AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे यांच्या नेत्याचं खळबळजनक वक्तव्य, निर्णय आमच्या बाजूने नाही लागला तर रक्तपात….

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतांना उद्धव ठाकरे गटाचे शरद कोळी यांनी सर्वोच्च न्यायालयासह निवडणूक आयोगावर खळबळजनक विधान केले आहे.

उद्धव ठाकरे यांच्या नेत्याचं खळबळजनक वक्तव्य, निर्णय आमच्या बाजूने नाही लागला तर रक्तपात....
Image Credit source: Google
| Updated on: Feb 28, 2023 | 1:48 PM
Share

निलेश डाहाट, टीव्ही 9 मराठी, चंद्रपूर : एकीकडे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात ( Supreme Court ) सुरू आहे. तर यापूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव हे एकनाथ शिंदे यांना दिले आहे. ही संपूर्ण प्रक्रिया सध्या सर्वोच्च न्यायालयात युक्तिवादाच्या दरम्यान बोलली जात आहे. अशी सर्व परिस्थिती असतांना उद्धव ठाकरे गटाचे नेते यांनी शरद कोळी खळबळजनक विधान केले आहे. शरद कोळी ( Sharad Koli ) यांनी केलेल्या विधानावरुन नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयात आमच्या बाजूने निर्णय लागला नाही तर रस्त्यावर रक्तपात होईल असे धक्कादायक विधान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते शरद कोळी यांनी चंद्रपुरात केले आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते शरद कोळी म्हणाले, आमचा आणि जनतेचा कायद्यावरील विश्वास उडाला आहे. कायदा मोदी-शाह, शिंदे-फडणवीस यांनी विकत घेतला आहे अशी घणाघाती टीका केली आहे.

सत्तेवर बसलेली माकडं आहेत आणि ती विकली गेली आहेत असे सांगत न्याय मिळाला नाही तर प्रसंगी रस्त्यावर उतरावे लागेल, रक्तपात झाला तरी चालेल अशी टोकाची भूमिका शरद कोळी यांनी मांडली.

आमचा विश्वासघात झाला असून धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष आम्हालाच मिळाले पाहिजे सोबतच एकनाथ शिंदे यांच्यावर योग्य कारवाई झाली पाहिजे असेही शरद कोळी यांनी मागणी केली आहे.

राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. याच दरम्यान शरद कोळी हे खळबळजनक विधान केल्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होऊ लागली आहे. न्याय आमच्याच बाजूने लागेल असे म्हणत शरद कोळी यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीस आमदारांवर हल्लाबोल केला आहे.

चंद्रपूर येथे बोलत असतांना शरद कोळी यांनी केलेले विधान बघता नवा वाद उभा राहील अशी स्थिती आहे. थेट न्यायालयावर शरद कोळी यांनी शंका उपस्थित केली आहे. त्यामुळे वाद उभा राहू शकतो. तर दुसरीकडे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह देखील आम्हालाच मिळावे अशी मागणीही केली आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावरुन उद्धव ठाकरे यांच्या विविध नेत्यांनी केंद्र सरकारसह निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला होता. त्यामध्ये आता शरद कोळी यांनी थेट सर्वोच्च न्यायालयासह निवडणूक आयोगाववर शंका उपस्थित केली आहे. उद्धव ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांचे खळबळजनक विधानावरुन उलट सुलट चर्चा होऊ लागली आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.