AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विदर्भात उष्णतेची लाट, 24 तासांत 8 जणांचा मृत्यू? संपूर्ण राज्यात खळबळ

विदर्भात उन्हाचा कहर पाहायला मिळत असून नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात उष्माघाताने ८ जणांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. हवामान विभागाने विदर्भात उष्णतेचा रेड अलर्ट जारी केला आहे.

विदर्भात उष्णतेची लाट, 24 तासांत 8 जणांचा मृत्यू? संपूर्ण राज्यात खळबळ
heat wave
| Updated on: May 24, 2026 | 10:42 AM
Share

गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णतेचा कडाका प्रचंड वाढला आहे. त्यातही विदर्भात सूर्याने आग ओकण्यास सुरुवात केली असून तापमानाचा पारा कमालीचा वाढला आहे. गेल्या २४ तासांत यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्यात उष्माघाताने एकूण ८ जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नागपूर आणि यवतमाळ या दोन्ही जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी ४ जणांचे मृतदेह आढळून आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. त्यातच हवामान विभागाने विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा देत रेड अलर्ट जारी केला आहे.

यवतमाळमध्ये एकाच दिवशी चौघांचा मृत्यू

यवतमाळ जिल्ह्यात उष्णतेची लाट अतिशय तीव्र झाली आहे. त्यामुळे शनिवारी एकाच दिवशी ४ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यवतमाळच्या दिग्रस शहरात वेगवेगळ्या तीन ठिकाणी ३ जणांचे मृतदेह आढळून आले. एकाच दिवशी शहरात ३ मृतदेह आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या मृतांपैकी दोघांची ओळख पटली असून, उर्वरित दोघांची ओळख पटवण्याचे काम अद्याप पोलीस करत आहेत.

तर बाभूळगाव तालुक्यातील गवंडी गावाजवळ असलेल्या पुलाखाली ६० वर्षीय मारोतराव कोवे हे मृतावस्थेत आढळून आले. तीव्र उष्णतेमुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

नागपुरात उष्माघातामुळे ४ बळी गेल्याची शक्यता

नागपूर जिल्ह्यातही सूर्यदेवतेचा प्रकोप पाहायला मिळत आहे. शनिवारी नागपूर शहरात तापमानाचा पारा तब्बल ४५ अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. या उष्णतेच्या लाटेमुळे नागपूर शहरात २ आणि सावनेर तालुक्यात २ अशा एकूण ४ जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. नागपूर शहरातील सक्करदरा आणि यशोधरा नगर परिसरात दोन अनोळखी व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या होत्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

तर नागपूर ग्रामीणमधील सावनेर परिसरातही उष्णतेमुळे दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हे सर्व मृत्यू उष्माघातानेच झाले आहेत का, याचा तपास पोलीस आणि आरोग्य प्रशासन करत आहे. त्यांचा शवविच्छेदन अहवाल (Post-Mortem Report) आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.

नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी

वाढत्या तापमानामुळे विदर्भातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अकोला, अमरावती, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांना तीव्र उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. या भागात आज उष्णतेचा कहर राहण्याचा अंदाज आहे. तर नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यात एकीकडे तापमानात मोठी वाढ झाल्याने स्थानिक प्रशासनाने नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नागरिकांनी दुपारच्या कडक उन्हात विनाकारण घराबाहेर पडू नये. तसेच शेतातील किंवा इतर कष्टाची व अतिश्रमाची कामे दुपारच्या वेळी करणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल