, दिवाळीनंतर राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मी भेटणार आहे.

फडणवीस सरकारच्या शेतकरी पॅकेजचं समर्थन करतो, फक्त अट ... उद्धव ठाकरे असं का म्हणाले?
Uddhav Thackeray
| Updated on: Oct 11, 2025 | 2:27 PM
Share

छत्रपती संभाजीनगरमध्ये हंबरडा मोर्चा निघाला. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे , संजय राऊत यासोबतच छत्रपती संभाजीनगरमधील महत्वाचे नेते या मोर्चात सहभागी झाले. मोर्चामध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, आम्हाला कर्जाचं पुनर्गठन नको. आम्हाला कर्जमाफी पाहिजे. मला अधिकार आहे. मी बोलणारच. मुख्यमंत्री असताना मी कर्जमुक्ती दिली होती. मी तुम्हाला अटीतटीत अडकवलं नव्हतं. फक्त अंगठा दिला की तुम्हाला कर्ज दिलं.

आम्हाला कर्जमाफी पाहिजे, मला बोलण्याचा अधिकार

नियमित कर्ज फेड करणाऱ्या व्यक्तीला 50 हजार देण्याचं आश्वासन दिलं होतं. पण कोरोना आला. दीड वर्ष देता आले नाही. खोकेवाल्यांनी सरकार पाडलं. त्यामुळे मी देऊ शकलो नाही. सरकार गेलं. आमचं सरकार असतं तर कर्जमुक्ती करून दाखवली असती. पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, सरकारच्या पॅकेजचं समर्थन करायला तयार आहे. पण एक अट आहे. जीवन उद्ध्वस्त झालं. रब्बी पिक खरडून गेलं.

सरकारच्या पॅकेजचं समर्थन करायला तयार पण माझी एक अट

50 हजार मागत आहोत. जमिनीची हालत पाहा. मुख्यमंत्री म्हणाले, खरडून गेलेल्या जमिनीला मनरेगातून साडे तीन लाख देऊ. दिवाळीपूर्वी त्या तीन लाखातील एक लाख शेतकऱ्यांच्या खात्यात टाकाच. बाकीचं नंतर बघू असेही त्यांनी म्हटले आहे. फडणवीस सरकारच्या शेतकरी पॅकेजचं समर्थन करतो. मात्र, माझी अट आहे, असे म्हणत सरकारची फिरकी घेताना उद्धव ठाकरे दिसले.

दिवाळीनंतर राज्यातील शेतकऱ्यांना भेटणार उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा 

उबाठा गटाने आयोजित केलेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने लोक दाखल झाले. यासोबतच उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले की, दिवाळीनंतर राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी मी भेटणार आहे. शेतकऱ्यांना भेटून मदत मिळाली की, नाही हे देखील पाहणार आहे. सरकारने शेतकऱ्यांची थट्टा लावली असल्याचा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी केलाय. नुकताच सरकारने शेतकऱ्यांसाठी पॅकेजची घोषणा केली. मात्र, यावरून उद्धव ठाकरे यांनी सरकारला टार्गेट केले.

Follow Us
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट.
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.