AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संघाला 100 वर्ष झाली पण …, तुमचं समाधान होतंय का? ठाकरेंचा थेट मोहन भागवत यांना सवाल

आज मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडला, या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे, त्यांनी मेळाव्यातून थेट मोहन भागवत यांना सवाल केला आहे.

संघाला 100 वर्ष झाली पण ..., तुमचं समाधान होतंय का? ठाकरेंचा थेट मोहन भागवत यांना सवाल
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 02, 2025 | 8:40 PM
Share

शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा आज मुंबईमध्ये भर पावसात पार पडला, या मेळाव्यातून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप, शिवसेना शिंदे गट आणि आरएसएसवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी दसरा मेळाव्यामधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना थेट सावाल करत जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे? 

संघाला शंभर वर्ष झाल्यानंतर मी मोहन भागवत यांना प्रश्न विचारतोय, भागवत साहेब हे तुमचे चले चपाटे आहेत, संघाला शंभर वर्ष झाल्यानंतर तुम्हाला समाधान वाटतंय का? ज्या कामासाठी संघानं शंभर वर्ष मेहनत केली, आणि त्या मेहनतीला लागलेली ही विषारी फळं, ही फळं बघितल्यावर तुमचं समाधान होतय का? तुम्हाला आनंद मिळतोय का? असा थेट सवाल यावेळी उद्धव ठाकरे यांनी सरसंघचालकांना केला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की,  मला असं वाटतं की, कदाचित  भागवत साहेबांना सांगता येत नसेल, पण आरएसएसचा हेतू हा ब्रह्मदेवांचा बाप होण्याचा असेल, पण हे ब्रह्मदेव नाही झाले ब्रह्मराक्षस झाले आहेत. मुद्दामहून मी तुम्हाला सांगतोय, मी इथे ब्रह्मराक्षस हा शब्द वापरत आहे. सगळ्यांनी घरी जाताना गुगलवर ब्रह्मराक्षस या शब्दाचा अर्थ सर्च करा. हिंदूत्त्व हिंदूत्व म्हणून हे  आमच्या अंगावर येतात, मात्र  काही दिवसांपूर्वी  वृत्तपत्रात आलेल्या या काही बातम्या आहेत, ‘मुस्लिमांबद्दल मोहन भागवत यांच्या बैठकीत घेतला मोठा निर्णय, आता संघ मुस्लिमांच्या घराघरात पोहोचणार’ ‘मुस्लिम आणि हिंदूंमधील दुरी कमी करण्यासाठी संघ प्रयत्न करणार’ या काही पेपरमधील बातम्या आहेत. मग आता मी भाजपवाल्यांना प्रश्न करतो, तुमच्या आहे का हिंमत? मोहन भागवत यांनी हिंदूत्व सोडले म्हणायची, असा हल्लाबोल यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

दरम्यान यावेळी बोलताना भाजप हा अमिबा असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे, अमिबाला कसलाही आकार नसतो तो कसाही वेडा वाकडा असतो, मात्र तो एक पेशीय जीव आहे. तसंच भाजपचं झालं आहे, भाजप हा कसाही जिकडे जागा भेटेल तिकडे वेडा वाकडा वाढत आहे, मात्र एक पेशीय मी म्हणेल तेच खरं आसा टोला यावेळी ठाकरे यांनी लगावला आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...