AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नरेंद्र मोदी यांच्या अशुभ हातांनी… उद्धव ठाकरे यांचा रत्नागिरीच्या सभेतून हल्लाबोल काय?

उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नरेंद्र मोदी यांच्या अशुभ हातांनी... उद्धव ठाकरे यांचा रत्नागिरीच्या सभेतून हल्लाबोल काय?
| Updated on: Nov 05, 2024 | 8:58 PM
Share

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते रत्नागिरीमध्ये आयोजित सभेत बोलत होते. राजन साळवी खरे निष्ठावंत आहेत, ते आता गद्दारांना आडवं करणार आहेत. कोकणचं भविष्य तुमच्या हातात आहे. दबाव असतानाही साळवी यांनी शिवसेना सोडली नाही. मला घरी बसून बोलणाऱ्यांनी राज्यात अनेक घरं फोडली असं म्हणत त्यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेतला जोरदार निशाणा साधला.

दरम्यान त्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील हल्लाबोल केला आहे. मोदींच्या अशुभ हस्ते उभा केलेला शिवरायांचा पुतळाही आठ महिन्यांमध्ये कोसळला. त्यांनी माफीही गुर्मीत मागितली असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यांनी लाडकी बहीण योजनेवरून देखील राज्य सरकारला टोला लगावला आहे. दीड हजार रुपयांत घर चालंत का, महागाई इतकी वाढली की दीड हजार येईपर्यंत संपतात, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

यावेळी बोलताना त्यांनी काही घोषणा देखील केल्या आहेत.  सत्ता आल्यावर शिवभोजन थाळी योजनेचा विस्तार वाढवणार, जनतेला दहा रुपयांमध्ये पोटभर जेवण देणार. महाराष्ट्रात महिलांसाठी स्वातंत्र पोलीस ठाणे निर्माण करणार, प्रत्येकाला शिक्षण मोफत देणार, जीवन आवश्यक वस्तूंचे भाव पाच वर्ष स्थिर ठेवणार असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

राजन साळवी खरे निष्ठावंत आहेत, दबाव असतानाही साळवी यांनी शिवसेना सोडली नाही. मला घरी बसून बोलणाऱ्यांनी राज्यात अनेक घरं फोडली. कोरोनाचा बंदोबस्त करण्यात महाराष्ट्र नंबर एकला होता. अडीच वर्ष मी मुख्यमंत्री असताना असा काय गुन्हा केला असा सवालही यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान दुसरीकडे शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. उध्दव ठाकरे यांच्या कोकणातील सभांचा काहीही परिणाम होणार नाही. ज्या उध्दव ठाकरेंनी भगव्या झेंड्याला डाग लावण्याचे काम केले, त्या उध्दव ठाकरेंना कोकणात बसायला जागा मिळणार नाही, असं कदम यांनी म्हटलं आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.