AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Har Ghar Tricolor : वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयात सेल्फी पॅाईंटचे उद्घाटन, हर घर तिरंगा उपक्रमाची जनजागृती, उत्कृष्ट 3 सेल्फीला पुरस्कार

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात जास्तीत जास्त नागरिकांना सहभागी करून घ्यावयाचे आहे. सोबतच हर घर तिरंगा अभियानांतर्गत प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा ध्वज लावावा यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जात आहे

Har Ghar Tricolor : वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयात सेल्फी पॅाईंटचे उद्घाटन, हर घर तिरंगा उपक्रमाची जनजागृती, उत्कृष्ट 3 सेल्फीला पुरस्कार
वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयात सेल्फी पॅाईंटचे उद्घाटन
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Aug 08, 2022 | 10:04 PM
Share

वर्धा : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या जनजागृतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात सेल्फी पॅाईंट तयार करण्यात आला आहे. या सेल्फी पॅाईंटचा आज शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार रणजित कांबळे (MLA Ranjit Kamble), आमदार पंकज भोयर, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार (Collector Prerna Deshbhartar), मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे (Archana More), उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, उपविभागीय पोलिस अधिकारी पीयूष जगताप, तहसीलदार रमेश कोळपे उपस्थित होते.

प्रत्येकाना घरासमोर तिरंगा लावावा

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात जास्तीत जास्त नागरिकांना सहभागी करून घ्यावयाचे आहे. सोबतच हर घर तिरंगा अभियानांतर्गत प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा ध्वज लावावा यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जात आहे. त्याअंतर्गतच उपविभागीय अधिकारी कार्यालय वर्धा व उपविभागातील वर्धा, देवळी व सेलू कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने हा सेल्फी पॅाईंट तयार करण्यात आला आहे. सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी किंवा कोणतीही इच्छुक व्यक्ती येथे आपला सेल्फी काढू शकतात. उत्कृष्ट तीन सेल्फीस पुरस्कार देखील दिला जाणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात प्रत्येकाने सहभागी झाले पाहिजे. प्रत्येकाने हर घर तिरंगा मोहीम कालावधीत आपल्या घरावर तिरंगा ध्वज लावून मोठ्या प्रमाणात यात सहभागी व्हा, असे आवाहन यावेळी उपस्थित मान्यवरांनी केले.

अभियान आत्मसन्मानाचे, देशाप्रती बांधीलकीचे

हर घर तिरंगा हा आपल्या सर्वांचे अभियान आहे. नव्या पिढीला स्वातंत्र्यवीरांनी केलेल्या संघर्षाची जाणीव, जागृती करण्याचा हा विषय आहे. त्यामुळे कुठल्याही अव्यवस्थेचे छायाचित्र काढून, व्हिडिओ बनवून, समाज माध्यमांवर व्हायरल करण्याऐवजी तरुणांनी सर्वप्रथम ती अव्यवस्था दूर करावी. सौहार्दपूर्ण परिस्थिती राहील, अशी वागणूक ठेवावी. हे अभियान उन्मादाचे नसून आत्मसन्मानाचे, आत्मियतेचे व देशाप्रती बांधिलकीचे आहे, याची जाणीव प्रत्येक नागरिकांनी ठेवावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

Follow Us
पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
Rohit Pawar | रोहित पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले.....
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले, पश्चात्ताप झाला असेल तर या... रोख कुणाकडे?
काँग्रेसच्या झेंड्याखाली या...राऊतांच्या एका वक्तव्याने चर्चांना उधाण
Sanjay Raut UNCUT | काँग्रेसच्या झेंड्याखाली या... संजय राऊतांच्या त्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ....
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ एवढे टक्के साठा...
विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय
tv9 Marathi Special Report | विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय! राजकारणातील सर्वात मोठा ट्विस्ट
राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार?
Nana Patole On NCP Merger | राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार? नाना पटोलेंच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या हलाचाली, नेमकं काय घडलं?
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या विधानाची चर्चा, नेमकं काय म्हणाले?
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला; नेमकं काय घडतंय?*
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट म्हणाल्या न्याय देण्यासाठी...