AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सत्ता आली तर निवडणूक आयोगावरच… उद्धव ठाकरे यांचा थेट इशारा; काय म्हणाले?

इमान विकणारे खूप आहे. गुडघे टेकत आहेत. अशा लोकांना आपण पोसलं याचं मला वाईट वाटतं. आईच्या कुशीवर वार करणारे हे लोक आहेत. आपली परीक्षा सुरू आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

सत्ता आली तर निवडणूक आयोगावरच... उद्धव ठाकरे यांचा थेट इशारा; काय म्हणाले?
uddhav thackeray
| Updated on: Oct 27, 2025 | 8:09 PM
Share

Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील निर्धार मेळाव्यात सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली. मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी कार्यकर्ते, पदाधिकारी यांचे मनोबल वाढवण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. काहीही झालं तरी आम्हीच मुंबई पालिका निवडणूक जिंकणार, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी मतदार याद्यात घोळ असल्याच्या आरोपाचाही पुनरुच्चार केला. गोळ्या झाडून मराठी माणूस झुकत नाही. म्हणून पैसे देऊन मुंबई विकत घेण्याचा प्रयत्न आहे, असा गंभीर आरोपही ठाकरे यांनी यावेळी केला.

भाजप म्हणजे स्वयंघोषित देशप्रेमींची बोगस टोळी

इमान विकणारे खूप आहे. गुडघे टेकत आहेत. अशा लोकांना आपण पोसलं याचं मला वाईट वाटतं. आईच्या कुशीवर वार करणारे हे लोक आहेत. आपली परीक्षा सुरू आहे. शिवसेनाप्रमुख आपली परीक्षा घेत आहेत. कितीही अमित शाह आले तरी आपली धमक हरवू देऊ नका, असे आवाहन ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना केले. निवडणूक होऊ द्यायची की नाही हे सर्वांनी मिळवून ठरवू. वाट्टेल ते करायचं. भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष कसला. भाजप म्हणजे स्वयंघोषित देशप्रेमींची बोगस टोळी आहे. स्वत: देशप्रेमी असल्याचे जाहीर करतात. त्यांना मतं चोरावी लागतात. पक्ष फोडावी लागतात. हे कसले आत्म निर्भर, आहेत असा थेट हल्लाबोल यावेळी ठाकरे यांनी केला.

आमचा ईव्हीएमवरचा संशय गेलेला नाही

पुढे बोलताना त्यांनी निवडणूक आयोग आणि आयोगाची निवडणूक घेण्याची पद्धत यावर बोट ठेवले. आमचा ईव्हीएमवरचा संशय गेलेला नाही. हा संशय दूर होण्याआधीच आयोगाने सांगितलं की पालिका निवडणुकीत व्हीव्हीपॅट राहणार नाही. आम्ही काही केलं तर करप्ट प्रॅक्टिस म्हटले जाते. निवडणूक आयोगावरही करप्ट प्रॅक्टिसची केस दाखल झाली पाहिजे, अशी टीका ठाकरे यांनी केली.

सरकार आल्यावर निवडणूक आयोगावर…

निवडणूक आयोगावर गुन्हा दाखल करायला हवा. लोकसभेच्या निवडणुकीला सध्या उशीर आहे. आजचे दिवस त्यांचे असतील. उद्याचे दिवस आमचे आहेत, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला. तसेच लोकसभेत सरकार आल्यावर निवडणूक आयोगावर खटला भरायला पाहिजे, अशी भूमिका ठाकरे यांनी व्यक्ती केली. निवडणूक आयोगाला कोर्टात न्यायलाच पाहिजे असेही ठाकरे यावेळी म्हणाले.

आता ते हिंदू मुस्लीम करतील

मनसेच्या दिपोत्सवात मी गेलो. राजने बोलावलं होतं. मराठी अमराठींची तुफान गर्दी होती. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. यात मिठ कसं घालायचं, असे म्हणत आम्ही मनसेसोबत युती करण्यास सकारात्मक आहोत, असे संकेतही उद्धव ठाकरे यांनी दिले. निवडणूक आल्यामुळे आता ते हिंदू मुस्लीम करतील. आपण मारामाऱ्या करतो. भांडण करतो. त्यावेळी हे मतचोरी करतात. हे हिंदू मुसलमान करतात तेव्हा समजायचं निवडणूक आली, अशी बोचरी टीका ठाकरेंनी केली.

Follow Us
हिंदुत्ववादी म्हणवणारे काही लोक गद्दारीसाठी एकत्र आले.....
Sanjay Raut On Bal Mane | हिंदुत्ववादी म्हणवणारे काही लोक गद्दारीसाठी एकत्र आले; बाळ माने यांच्या माघारीनंतर संजय राऊतांचा घणाघात
नवनीत राणांना राज्यसभेची लॉटरी की झटका?; काय घडतंय पडद्यामागे?
Navneet Rana | नवनीत राणांना राज्यसभेची लॉटरी की झटका? राष्ट्रवादीच्या भूमिकेने... काय घडतंय पडद्यामागे?
ठाकरेंनी काढलं, मानेंनी दिलं उत्तर; म्हणाले Revenge.....
ठाकरेंनी काढलं, मानेंनी दिलं उत्तर; म्हणाले Revenge..... त्या एका पोस्टनं पेटलं राजकारण!
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल