AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनावरून आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण; भारती पवारांची राज्य सरकारवर टीका, तर कोरोना केंद्राला घाबरतो का? मलिकांचा सवाल

कोरोनावरून पुन्हा एकदा केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार, असा सामना सुरु होताना दिसतोय. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना राज्य सरकार संथ गतीनं काम करत असल्याची टीका केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केलीये.

कोरोनावरून आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण; भारती पवारांची राज्य सरकारवर टीका, तर कोरोना केंद्राला घाबरतो का? मलिकांचा सवाल
| Edited By: | Updated on: Jan 04, 2022 | 9:48 PM
Share

नवी दिल्ली : कोरोनावरून पुन्हा एकदा केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार, असा सामना सुरु होताना दिसतोय. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना राज्य सरकार संथ गतीनं काम करत असल्याची टीका केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केलीये. भारती पवारांनी, राज्य सरकारकडून होणाऱ्या खर्चावरही बोट ठेवलंय. केंद्र सरकारकडून राज्यांना 23 हजार कोटींची मदत दिली आहे.पण निधी देऊनही महाराष्ट्र सरकारकडून खर्च होत नसल्याचा आरोप भारती पवार यांनी केला आहे.

मलिकांचा केंद्रावर निशाणा

या वादात आता नवाब मलिकांनी देखील उडी घेतली आहे. मलिकांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शाहांच्या उत्तर प्रदेशातल्या सभांवर सवाल उपस्थित केलाय. हजारो लोकांच्या सभा मोदी-शाह घेत आहेत, कोरोना भाजपला घाबरतो का ?, असं टीकास्त्र मलिकांनी सोडलंय. खरं तर गर्दी टाळायलाच हवी, हे केंद्र सरकारची गाईडलाईनही हेच सांगते. त्यामुळे येणाऱ्या काळात गर्दी  वाढवणारे कार्यक्रम टाळले जातील हीच अपेक्षा

राज्यात ओमिक्रॉनचे 75 नवे रुग्ण

राज्यात एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. तर दुसरीकडे ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण झालेले रुग्णही मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. राज्यात आज 75 ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील 40 रुग्ण हे एकट्या मुंबईतील आहेत. आजच्या 75 रुग्णांसह राज्यातील ओमिक्रॉन रुग्णांची एकूण संख्या आता 653 वर पोहोचली आहे.

कोणत्या शहरात ओमिक्रॉनचे किती रुग्ण?

मुंबई – 408 पुणे शहर – 71 पुणे ग्रामीण _ 26 पिंपरी-चिंचवड – 38 ठाणे – 22 पनवेल – 16 नागपूर – 13 नवी मुंबई – 10 सातारा – 8 कल्याण-डोंबिवली – 7 उस्मानाबाद, कोल्हापूर – 5 वसई विरार – 4 नांदेड, भिवंडी – 3 औरंगाबाद, बुलडाणा, मीरा भाईंदर, सांगली – 2 लातूर, अहमदनगर, अकोला, रायगड, उल्हासनगर, अमरावती – 1

संबंधित बातम्या

Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाचा कहर, दिवसभरात 18 हजारापेक्षा अधिक रुग्ण, 20 जणांचा मृत्यू

Mumbai Corona Update | मुंबईत महाभयंकर रुग्णवाढ, नवे रुग्ण 10 हजाराच्या पार, मुंबईचे आकडे धडकी भरवणारे!

राज ठाकरे यांच्याकडून आगामी 10 दिवसांमधील कार्यक्रम रद्द, सुरक्षा ताफ्यातील एकाला कोरोना

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.