AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Wardha Funeral | वर्ध्यातील 51 गावांना अद्यापही श्मशानशेडची प्रतीक्षा; काही ठिकाणी शेड जीर्ण; अंतिम प्रवासात दुर्दशेचे फेरे!

वर्धा जिल्ह्यात एकूण 520 ग्रामपंचायत आहे. यापैकी 51 गावांतील स्मशानभूमीत अजूनही शेड नसल्याने उघड्यावरच दहन करावे लागत आहे. ग्रामीण भागात अजूनही अंत्यसंस्कारासाठी पुरेशी सुविधा नसल्याने मृतदेहांची अवहेलना होत आहे. बऱ्याच गावांत बनविण्यात आलेले स्मशान शेड हे जीर्ण झाल्याने उघड्यावर मृतदेहांवर अंत्यसंस्काराचे सोपस्कार आटोपावे लागतात.

Wardha Funeral | वर्ध्यातील 51 गावांना अद्यापही श्मशानशेडची प्रतीक्षा; काही ठिकाणी शेड जीर्ण; अंतिम प्रवासात दुर्दशेचे फेरे!
वर्ध्यात काही ठिकाणी स्मशानशेड नाही, काही ठिकाणी अशी दुर्दशा झालीय. Image Credit source: t v 9
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: May 30, 2022 | 5:32 PM
Share

वर्धा : प्रत्येक गावात अंत्यसंस्कारासाठी श्मशानभूमीच्या विकासाकरिता जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी उपलब्ध करून दिला जातो. मात्र, जिल्ह्याच्या 51 गावांत आजही स्मशानभूमी नसल्याचं उघडकीस आलय. एवढंच नव्हे तर अनेक गांवात निर्माण करण्यात आलेले श्मशान शेड जीर्ण झाले आहे. यामुळे उघड्यावरच अंत्यसंस्कार करण्याची वेळ नागरिकांवर (Citizens) आली आहे. अंतिम प्रवासातही स्मशानभूमीच्या दुर्दशेचे फेरे घ्यावे लागत आहेत. मृत्यूनंतरही (Bodies) नरक यातना सोसावी लागत असल्याचे चित्र आहे. जीवन जगत असताना संघर्ष (Conflict) करावा लागतो. पण, मृतदेहांनाही यातना सहन कराव्या लागत असल्याचं चित्र आहे. उघड्यावर अंत्यसंस्कार करावा लागत आहे. पावसाळ्यात मोठा त्रास सहन करावा लागतो. यावर उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक करत आहेत.

जिल्हा नियोजन समितीचा निधी जातो कुठं

वर्धा जिल्ह्यात एकूण 520 ग्रामपंचायत आहे. यापैकी 51 गावांतील स्मशानभूमीत अजूनही शेड नसल्याने उघड्यावरच दहन करावे लागत आहे. ग्रामीण भागात अजूनही अंत्यसंस्कारासाठी पुरेशी सुविधा नसल्याने मृतदेहांची अवहेलना होत आहे. बऱ्याच गावांत बनविण्यात आलेले स्मशान शेड हे जीर्ण झाल्याने उघड्यावर मृतदेहांवर अंत्यसंस्काराचे सोपस्कार आटोपावे लागतात. याकडे प्रशासन लक्ष देत नाहीय, अशी नागरिकांची ओरड आहे. गावांत स्मशानभूमी शेड व सौंदर्यीकरण करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधी प्रदान केला जातो. मात्र, आजही अनेक गावांत स्मशानभूमी शेडसह अनेक मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे चित्र आहे.

या गावांत नाही स्मशानशेड

सप्टेंबर 2021 मध्ये जवळपास 58 गावांत स्मशानभूमी शेडची वानवा होती. मागील आठ महिन्यांत केवळ सात गावांत स्मशानभूमी शेड निर्माण केल्याची माहिती आहे. कामाची गती अत्यंत संथ असल्याने ग्रामिणांमध्ये संताप उफाळला आहे. सद्यस्थितीत 51 गावांत आजही स्मशानभूमी शेडचा अभाव असल्याचे चित्र आहे. वर्धा तालुक्यातील वागदरा, देवळी तालुक्यातील हेटी, कोलावस्ती, पारधी बेडा, कवठा रेल्वे येथे स्मशानशेड नाही. आर्वी तालुक्यातील वागदा, महाकाळी, पारगोठाण, सावद, सहेली, डबलीपूर, बोरखेडी, तांडा, लहानादेवी, येथे आष्टी तालुक्यातील तारासावंगा, वाडेगाव, माणिकवाडा, टूमनी, रानवाडी, पेठ अहमदपूर, दलपतपूर, पेठ, सिरसोली येथेही स्मशानशेड नाही. कारंजा तालुक्यातील आंभोरा, बांगडापूर, ढगा, हेटी, धावसा, भालेवाडी, चिंचोली, महादापूर, पांजरा बंगला, किन्हाळा समुद्रपूर तालुक्यातील धानोली, परसोडी, जिरा, रामपूर, सुलतानपूर, सुकळी, बोथली, रज्जापूर, पारडी या गावांना स्माशानशेडची प्रतीक्षा आहे. हिंगणघाट तालुक्यातील गांगापूर, चानकी, मानकापूर, हिवरा बेघर वस्ती, कडाजना, कुकाबर्डी, कुंभी, वरुड व कवडघाट या गावात स्मशानभूमी शेडचे अद्यापही निर्माण झालेले नाही.

Follow Us
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
Girish Mahajan | रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? गिरीश महाजनांचा मोठा दावा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
Gondia Rain | गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक शेतकरी चिंतेत
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
Mumbai | नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! 13 एप्रिलला अटक, आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड