AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ती माझी मोठी चूक झाली; उद्धव ठाकरेंचं पहिल्यांदाच बच्चू कडू यांच्याबद्दल मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

काही दिवसांपूर्वीच बच्चू कडू यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे, त्यांना विधान परिषदेची आमदारकी देखील शिवसेनेच्या वतीने देण्यात आली, त्यानंतर आता बच्चू कडू यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

ती माझी मोठी चूक झाली; उद्धव ठाकरेंचं पहिल्यांदाच बच्चू कडू यांच्याबद्दल मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
उद्धव ठाकरेंचा बच्चू कडूंवर जोरदार हल्लाबोल Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 22, 2026 | 4:09 PM
Share

प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. बच्चू कडू यांना शिवसेना शिंदे गटाकडून विधान परिषदेची आमदारकी देखील देण्यात आली. दरम्यान त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडू यांच्यावर जोरदार हल्लाबोला केला आहे.  मी त्यांना घरी बोलावून मंत्री केलं, ही माझी चूक झाली, जे लोभापायी गेलेत त्यांना जाऊ द्या, कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत, असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मराठवाड्यातील प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे, त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. दरम्यान या पक्षप्रवेशावेळी आमदार  अंबादास दानवे, राहुल पाटील आणि खासदार नागेश अष्टीकर यांची देखील उपस्थिती होती.

बच्चू कडू यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांना एकनाथ शिंदे यांच्याकडून विधान परिषदेची आमदारकी देखील देण्यात आली. परंतु बच्चू कडू यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानं प्रहारचे कार्यकर्ते नाराज आहेत, मराठवाड्यातील प्रहार संघटनेच्या नाराज कार्यकर्त्यांनी आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मातोश्रीवर आज हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी  अंबादास दानवे, राहुल पाटील आणि खासदार नागेश अष्टीकर यांची देखील उपस्थिती होती. दरम्यान यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडूंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाले ठाकरे? 

उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडू यांच्यावर यावेळी जोरदार हल्लाबोल केला आहे.  आपल्यातून जो गेला तो जुना शिवसैनिकच होता.  ‘घरी बोलवून त्याला मंत्री केला ही माझी चूक झाली. जे लोभापायी गेलेत त्यांना जाऊ द्या,  कार्यकर्ते माझ्यासोबतच आहेत याचा आनंद आहे, असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर बच्चू कडू हे प्रहार संघटनेचे एकमेव आमदार होते, मात्र तरी देखील त्यांना महाविकास आघाडीकडून राज्यमंत्रिपद देण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यानंतर  बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला होता.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा