AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नरेंद्र मोदी यांच्या अशुभ हातांनी… उद्धव ठाकरे यांचा रत्नागिरीच्या सभेतून हल्लाबोल काय?

उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नरेंद्र मोदी यांच्या अशुभ हातांनी... उद्धव ठाकरे यांचा रत्नागिरीच्या सभेतून हल्लाबोल काय?
| Updated on: Nov 05, 2024 | 8:58 PM
Share

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते रत्नागिरीमध्ये आयोजित सभेत बोलत होते. राजन साळवी खरे निष्ठावंत आहेत, ते आता गद्दारांना आडवं करणार आहेत. कोकणचं भविष्य तुमच्या हातात आहे. दबाव असतानाही साळवी यांनी शिवसेना सोडली नाही. मला घरी बसून बोलणाऱ्यांनी राज्यात अनेक घरं फोडली असं म्हणत त्यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेतला जोरदार निशाणा साधला.

दरम्यान त्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील हल्लाबोल केला आहे. मोदींच्या अशुभ हस्ते उभा केलेला शिवरायांचा पुतळाही आठ महिन्यांमध्ये कोसळला. त्यांनी माफीही गुर्मीत मागितली असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यांनी लाडकी बहीण योजनेवरून देखील राज्य सरकारला टोला लगावला आहे. दीड हजार रुपयांत घर चालंत का, महागाई इतकी वाढली की दीड हजार येईपर्यंत संपतात, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

यावेळी बोलताना त्यांनी काही घोषणा देखील केल्या आहेत.  सत्ता आल्यावर शिवभोजन थाळी योजनेचा विस्तार वाढवणार, जनतेला दहा रुपयांमध्ये पोटभर जेवण देणार. महाराष्ट्रात महिलांसाठी स्वातंत्र पोलीस ठाणे निर्माण करणार, प्रत्येकाला शिक्षण मोफत देणार, जीवन आवश्यक वस्तूंचे भाव पाच वर्ष स्थिर ठेवणार असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

राजन साळवी खरे निष्ठावंत आहेत, दबाव असतानाही साळवी यांनी शिवसेना सोडली नाही. मला घरी बसून बोलणाऱ्यांनी राज्यात अनेक घरं फोडली. कोरोनाचा बंदोबस्त करण्यात महाराष्ट्र नंबर एकला होता. अडीच वर्ष मी मुख्यमंत्री असताना असा काय गुन्हा केला असा सवालही यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान दुसरीकडे शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. उध्दव ठाकरे यांच्या कोकणातील सभांचा काहीही परिणाम होणार नाही. ज्या उध्दव ठाकरेंनी भगव्या झेंड्याला डाग लावण्याचे काम केले, त्या उध्दव ठाकरेंना कोकणात बसायला जागा मिळणार नाही, असं कदम यांनी म्हटलं आहे.

Follow Us
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच