AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vidhan Sabha election : उमेदवारी अर्ज भरायला 2 दिवस शिल्लक, मविआ, महायुतीकडून किती जागांवर उमेदवारांची घोषणा? पहा संपूर्ण आकडेवारी

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला आता अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत, मात्र अजूनही जागा वाटपाचा पेच सुटताना दिसत नाहीये.

Vidhan Sabha election : उमेदवारी अर्ज भरायला 2 दिवस शिल्लक, मविआ, महायुतीकडून किती जागांवर उमेदवारांची घोषणा? पहा संपूर्ण आकडेवारी
| Updated on: Oct 27, 2024 | 8:44 PM
Share

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं काउंटडाऊन सुरू झालं आहे. येत्या 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. 29 ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. तर चार नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. दरम्यान आता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत. मात्र अजूनही महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये काही जागांवर तिढा कायम असल्यानं उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली नाहीये. जागा वाटपाचा पेच सोडवण्यसाठी महायुतीमधील घटक पक्षांचं दिल्लीमध्ये बैठकांचं सत्र सुरू आहे. तर महाविकास आघाडीच्या देखील बैठकावर बैठका सुरू आहेत. त्यामुळे आता जागा वाटपाचा तिढा कधी सुटणार आणि कधी सर्व उमेदवारांची घोषणा केली जाणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महाविकास आघाडीबाबत बोलायचं झाल्यास महाविकास आघाडीकडून आतापर्यंत 288 विधानसभा मतदारसंघांपैकी 247 जागांवर उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. अद्यापही 41 जागांवर उमेदवारांची घोषणा होणं बाकी आहे, महाविकास आघाडीकडून काँग्रेसनं आतापर्यंत 87 जागांवर आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून 76 जागांवर उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटानं 84 जागांवर आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. तर महायुतीकडून आतापर्यंत एकूण 215 जागांवर उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून, अद्याप 73 जागांवर उमेदवारांची घोषणा होणं बाकी आहे. ज्यामध्ये भाजपकडून सर्वाधिक 121 जागांवर आपल्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाकडून 45 जागांवर तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून 49 जागांवर उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून आतापर्यंत उमेदवारांच्या तीन याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यापैकी पहिल्या यादीमध्ये 65 उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती. दुसऱ्या यादीमध्ये 15 तर तिसऱ्या यादीमध्ये एकूण 4 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेसकडून आतापर्यंत तीन उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत, त्यापैकी पहिल्या यादीमध्ये एकूण 48 उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती, दुसऱ्या यादीमध्ये 23 तर तीसऱ्या यादीमध्ये 16 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून देखील आतापर्यंत तीन याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत, पहिल्या यादीमध्ये 45, दुसऱ्या यादीमध्ये 22 आणि तिसऱ्या यादीमध्ये 9 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. अजून 41 जागांवर उमेदवारांची घोषणा होणं बाकी आहे.

तर दुसरीकडे महायुतीमध्ये अजूनही 73 जागांवर उमेदवार देण्यात आलेले नाहीत. भाजपकडून आतापर्यंत उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत, त्यामध्ये पहिल्या यादीत सर्वाधिक 99 उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती. तर दुसऱ्या यादीमध्ये एकूण 22 जागांवर उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाकडून आतापर्यंत फक्त एकच उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे, ज्यामध्ये त्यांनी एकूण 45 उमेदवारांची घोषणा केली तर अजित पवार गटाकडून आतापर्यंत उमेदवारांच्या तीन याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत, त्यामध्ये पहिल्या यादीत 38 उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती, दुसऱ्या यादीमध्ये 7 तर दिसऱ्या यादीमध्ये 4 उमेदवारांच्या नावाची घोषणा

Follow Us
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
Chandrapur | काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर...  गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
Chandrashekhar Bawankule | महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळं; संशयाचा काटा
Sanchita Ugle Case | तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळलं; संशयाचा काटा नेमका कुणावार
एकही मत फुटता कामा नये; महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
एकही मत फुटता कामा नये; विधान परिषद निवडणुकीत महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
मोठी बातमी! पांढऱ्या कोटामागचा काळा चेहरा? उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केल
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केला अन्...त्या कृतीची सगळीकडे चर्चा!
मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप..
Manda Mhatre | मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, भाजपाचे दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद!
मोठी बातमी! पुण्यात भीषण आग; एकापाठोपाठ एक दुकाने...आगीचं कारण काय?
मोठी बातमी! पुण्यात भीषण आग; एकापाठोपाठ एक दुकाने...आगीचं कारण काय?
24 तास दरवाजे...सरनाईकांच्या विधानाची एकच चर्चा!
Pratap Sarnaik | ऑपरेशन टायगरबाबत मोठा गौप्यस्फोट, 24 तास दरवाजे...सरनाईकांच्या विधानाची एकच चर्चा!
याला म्हणतात धाक! सर्वत्र चर्चेत असलेले तुकाराम मुंढे छापा टाकणार या..
याला म्हणतात धाक! सर्वत्र चर्चेत असलेले तुकाराम मुंढे छापा टाकणार या आधीच... अकोल्यात घडलं असं काही की...