AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सत्ता आली तर निवडणूक आयोगावरच… उद्धव ठाकरे यांचा थेट इशारा; काय म्हणाले?

इमान विकणारे खूप आहे. गुडघे टेकत आहेत. अशा लोकांना आपण पोसलं याचं मला वाईट वाटतं. आईच्या कुशीवर वार करणारे हे लोक आहेत. आपली परीक्षा सुरू आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

सत्ता आली तर निवडणूक आयोगावरच... उद्धव ठाकरे यांचा थेट इशारा; काय म्हणाले?
uddhav thackeray
| Updated on: Oct 27, 2025 | 8:09 PM
Share

Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील निर्धार मेळाव्यात सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली. मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी कार्यकर्ते, पदाधिकारी यांचे मनोबल वाढवण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. काहीही झालं तरी आम्हीच मुंबई पालिका निवडणूक जिंकणार, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी मतदार याद्यात घोळ असल्याच्या आरोपाचाही पुनरुच्चार केला. गोळ्या झाडून मराठी माणूस झुकत नाही. म्हणून पैसे देऊन मुंबई विकत घेण्याचा प्रयत्न आहे, असा गंभीर आरोपही ठाकरे यांनी यावेळी केला.

भाजप म्हणजे स्वयंघोषित देशप्रेमींची बोगस टोळी

इमान विकणारे खूप आहे. गुडघे टेकत आहेत. अशा लोकांना आपण पोसलं याचं मला वाईट वाटतं. आईच्या कुशीवर वार करणारे हे लोक आहेत. आपली परीक्षा सुरू आहे. शिवसेनाप्रमुख आपली परीक्षा घेत आहेत. कितीही अमित शाह आले तरी आपली धमक हरवू देऊ नका, असे आवाहन ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना केले. निवडणूक होऊ द्यायची की नाही हे सर्वांनी मिळवून ठरवू. वाट्टेल ते करायचं. भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष कसला. भाजप म्हणजे स्वयंघोषित देशप्रेमींची बोगस टोळी आहे. स्वत: देशप्रेमी असल्याचे जाहीर करतात. त्यांना मतं चोरावी लागतात. पक्ष फोडावी लागतात. हे कसले आत्म निर्भर, आहेत असा थेट हल्लाबोल यावेळी ठाकरे यांनी केला.

आमचा ईव्हीएमवरचा संशय गेलेला नाही

पुढे बोलताना त्यांनी निवडणूक आयोग आणि आयोगाची निवडणूक घेण्याची पद्धत यावर बोट ठेवले. आमचा ईव्हीएमवरचा संशय गेलेला नाही. हा संशय दूर होण्याआधीच आयोगाने सांगितलं की पालिका निवडणुकीत व्हीव्हीपॅट राहणार नाही. आम्ही काही केलं तर करप्ट प्रॅक्टिस म्हटले जाते. निवडणूक आयोगावरही करप्ट प्रॅक्टिसची केस दाखल झाली पाहिजे, अशी टीका ठाकरे यांनी केली.

सरकार आल्यावर निवडणूक आयोगावर…

निवडणूक आयोगावर गुन्हा दाखल करायला हवा. लोकसभेच्या निवडणुकीला सध्या उशीर आहे. आजचे दिवस त्यांचे असतील. उद्याचे दिवस आमचे आहेत, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला. तसेच लोकसभेत सरकार आल्यावर निवडणूक आयोगावर खटला भरायला पाहिजे, अशी भूमिका ठाकरे यांनी व्यक्ती केली. निवडणूक आयोगाला कोर्टात न्यायलाच पाहिजे असेही ठाकरे यावेळी म्हणाले.

आता ते हिंदू मुस्लीम करतील

मनसेच्या दिपोत्सवात मी गेलो. राजने बोलावलं होतं. मराठी अमराठींची तुफान गर्दी होती. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. यात मिठ कसं घालायचं, असे म्हणत आम्ही मनसेसोबत युती करण्यास सकारात्मक आहोत, असे संकेतही उद्धव ठाकरे यांनी दिले. निवडणूक आल्यामुळे आता ते हिंदू मुस्लीम करतील. आपण मारामाऱ्या करतो. भांडण करतो. त्यावेळी हे मतचोरी करतात. हे हिंदू मुसलमान करतात तेव्हा समजायचं निवडणूक आली, अशी बोचरी टीका ठाकरेंनी केली.

Follow Us
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय.

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!.

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!

इंग्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतरही भारतीय संघाला मोठा फायदा, शुभमन गिल, विराट कोहली आणि रोहितला मिळाली आनंदाची बातमी.

इंग्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतरही भारतीय संघाला मोठा फायदा, शुभमन गिल, विराट कोहली आणि रोहितला मिळाली आनंदाची बातमी

CJP Delhi Protest : आधी वांगचूक यांची भेट नंतर केंद्र सरकारचं मोठं पाऊल, CJP ची भेट घेणार; मागण्यांचं काय होणार?.

CJP Delhi Protest : आधी वांगचूक यांची भेट नंतर केंद्र सरकारचं मोठं पाऊल, CJP ची भेट घेणार; मागण्यांचं काय होणार?

मी जंतरमंतरवर कधीच जाणार नाही, तिथे देशद्रोही लोक..; प्रसिद्ध गीतकाराची रोखठोक भूमिका.

मी जंतरमंतरवर कधीच जाणार नाही, तिथे देशद्रोही लोक..; प्रसिद्ध गीतकाराची रोखठोक भूमिका