AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नरेंद्र मोदी यांच्या अशुभ हातांनी… उद्धव ठाकरे यांचा रत्नागिरीच्या सभेतून हल्लाबोल काय?

उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नरेंद्र मोदी यांच्या अशुभ हातांनी... उद्धव ठाकरे यांचा रत्नागिरीच्या सभेतून हल्लाबोल काय?
| Updated on: Nov 05, 2024 | 8:58 PM
Share

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते रत्नागिरीमध्ये आयोजित सभेत बोलत होते. राजन साळवी खरे निष्ठावंत आहेत, ते आता गद्दारांना आडवं करणार आहेत. कोकणचं भविष्य तुमच्या हातात आहे. दबाव असतानाही साळवी यांनी शिवसेना सोडली नाही. मला घरी बसून बोलणाऱ्यांनी राज्यात अनेक घरं फोडली असं म्हणत त्यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेतला जोरदार निशाणा साधला.

दरम्यान त्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील हल्लाबोल केला आहे. मोदींच्या अशुभ हस्ते उभा केलेला शिवरायांचा पुतळाही आठ महिन्यांमध्ये कोसळला. त्यांनी माफीही गुर्मीत मागितली असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यांनी लाडकी बहीण योजनेवरून देखील राज्य सरकारला टोला लगावला आहे. दीड हजार रुपयांत घर चालंत का, महागाई इतकी वाढली की दीड हजार येईपर्यंत संपतात, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

यावेळी बोलताना त्यांनी काही घोषणा देखील केल्या आहेत.  सत्ता आल्यावर शिवभोजन थाळी योजनेचा विस्तार वाढवणार, जनतेला दहा रुपयांमध्ये पोटभर जेवण देणार. महाराष्ट्रात महिलांसाठी स्वातंत्र पोलीस ठाणे निर्माण करणार, प्रत्येकाला शिक्षण मोफत देणार, जीवन आवश्यक वस्तूंचे भाव पाच वर्ष स्थिर ठेवणार असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

राजन साळवी खरे निष्ठावंत आहेत, दबाव असतानाही साळवी यांनी शिवसेना सोडली नाही. मला घरी बसून बोलणाऱ्यांनी राज्यात अनेक घरं फोडली. कोरोनाचा बंदोबस्त करण्यात महाराष्ट्र नंबर एकला होता. अडीच वर्ष मी मुख्यमंत्री असताना असा काय गुन्हा केला असा सवालही यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान दुसरीकडे शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. उध्दव ठाकरे यांच्या कोकणातील सभांचा काहीही परिणाम होणार नाही. ज्या उध्दव ठाकरेंनी भगव्या झेंड्याला डाग लावण्याचे काम केले, त्या उध्दव ठाकरेंना कोकणात बसायला जागा मिळणार नाही, असं कदम यांनी म्हटलं आहे.

Follow Us
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे...
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे....
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?.
8 वर्षांची प्रतीक्षा संपली, आजपासून मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला
8 वर्षांची प्रतीक्षा संपली, आजपासून मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला.
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?.
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण.
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल.
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा....
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा.....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या.....
मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झोंबतायत?, राऊतांचा फडणवीसांवर हल्ला
मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झोंबतायत?, राऊतांचा फडणवीसांवर हल्ला.
आता मुंबई-पुणे प्रवास सुसाट! अर्ध्या तासाची बचत, आज होणार मिसिंग लिंक
आता मुंबई-पुणे प्रवास सुसाट! अर्ध्या तासाची बचत, आज होणार मिसिंग लिंक.