शरद पवारजी तुम्ही पुन्हा अर्धसत्य सांगून.., वंचित बहुजन आघाडीचे पवारांना 5 प्रश्न
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, शरद पवार यांनी आज विधानसभा निवडणुकीबाबत बोलताना मोठं वक्तव्य केलं, त्यावर प्रतिक्रिया देताना आता वंचित बहुजन आघाडीकडून जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं, मात्र विधानसभा निवडणुकीत हे यश त्यांना टिकवता आलं नाही, विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं. महायुतीचे राज्यात तब्बल 232 उमेदवार विजयी झाले तर महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवरच समाधान मानावलं लागलं. दरम्यान त्यानंतर सातत्यानं महाविकास आघाडीकडून ईव्हीएमच्या मुद्द्यावरून आरोप सुरू आहेत.
त्यानंतर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ‘विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन लोक माझ्याकडे आले होते, ते मला 288 जागांपैकी 160 जागा निवडून आणण्याची गॅरंटी देत होते, 160 जागांवर ते मतांची फेरफार करण्याबाबत मला सांगत होते’ असा दावा पवार यांनी केला आहे, दरम्यान शरद पवार यांच्या या वक्तव्यामुळे आता पुन्हा एकदा राज्यात वातावरण तापलं आहे, यावरून आता वंचित बहुजन आघाडीने ट्विट करत शरद पवार यांना काही प्रश्न विचारले आहेत.
ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलं?
.@PawarSpeaks जी, तुम्ही पुन्हा अर्धसत्य सांगून निघून गेलात!
दोन लोकं तुम्हाला भेटली, ज्यांनी तुम्हाला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हेराफेरी करण्याची ऑफर दिली आणि सांगितले की, ते तुम्हाला १६० विधानसभेच्या जागा जिंकून देतील. तुम्ही म्हणत आहात की, तुम्हाला त्यांची नावे माहित… pic.twitter.com/SP5fYs8VWD
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) August 9, 2025
