AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vasai-Virar Rain | वसईत सनसिटी गास रस्ता 4 दिवसांपासून पाण्याखाली, 10 ते 12 गाव पुराच्या विळख्यात

अनेक गावाला पुराने वेढा दिल्यानंतर प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Vasai-Virar Rain | वसईत सनसिटी गास रस्ता 4 दिवसांपासून पाण्याखाली, 10 ते 12 गाव पुराच्या विळख्यात
vasai heavy rain
| Edited By: | Updated on: Jul 22, 2021 | 12:02 PM
Share

विरार : गेल्या काही आठवड्यांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने राज्यात ठिकठिकाणी रौद्ररुप धारण केले आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, वसई, विरार, पालघर यांसह ठिकठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. वसई तालुक्यातील 10 ते 12 गावांना तानसा नदीच्या पुराचा विळखा पडला आहे. तानसा धरण ओव्हर फ्लो झाल्याने मध्यरात्रीच्या सुमारास नदीला पूर आला आहे. या पुराने भाताने, नावसाई, जाभुलपाडा, थल्याचा पाडा, बेलवाडी, आडना यासह अनेक छोट्या मोठ्या गावांना विळखा घातला आहे.

तानसा नदी गावाला पुराने वेढा

तानसा नदीला पूर आल्याने किनाऱ्यावर राहणाऱ्या अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. त्यामुळे गावकऱ्यांना पूर्ण रात्र जागरण करावी लागली. अनेक गावाला पुराने वेढा दिल्यानंतर प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

वसईतील सनसिटी-गास रस्त्यावर गुडघाभर पाणी

तर दुसरीकडे वसईतील सनसिटी-गास रस्ता 4 दिवसापासून पाण्याखाली गेला आहे. वसई, विरार, नालासोपारा शहरात मध्यरात्रीपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे शहरातील सकल भागात रस्त्यावर साचलेले पाणी ओसरले आहे. मात्र वसईतील सनसिटी रस्त्यावरील पाणी अद्याप तसेच आहे. वसईतील सनसिटी-गास रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले आहे. त्यामुळे अनेक वाहनधारक जीव मुठीत घालून या पाण्यातून मार्ग काढत आहेत. सनसिटी- गास रस्त्याला समुद्राचे स्वरूप आल्याने रस्ता कुठे आहे हे दिसणे ही कठीण झाले आहे.

रस्ता वाहतुकीसाठी बंद करणे गरजेचे

वसई पश्चिमेकडून गास, भुईगाव, सोपारा, निर्मळ, विरार पश्चिम या ठिकाणी जाण्यासाठी हा जवळचा बायपास रोड आहे. मात्र या रस्त्यावरील पाणी साचले आहे. हे पाणी ओसरायला पुढचे 8 दिवस लागू शकतात. तोपर्यंत हा रस्ता प्रशासनाने वाहतुकीसाठी बंद करणे गरजेचे आहे. अन्यथा याठिकाणी दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

(Vasai Virar Palghar Heavy rain flood in many village)

संबंधित बातम्या : 

Konkan Rain : कोकण, कोल्हापुरात तुफान पाऊस, NDRF ची पथकं रवाना, रस्ते, रेल्वे वाहतूक रखडली

Chiplun Flood: चिपळूण जलमय, ढगफुटीने हाहाकार; बाजारपेठेत 5 फुट पाणी, अनेक जण पुरात अडकले, 2005च्या पुनरावृत्तीची भीती

गच्चीवरुन पूर पाहताना तोल गेला, पाण्यात पडून महाडमध्ये 50 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.