AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी पोटदुखी, मग ताप, तपासणीत समोर आलं धक्कादायक सत्य, 7 वर्षाच्या देवांशीला कसं मिळालं जीवनदान?

वाशिम जिल्ह्यातील देवांशी गावंडे या सात वर्षांच्या मुलीला गंभीर यकृत विकारातून जीवनदान मिळाले आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्टच्या मदतीने मुंबईत यशस्वी यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली.

आधी पोटदुखी, मग ताप, तपासणीत समोर आलं धक्कादायक सत्य, 7 वर्षाच्या देवांशीला कसं मिळालं जीवनदान?
wadia hospital
| Updated on: Oct 28, 2025 | 12:55 PM
Share

वाशिम जिल्ह्यातील एका भाजीपाला विक्रेत्या कुटुंबाच्या सात वर्षांच्या मुलीला गंभीर यकृत विकारातून जीवनदान मिळाले आहे. मंगरुळपीर तालुक्यातील वरुड येथील देवांशी रवींद्र गावंडे हिच्यावर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्टच्या मदतीने यशस्वी यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. मुंबईतील वाडिया रुग्णालयात ही यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली. विशेष म्हणजे, देवांशीला तिच्या आईनेच यकृत दान केले. सध्या आई-मुलगी दोघीही सुखरूप असून त्यांच्या आरोग्यात सुधारणा होत आहे.

काय आहे प्रकरण?

वरुड गावातील रवींद्र गावंडे हे भाजीपाला विक्रीचा छोटा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांची सात वर्षांची मुलगी देवांशीला गेल्या काही महिन्यांपासून तीव्र पोटदुखी, ताप आणि मळमळ अशा गंभीर समस्या जाणवत होत्या. सुरुवातीला मंगरुळपीर आणि अकोला येथे उपचार करूनही प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यामुळे तिला नागपूर आणि नंतर मुंबईतील वाडिया रुग्णालयात हलवण्यात आले. यानंतर तिच्या वैद्यकीय तपासणी करण्यात आल्या. यात डॉक्टरांनी देवांशीचे यकृत गंभीर स्वरूपात बाधित झाल्याचे निदान केले. यानंतर यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया हाच एकमेव पर्याय असल्याचे सांगितले.

या यकृत प्रत्यारोपणासाठी सुमारे २० लाख रुपयांचा मोठा खर्च होता. भाजीपाला विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या गावंडे कुटुंबासाठी हा खर्च आवाक्याबाहेरचा होता, त्यामुळे कुटुंबासमोर मोठे संकट उभे राहिले. याच वेळी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष आणि टाटा ट्रस्ट यांनी आर्थिक मदतीचा हात पुढे केला. या दोन संस्थांनी मोठा आर्थिक भार उचलल्यानंतर उर्वरित रक्कम सामाजिक संस्था आणि गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून जमा केली.

या बिकट परिस्थितीत देवांशीची आई मीनाक्षी गावंडे यांनी आपल्या मुलीला जीवनदान देण्यासाठी स्वतः यकृत दान करण्याचा धाडसी निर्णय घेतला. मुंबईतील बाई जेराबाई वाडिया रुग्णालयात ७ जुलै २०२५ रोजी ही गुंतागुंतीची आणि जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. यकृत प्रत्यारोपणानंतर देवांशीची प्रकृती आता स्थिर असून, तिच्या आरोग्यात दिवसेंदिवस सुधारणा होत आहे. देवांशीचे वडील रवींद्र गावंडे यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्ट यांच्या मदतीमुळेच आपल्या मुलीचे प्राण वाचल्याचे सांगत कृतज्ञता व्यक्त केली. “आम्ही आयुष्यभर त्यांचे ऋणी राहू,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

वाडीया हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा बेंदरे यांनी माहिती दिली की, अति जोखमीच्या आजारांवरही शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्समध्ये मोफत उपचार केले जातात. वाडिया हॉस्पिटलमधील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सामूहिक प्रयत्न करून ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. दरम्यान, वाशीम येथील मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाच्या डॉ. नयना सारडा यांनी गरजू रुग्णांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष नेहमी तत्पर असतो, असे सांगितले. कमीतकमी कागदपत्रांची पूर्तता करून रुग्णालयात भरती असतानाच आर्थिक सहाय्य दिले जाते. त्यामुळे गरजू नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

Follow Us
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय.

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!.

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!

इंग्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतरही भारतीय संघाला मोठा फायदा, शुभमन गिल, विराट कोहली आणि रोहितला मिळाली आनंदाची बातमी.

इंग्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतरही भारतीय संघाला मोठा फायदा, शुभमन गिल, विराट कोहली आणि रोहितला मिळाली आनंदाची बातमी

CJP Delhi Protest : आधी वांगचूक यांची भेट नंतर केंद्र सरकारचं मोठं पाऊल, CJP ची भेट घेणार; मागण्यांचं काय होणार?.

CJP Delhi Protest : आधी वांगचूक यांची भेट नंतर केंद्र सरकारचं मोठं पाऊल, CJP ची भेट घेणार; मागण्यांचं काय होणार?

मी जंतरमंतरवर कधीच जाणार नाही, तिथे देशद्रोही लोक..; प्रसिद्ध गीतकाराची रोखठोक भूमिका.

मी जंतरमंतरवर कधीच जाणार नाही, तिथे देशद्रोही लोक..; प्रसिद्ध गीतकाराची रोखठोक भूमिका