AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Wardha Rain Update : वर्धा जिल्ह्यात मुसळधार पाऊस, जिल्ह्यातील महत्त्वाचे मार्ग वाहतुकीसाठी पुर्णपणे बंद

नदी, नाल्यांनापूर आल्याने कारंजा तालुक्यातील कारंजा माणिकवाडा रस्ता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे तेथील सहा गावांचा संपर्क तुटला असून वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे.

Wardha Rain Update : वर्धा जिल्ह्यात मुसळधार पाऊस, जिल्ह्यातील महत्त्वाचे मार्ग वाहतुकीसाठी पुर्णपणे बंद
वर्धा जिल्ह्यात मुसळधार पाऊस, जिल्ह्यातील महत्त्वाचे मार्ग वाहतुकीसाठी पुर्णपणे बंदImage Credit source: tv9marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Aug 10, 2022 | 11:21 AM
Share

वर्धा : वर्धा (wardha) जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरु आहे. मागच्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने नद्यांना पुन्हा पूर आला आहे. जुलै महिन्यात मुसळधार पाऊस ज्यावेळी झाला होता. त्यावेळी देखील परिस्थिती अधिक बिकट झाली होती. अनेक गावांचा संपर्क तुटला होता. तसेच मुसळधार पावसामुळे नदीच्या पाणी पात्रात देखील वाढ झाली आहे. सतत सुरु असलेल्या पावसामुळे नदी, नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे धरणातून पाणी देखील सोडण्यात आले आहे. धरणातून (Dam) मोठा विसर्ग सोडल्यापासून जिल्ह्यातील अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे गरजे असेल तरचं घरातून बाहेर पडा असा आदेश जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

वर्धा जिल्ह्यात पावसाने चांगलाच कहर केला आहे

वर्धा जिल्ह्यात पावसाने चांगलाच कहर केला आहे. काही वेळेसाठी विश्रांती घेत पाऊस पुन्हा पडत असल्याने नदी, नाल्यांना पूर आला आहे. रात्रीपासून जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार तर कुठे पावसाची रिपरिप पाहावयास मिळत आहे. सतत सुरु असलेल्या पावसामुळे अनेक नद्यांना पुर आला आहे. त्यामुळे जिल्ह्याचे अनेक मार्ग पाण्याखाली आल्याने वाहतुकीसाठी बंद आहे. सततच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून मदतीची मागणी केली जातं आहे. दुसऱ्यांदा पूर आल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी सरकारी मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. शेतीत नदीचे पाणी घुसल्याने पीक पुर्णपणे पाहून गेले आहे.

जिल्ह्यातील अनेक रस्त्यावर पुराचे पाणी

नदी, नाल्यांनापूर आल्याने कारंजा तालुक्यातील कारंजा माणिकवाडा रस्ता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे तेथील सहा गावांचा संपर्क तुटला असून वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. आर्वी तालुक्यातील कासारखेड सावध, आर्वी कौढण्यपूर, आर्वी वर्धमनेरी हे मार्ग वाहतुकीसाठी बंद आहे. तर हिंगणघाट तालुक्यातील सिरसगाव कापसी आणी चानकी भगवा हे मार्ग बंद झाले आहे. जोपर्यंत पावसाचा जोर कमी होत नाही तोपर्यंत जिल्ह्यातील अनेक महत्त्वाचे मार्ग बंद ठेवण्यात येणार आहेत.

Follow Us
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या हलाचाली, नेमकं काय घडलं?
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या विधानाची चर्चा, नेमकं काय म्हणाले?
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला; नेमकं काय घडतंय?*
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट म्हणाल्या न्याय देण्यासाठी...
खो-खो, कबड्डी... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
Chhagan Bhujbal | खो-खो, कबड्डी, बुद्धिबळ... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना बेदम मारहाण
एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ
Pratap Sarnaik | एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ; सरकारचा निर्णय काय
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील तटकरे भरमंचावरुन हे काय बोलले?
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? अनेक आमदार-खासदार संपर्कात; शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा!
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा आरोप झालेल्या मोटवानीसोबतचे फोटोसेशन चर्चेत