AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पापड उद्योगातून तिने महिलांना मिळवून दिला रोजगार; वाशिमच्या विमल राजगुरू यांची उंच भरारी

या योजनेच्या माध्यमातून ४ लाख ८८ हजार रुपयांचे कर्ज काढले. त्या पैशातून वाशिम येथे तृप्ती पापड उद्योग सुरू केला.

पापड उद्योगातून तिने महिलांना मिळवून दिला रोजगार; वाशिमच्या विमल राजगुरू यांची उंच भरारी
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Jun 16, 2023 | 6:27 PM
Share

विठ्ठल देशमुख, प्रतिनिधी, वाशिम : शिकलेली आई घरा दाराला पुढे नेई, हे प्रेरक घोषवाक्य साध्य झाल्याचा प्रत्यय वाशिममध्ये आला. वाशिम येथील तृप्ती पापड उद्योग समुहाच्या संचालक असलेल्या विमलताई राजगुरू यांच्या पापड उद्योगाने उंच भरारी घेतली. गावात शेती व्यतिरिक्त रोजगाराचे कुठलेही साधन नव्हते. घरखर्च भागावा म्हणून त्यांनी प्रारंभी टेलरींग व्यवसाय सुरू केला. कालंतराने टेलरिंग व्यवसायातून बचत केलेल्या पैशामधून दळणाची गिरणी खरेदी केली. गावातच ब्रम्हपुत्रा बचत गटाची स्थापना केली.

चार लाखांचे कर्ज काढले

आपणही उद्योग करावा, उद्योग क्षेत्रात नाव कमावावं ही त्यांची महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांनी कालांतराने प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रकिया उद्योग योजनेचा लाभ घेतला. या योजनेच्या माध्यमातून ४ लाख ८८ हजार रुपयांचे कर्ज काढले. त्या पैशातून वाशिम येथे तृप्ती पापड उद्योग सुरू केला.

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतून सुरू केलेल्या पापड उद्योगातून विमलताईंनी कुटुंबाची आर्थिक उन्नती साधली. शिवाय इतरही महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे.

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेची जोड

घरगुती अन्न पदार्थांपासून बनविण्यात येणारे पापड, कुरवड्या, शेवया, खारोड्या इत्यादी खमंग खाद्य पदार्थांना ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही मोठ्या प्रमाणात मागणी असते. नेमकी हीच गरज ओळखून विमलताई राजगुरू यांनी आपल्या गृहउद्योगाला प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेची जोड देऊन भांडवल खरेदी केले.

विमलताई राजगुरू यांच्या तृप्ती पापड उद्योगातून बनवलेल्या खाद्य पदार्थांना स्थानिक तसेच बाहेरील बाजारपेठेतही प्रचंड मागणी वाढली आहे. व्यवसायाने शिक्षक असलेले त्यांचे पती दत्तात्रेय राजगुरू आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य देखील या व्यवसायात त्यांना हातभार लावत आहेत.

अनेक पुरस्कारांनी सन्मानित

आज घडीला तृप्ती पापड उद्योग केंद्राने वाशिम जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रात अढळ स्थान निर्माण केले. गुणवत्तापूर्ण उत्पादन दिल्यामुळे अल्पावधीतच तृप्ती पापड उद्योगाच्या अनेक उत्पादनांना जिल्हाभरातून मागणी वाढली आहे. खर्च वजा जाता महिन्याला ५० ते ६० हजार रुपयांचा निव्वळ नफा त्यांना मिळत आहे.

विमलताईंच्या गृह उद्योगातील यशस्वी वाटचालीबद्दल त्यांना २०१७ चा नारीशक्ती सन्मान, विविध राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शनामध्ये अनेक सन्मान देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे. विशेष म्हणजे अलीकडेच त्यांच्या गृह उद्योगाचे रूपांतर साळूनंदा फार्मर प्रोड्यूसर कंपनीमध्ये झाले आहे.

शिक्षण, राजकारण, समाजकारण वा उद्योग विकासाच्या प्रत्येकच क्षेत्रात आजची महिला अग्रेसर होताना आपण पाहत आहोत. प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रकिया उद्योग योजनेच्या आधारामुळे विमलताईंनी घर आणि सांसारिक जबाबदाऱ्या सांभाळून प्रबळ महत्त्वाकांक्षेच्या बळावर उद्योग क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे.

आगामी काळात किमान १०० महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे. उद्योगातील आपल्या यशाचे श्रेय त्यांनी केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेला दिले आहे.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं