AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपुरासह विदर्भाला हवामान विभागाचा अलर्ट, पुढील दोन दिवसात…

नागपूर हवामान विभागाने विदर्भात येणाऱ्या अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. पुढील एक ते दोन दिवसांत मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याची शक्यता आहे. द्रोणिका आणि चक्रवाती वाऱ्यामुळे बंगालच्या खाडीतून बाष्पयुक्त वारे विदर्भात येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. परंतु, उष्णतेच्या लाटेचा अंदाज नाही.

नागपुरासह विदर्भाला हवामान विभागाचा अलर्ट, पुढील दोन दिवसात...
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 15, 2025 | 8:39 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. त्यातच आता हवामान विभागाने नागपूरसह विदर्भात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. पुढील एक ते दोन दिवसात नागपूरसह विदर्भातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस पडेल, अशी शक्यता नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भाच्या वातावरणात द्रोणिका (अप्पर टफ वे) आणि चक्रवाती वारे तयार झाले आहेत. यामुळे बंगालच्या खाडीतून मोठ्या प्रमाणात बाष्पयुक्त वारे विदर्भाकडे वाहत आहेत. याच कारणामुळे काही भागांमध्ये पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. यासोबतच विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह विजा चमकण्याची शक्यता आहे. तसेच, काही ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहू शकतो, ज्याची गती ताशी ४० ते ५० किलोमीटर इतकी राहण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या शक्यतेनुसार, विदर्भातील तापमान इतर दिवसांपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. रात्री उशिरा पावसाची शक्यता असल्याने दिवसाच्या तापमानावर विशेष परिणाम जाणवणार नाही. नागपूर प्रादेशिक हवामान विभागाचे शास्त्रज्ञ प्रवीण कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील पाच दिवसांसाठी विदर्भात उष्णतेच्या लाटेचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही.

तसेच कोकणातील मुंबईसह सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यातील इतर अनेक भागांमध्ये लवकरच पावसाची हजेरी लागणार असल्याने नागरिकांना उकाड्यांपासून दिलासा मिळेल.

राज्यात पावसाळी वातावरण

काही दिवसांपूर्वी पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. मात्र आता तो निवळला आहे. राजस्थानच्या पश्चिमेपासून विदर्भाच्या उत्तरेपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. याचा परिणाम म्हणून राज्यात पावसाळी वातावरण तयार झाले आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा अजूनही ४० अंशांच्या आसपास आहे. मात्र, किनारपट्टीवरील तापमानात गेल्या काही दिवसांपासून घट होत आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.