AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : Wardha CCTV | वर्ध्यात संगणक, थंब मशीनसह पळविल्या भोजन प्लेट, सिंदीतील चोरटे सीसीटीव्हीत कैद

टिळक प्राथमिक शाळेतून विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनाच्या 512 प्लेट (ताट) लंपास करण्यात आल्या. तो मुद्देमाल 10 हजार 200 रुपयांचा असल्याचे सांगण्यात आले. या दोन्ही चोऱ्यांमुळे शहरात एकच खळबळ उडाली. सदर चोरीची सिंदी पोलिसात तक्रार करण्यात आली आहे.

Video : Wardha CCTV | वर्ध्यात संगणक, थंब मशीनसह पळविल्या भोजन प्लेट, सिंदीतील चोरटे सीसीटीव्हीत कैद
वर्ध्यात संगणक, थंब मशीनसह पळविल्या भोजन प्लेटImage Credit source: t v 9
| Edited By: | Updated on: May 22, 2022 | 12:58 PM
Share

वर्धा : सिंदी (रेल्वे) शहरातील नामांकित दोन शाळेत पहिल्यांदाच झालेल्या चोरीमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. यात चोरट्यांनी शाळेतील संगणकासह विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनासाठी असलेले ताटही लंपास केले. या चोऱ्यांमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरटे शाळेत लागलेल्या सीसीटीव्हीमध्ये (CCTV) कैद झाले आहे. सिंदी (रेल्वे ) (Sindi) शहरातील नामांकित केसरीमल नगर विद्यालय (Kesrilal Nagar Vidyalaya) तसेच पालिकेच्या टिळक प्राथमिक शाळेत चोरीची घटना घडली. नगर विद्यालयातून लॅपटॉप, मॉनिटर, पीसीओ, प्रिंटर, बायोमेट्रिक थंम मशीन, सीसीटीव्ही कॅमेरा आदी सर्व लंपास केले. चोरी गेलेला मुद्देमाल 41 हजार 440 रुपयांचा असल्याचे सांगण्यात आले आहे.

पाहा व्हिडीओ

भोजनाच्या 512 प्लेट लंपास

टिळक प्राथमिक शाळेतून विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनाच्या 512 प्लेट (ताट) लंपास करण्यात आल्या. तो मुद्देमाल 10 हजार 200 रुपयांचा असल्याचे सांगण्यात आले. या दोन्ही चोऱ्यांमुळे शहरात एकच खळबळ उडाली. सदर चोरीची सिंदी पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे शाळेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोर कैद झाले आहेत. पोलिसांकडून चोरट्याचा शोध घेतला जात आहे.

चोरट्यांनी शाळेलाही सोडले नाही

चोरट्यांनी आपला मोर्चा शाळेकडं वळविला. शाळेतील साहित्य लंपास केले. यावरून चोर कोणत्या पातळीवर पोहचलेत, याचा अंदाज येतो. शाळेतील उपयोगाच्या छोट्याछोट्या वस्तू या चोरट्यांनी लंपास केल्यात. घटना सीसीटीव्हीत कैद झाल्यानं आता हे चोरटे रडारवर आले आहेत. पोलीस त्यांना अटक केल्याशिवाय राहणार नाही.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.