AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अश्रू पुसले, हात हातात घेतला अन्… शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलेल्या उद्धव ठाकरेंनी केली एकच विनंती

मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले आहे. उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त क्षेत्रांचा दौरा केला आणि शेतकऱ्यांना धीर दिला. त्यांनी सरकारची मदत अपुरी असल्याचे म्हटले आणि हेक्टरी ५० हजार रुपये मदतीची मागणी पुढे रेटली.

अश्रू पुसले, हात हातात घेतला अन्... शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलेल्या उद्धव ठाकरेंनी केली एकच विनंती
| Updated on: Sep 25, 2025 | 1:14 PM
Share

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. आता सध्या अनेक सत्ताधारी हे या नुकसानीची पाहणी करत आहेत. आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मराठवाड्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना धीर देत त्यांच्यासोबत संवाद साधला. “माझ्या हातात काही नसले तरी, तुम्हाला साथ देण्यासाठी आलो आहे. कोणीही खचू नका आणि वेडवाकडं पाऊल उचलू नका,” असे भावनिक आवाहन त्यांनी केले.

उद्धव ठाकरे हे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. मराठवाड्यात पावसाने हैदोस घातला आहे. गेल्या चार दिवसांपासून धाराशिव, बीड, जालना, लातूर, परभणी अशा सगळ्याच जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. तसेच शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पाण्याखाली गेलाय. त्यामुळे ठाकरे नुकसानग्रस्त भागांची पाहणी करत आहेत. उद्धव ठाकरे हे मराठवाड्यात दाखल होताच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनी त्यांच्यापुढे व्यथा माडंल्या. मराठवाड्यात पहिल्यांदा उलट झालंय. पाणीच पाणी झालंय. यातून आपल्याला बाहेर पडायला हवं. तुमची मागणी जी आहे कर्जमाफीची ती आहेच. मला त्यात पडायचं नाही. नाहीतर पुन्हा लोक म्हणतील मी राजकारण करतो. आता हे संकट उलट आलं आहे. इतक्या वर्षात असं काही झालेलं मला तरी आठवत नाही. सरकारने जाहीर केलेली मदत २०२३ च्या निकषांनुसार असून, ती शेतकऱ्यांसाठी पुरेशी नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

तुमची मागणी निश्चितच पूर्ण करून घेऊ

यावेळी एका शेतकऱ्याने आम्हाला फक्त साधारण ८००० रुपये मदत मिळेल,” असे सांगितल्यावर, आणखी एका शेतकऱ्याने काढणीसाठीच ६००० रुपये खर्च येत असल्याचे सांगितले. यावर उद्धव ठाकरेंनी म्हणजे जी मदत येणार ती अशीच जाणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले. एका शेतकऱ्याने आपले दोन-तीन लाखांचे कर्ज, २० लोकांचे कुटुंब आणि सरकारी नोकरी नसताना मराठा आरक्षणही मिळत नसल्याची व्यथा मांडली. यावर उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांना धीर दिला. “तुमचा हात हातात धरणं, एवढंच सध्या आम्ही करू शकतो. पण आम्ही तुमच्या पूर्ण ताकदीने सोबत आहोत. तुमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवून हेक्टरी ५० हजार रुपये मदतीची तुमची मागणी निश्चितच पूर्ण करून घेऊ,” असे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी भगवान अंकुश म्हस्के या शेतकऱ्याने “जेवायला परवडत नाही, एकरी ५० हजार देऊनही परवडत नाही,” अशी व्यथा मांडून आपले दुःख व्यक्त केले. त्यावर, उद्धव ठाकरे यांनी हात जोडून शेतकऱ्याला खचून न जाण्याची विनंती केली.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.