AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अश्रू पुसले, हात हातात घेतला अन्… शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलेल्या उद्धव ठाकरेंनी केली एकच विनंती

मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले आहे. उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त क्षेत्रांचा दौरा केला आणि शेतकऱ्यांना धीर दिला. त्यांनी सरकारची मदत अपुरी असल्याचे म्हटले आणि हेक्टरी ५० हजार रुपये मदतीची मागणी पुढे रेटली.

अश्रू पुसले, हात हातात घेतला अन्... शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलेल्या उद्धव ठाकरेंनी केली एकच विनंती
| Updated on: Sep 25, 2025 | 1:14 PM
Share

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. आता सध्या अनेक सत्ताधारी हे या नुकसानीची पाहणी करत आहेत. आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मराठवाड्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना धीर देत त्यांच्यासोबत संवाद साधला. “माझ्या हातात काही नसले तरी, तुम्हाला साथ देण्यासाठी आलो आहे. कोणीही खचू नका आणि वेडवाकडं पाऊल उचलू नका,” असे भावनिक आवाहन त्यांनी केले.

उद्धव ठाकरे हे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. मराठवाड्यात पावसाने हैदोस घातला आहे. गेल्या चार दिवसांपासून धाराशिव, बीड, जालना, लातूर, परभणी अशा सगळ्याच जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. तसेच शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पाण्याखाली गेलाय. त्यामुळे ठाकरे नुकसानग्रस्त भागांची पाहणी करत आहेत. उद्धव ठाकरे हे मराठवाड्यात दाखल होताच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनी त्यांच्यापुढे व्यथा माडंल्या. मराठवाड्यात पहिल्यांदा उलट झालंय. पाणीच पाणी झालंय. यातून आपल्याला बाहेर पडायला हवं. तुमची मागणी जी आहे कर्जमाफीची ती आहेच. मला त्यात पडायचं नाही. नाहीतर पुन्हा लोक म्हणतील मी राजकारण करतो. आता हे संकट उलट आलं आहे. इतक्या वर्षात असं काही झालेलं मला तरी आठवत नाही. सरकारने जाहीर केलेली मदत २०२३ च्या निकषांनुसार असून, ती शेतकऱ्यांसाठी पुरेशी नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

तुमची मागणी निश्चितच पूर्ण करून घेऊ

यावेळी एका शेतकऱ्याने आम्हाला फक्त साधारण ८००० रुपये मदत मिळेल,” असे सांगितल्यावर, आणखी एका शेतकऱ्याने काढणीसाठीच ६००० रुपये खर्च येत असल्याचे सांगितले. यावर उद्धव ठाकरेंनी म्हणजे जी मदत येणार ती अशीच जाणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले. एका शेतकऱ्याने आपले दोन-तीन लाखांचे कर्ज, २० लोकांचे कुटुंब आणि सरकारी नोकरी नसताना मराठा आरक्षणही मिळत नसल्याची व्यथा मांडली. यावर उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांना धीर दिला. “तुमचा हात हातात धरणं, एवढंच सध्या आम्ही करू शकतो. पण आम्ही तुमच्या पूर्ण ताकदीने सोबत आहोत. तुमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवून हेक्टरी ५० हजार रुपये मदतीची तुमची मागणी निश्चितच पूर्ण करून घेऊ,” असे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी भगवान अंकुश म्हस्के या शेतकऱ्याने “जेवायला परवडत नाही, एकरी ५० हजार देऊनही परवडत नाही,” अशी व्यथा मांडून आपले दुःख व्यक्त केले. त्यावर, उद्धव ठाकरे यांनी हात जोडून शेतकऱ्याला खचून न जाण्याची विनंती केली.

पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.